शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांंना मिळणार गुणवाढ !

By admin | Updated: July 20, 2015 23:09 IST

कृषी विद्यापीठ निम्न शिक्षण विभागाचा निर्णय; राष्ट्रीय युवाशक्ती संघटनेचा पावसात मोर्चा.

अकोला : विदर्भातील खासगी कृषी तंत्रनिकेतनच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांंंना गुणवाढ देण्याचा निर्णय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने घेतला आहे. या मागणीसाठी राष्ट्रीय युवाशक्ती संघटनेच्यावतीने सोमवारी भर पावसात कृषी विद्यापीठ प्रशासन कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. विद्यार्थ्यांना मिळालेल्या कमी गुणाचा प्रश्न लोकमतने ठळकपणे मांडला होता, हे विशेष. विदर्भातील ४६ खासगी कृषी तंत्रनिकेतनचा निकाल यंदा अवघा १२ टक्के लागला. २४५७ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांंंचे भविष्य टांगणीला लागल्याने राष्ट्रीय युवाशक्ती संघटनेने मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. संघटनेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांंंचा मोर्चा सोमवारी कृषी अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाले यांच्या दालनात पोहोचला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विमल जैन, निम्न कृषी शिक्षण संचालक डॉ. डी. तामगाडगे आणि डॉ. भाले यांच्यात चर्चा झाली. जे विद्यार्थी दोन किंवा पाच गुणांनी अनुत्तीर्ण झाले असतील त्या विद्यार्थ्यांंंना दोन विषयांमध्ये पाच गुणांची वाढ (ग्रेस मार्क) देण्याचा अधिकार कृषी विद्यापीठाला असल्याने डॉ. भाले यांनी या विद्यार्थ्यांंंना कमीत कमी पाच गुण वाढवून देण्याचे आश्‍वासन दिले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत विदर्भात ४६ खासगी कृषी तंत्रनिकेतन असून, यामध्ये कृषी विद्यापीठाच्या ९ तंत्रनिकेतन शाळांचा समावेश आहे. यंदा प्रथमच पहिल्या तुकडीचा निकाल लागला आहे; पण २७३३ पैकी तब्बल २४५७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून, १७ महाविद्यालयांचा निकाल केवळ २ टक्के लागला आहे. या तीन वर्षांंंच्या अभ्यासक्रमात प्रथम व द्वितीय वर्षात लेखी व प्रात्यक्षिक मिळून गुण दिले जातात, तर तिसर्‍या वर्षी लेखी व प्रात्यक्षिक वेगळे करून गुण दिले जातात. त्यामुळे काही विद्यार्थ्यांंंंना प्रात्यक्षिकात १00 पैकी ९0 पेक्षा जास्त गुण मिळाले असून, लेखी परीक्षेत तीन ते चार गुणच मिळाले आहेत. सरासरी ७५ टक्के गुण मिळालेले विद्यार्थीही अनुत्तीर्ण झाले आहेत. यासंदर्भात निम्न कृषी शिक्षण विभागाचे संचालक प्रा डी तामगाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांंंना कमीत कमी पाच गुणांची वाढ देण्याचा निर्णय कृषी अधिष्ठातांच्या संमतीने घेण्यात आला असून, तसे आश्‍वासन विद्यार्थ्यांना देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाच गुणांअभावी जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असतील, ते यामुळे उत्तीर्ण होतील.