शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

‘कृषी’च्या विद्यार्थ्यांनी प्रथम शेतात जावे! -  सुधीर मुनगुंटीवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 13:29 IST

कृषी पदवी घेणाºया विद्यार्थ्यांनी प्रथम शेतात जावे, असे आवाहन अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी येथे केले.

अकोला: आपल्याला देवाने मुबलक निसर्गधन, शेत, जमीन दिली; पण इतक्या वर्षांत तिची निगा, आरोग्य, सेवा करण्यात आपण कमी पडलो. म्हणूनच भविष्यात प्रचंड वाढलेल्या लोकसंख्येची भूक भागविण्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. यापुढे वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येची भूक शमवायची असेल, तर शेतीची सेवा करावी लागणार असून, कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे संशोधन, तंत्रज्ञान विकसित करावे लागणार आहे. त्यासाठी कृषी पदवी घेणाºया विद्यार्थ्यांनी प्रथम शेतात जावे, असे आवाहन अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी येथे केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३३ व्या दीक्षांत समारंभात अर्थमंत्री बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कृषी व महसूल मंत्री तथा कृषी विद्यापीठाचे प्र-कुलपती चंद्रकांत पाटील होते. दीक्षांत पीठावर महाराष्टÑ कृषी, शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे, उत्तर प्रदेशच्या झाशी येथील राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरविंद कुमार, डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार रणधीर सावरकर, आमदार संजय रायमुलकर यांची उपस्थिती होती.सर्वप्रथम प्र-कुलपती चंद्रकात पाटील यांनी कृषी विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर व पीएचडीच्या २०६८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली. सर्वाधिक सुवर्ण पदके प्राप्त करणारा कृषी पदव्युत्तर शाखेचा प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी लालसिंग राठोड व तीन सुवर्ण पदकांसह तीन रोख पारितोषिके पटकावणारी कृषी पदवी अभ्यासक्रमाची प्रावीण्यप्राप्त विद्यार्थिनी स्नेहल विनय चव्हाण यासह इतर २७ सुवर्ण, १६ रौप्य व तीन रोख पारितोषिके प्र-कुलपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आली.याप्रसंगी पुढे बोलताना, मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना मनोजकुमार यांच्या ‘उपकार’ चित्रपटातील ‘मेरे देश की धरती, सोना उगले उगले हिरे मोती’ या गाण्याची आठवण करू न दिली. शेतकºयांनी नागर हाकताना त्याच्या मुखातून पुन्हा हासूर उमटावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्यादृष्टीनेच विविध योजना राबविण्यात येत आहेत. शेतकºयांची कर्जमाफी, वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला . ते म्हणाले, चार वर्षे परिश्रम घेऊन ज्या चार बाय नऊ इंचाच्या पदवीचा कागद आपण प्राप्त केला, तो कागद नव्हे तर भारतमाता, शेती विकासाचा मंत्र आहे. विद्यार्थी तूम आगे बढो, शासन तुम्हारे साथ है, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना देत त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी चालावे, असे आवाहन केले. शेतकºयांनी काळजी करू नये. कारण शासनाच्या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकºयांचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पदवीदान समारंभात ८० टक्के विद्यार्थिनींनीच जवळपास पदके प्राप्त केल्याने मुलांनीही हा बोध घ्यावा, त्यांच्याकडे पदके प्राप्त करताना केवळ कौतुकाने बघू नका, असे अर्थमंत्री बोलताच सभागृहात एकच हशा पिकला. प्रास्ताविक कुलगुरू भाले यांनी केले.

- कृषी विद्यापीठाला १५० कोटीडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा सुवर्ण महोत्सव आहे. म्हणूनच कृषी मंत्र्यांसोबत मला बोलावले असे बोलताना त्यांनी मी खाली हात जाणार नाही, असे सांगत १५० कोटी जाहीर केले. यातील ५० टक्के निधी संशोधनावर खर्च करावा, असेही सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ