शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कृषी विद्यापीठाचे ८३ कर्मचारी अखेर बडतर्फ!

By admin | Updated: October 15, 2014 00:43 IST

कृषी विद्यापीठाचा नाकर्तेपणा भोवला; कर्मचा-यांचा आरोप कुलसचिव कार्यालयात ठिय्या.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ८३ कर्मचार्‍यांच्या बडतर्फीवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर, कृषी विद्यापीठ प्रशासनाने या कर्मचार्‍यांच्या बडतर्फीचे आदेश बजावले आहेत. सहा महिन्याच्या आत भरती प्रक्रिया राबवून, या कर्मचार्‍यांना प्राधान्य द्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असताना, या कृषी विद्यापीठाने भरती प्रक्रिया राबविली नाही. कृषी विद्यापीठाचा हा नाकर्तेपणा आम्हाला भोगावा लागत असल्याचा आरोप करून, बडतर्फ कर्मचार्‍यांनी मंगळवारी कुलसचिव कार्यालयात ठिय्या दिला. उच्च न्यायालयाने अकोल्याच्या कृषी विद्यापीठातील वरिष्ठ संशोधन आणि कनिष्ठ संशोधन सहाय्यक पदावरील ८३ कर्मचार्‍यांच्या बडतर्फीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर, या कर्मचार्‍यांनी न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. विद्यापीठाने नव्याने भरती प्रक्रिया राबवून, सर्व वरिष्ठ व कनिष्ठ संशोधन सहाय्यकांना भरती प्रक्रियेत गुणवत्तेनुसार सामावून घ्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ४ एप्रिल २0१४ रोजी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिले होते. सहा महिन्यांच्या आत भरती प्रक्रिया राबवून, सर्व कर्मचार्‍यांना वयोर्मयादेची शिथिलता देणे अनिवार्य असताना, कृषी विद्यापीठाला निर्णयाचे गांभीर्यच कळले नाही. विद्यापीठाने केवळ जाहिरात प्रसिद्ध करू न उमेदवारांकडून अर्ज जमा केले; परंतु भरती प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यानंतर कर्मचारी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, या मागणीसाठी कृषी विद्यापीठ प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती; परंतु कृषी विद्यापीठाच्या अकार्यक्षमतेवर ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ देण्यास नकार दिला आणि उच्च न्यायालयाने दिलेला आदेश कायम ठेऊन, सर्व कर्मचार्‍यांना बडतर्फ केले आहे. याला विद्यापीठ प्रशासन कारणीभूत असल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी केला आहे. १५ वर्ष या कृषी विद्यापीठात नोकरी केली, संशोधन केले, विद्यार्थ्यांना शिकवले, आता वयाची चाळीशी ओलांडली, नोकरीची वयोर्मयादा ओलांडल्याने कुटुंब उघड्यावर पडली आहेत, असा आरोप कर्मचार्‍यांकडून होत आहे. कृषी विद्यापीठ प्रशासनाने तातडीने यावर निर्णय घेऊन, दिलासा द्यावा, अशी मागणी कर्मचार्‍यांनी कृषी विद्यापीठ प्रशासनाला केली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कृषी विद्यापीठाला बडतर्फीचे आदेश बजावणे क्रमप्राप्त होते; परंतु असे असले तरी कर्मचार्‍यांप्रती विद्यापीठ प्रशासनाची सहानभुती आहे. भरती प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने कृषी विद्यापीठ प्रशासनाने पावले उचलली असून, या प्रकरणी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू ंनी राज्यपालांची भेट घेतली असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एम. भाले यांनी सांगीतले.