शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

३१ मार्चनंतर थकीत रकमेवर दोन टक्के शास्ती आकारण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 12:34 IST

१ एप्रिलपासून थकीत रकमेवर दोन टक्के शास्तीची आकारणी करण्यासोबतच धडक कारवाई करण्याचा इशारा कर अधीक्षक विजय पारतवार यांनी दिला आहे.

अकोला: करवाढीच्या मुद्यावर भारिप-बहुजन महासंघाने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाली काढल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून थकीत रकमेच्या वसुलीसाठी नवीन आराखडा तयार केला जात आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत टॅक्सची थकीत रक्कम जमा न केल्यास १ एप्रिलपासून थकीत रकमेवर दोन टक्के शास्तीची आकारणी करण्यासोबतच धडक कारवाई करण्याचा इशारा कर अधीक्षक विजय पारतवार यांनी दिला आहे.थकीत मालमत्ता कर जमा करण्यासाठी अकोलेकर पुढाकार घेत नसल्याचे ध्यानात आल्यानंतर मनपा प्रशासनाने थकीत रकमेवर प्रतिमहिना दोन टक्के शास्ती (दंडात्मक रक्कम)ची आकारणी सुरू केली होती. यामागे थकीत कराचा भरणा जलद गतीने व्हावा, असा उद्देश होता. शास्ती लागू करण्यापूर्वी प्रशासनाने शास्ती अभय योजना सुरू केली. त्याला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत जानेवारी महिन्यात संपुष्टात आल्यानंतर कर वसुली विभागाने शास्तीची आकारणी सुरू केली. मनपाच्या धोरणात्मक निर्णयात बदल करीत सत्ताधारी भाजपाने करबुडव्या मालमत्ताधारकांना पाठीशी घालत १४ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत शास्ती अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. महापौर विजय अग्रवाल यांच्या निर्देशानुसार मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी तातडीने अभय योजनेला मुदतवाढ दिली होती. ही मुदत येत्या रविवारी संपुष्टात येत आहे.हायकोर्टाच्या निकालामुळे दिलासामनपाने सुधारित करवाढ लागू केल्यानंतर यावर मनपातील शिवसेना, काँग्रेस व भारिप-बमसंने आक्षेप नोंदविला. भारिपच्यावतीने आणि काँग्रेस नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केल्या. करवाढीच्या मुद्यावर राजकीय पक्षांनी आंदोलने छेडल्यानंतर मालमत्ताधारकांनी कराची रक्कम कमी होईल, या अपेक्षेने कर जमा करण्यास आखडता हात घेतला. हायकोर्टाने नुकतीच भारिप-बमसंची याचिका निकाली काढल्यामुळे महापालिकेला दिलासा मिळाला आहे.दर कमी होण्याची शक्यता मावळली!मनपाने आकारलेले सुधारित दर कमी होतील, या संभ्रमावस्थेत सापडलेल्या अकोलेकरांनी टॅक्सची रक्कम जमा केलीच नाही. उच्च न्यायालयाचा निकाल लक्षात घेता दर कमी होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे आजपर्यंत ज्या नागरिकांनी थकीत रकमेचा भरणा केला नाही, त्यांना ३१ मार्चनंतर नाहक दोन टक्के शास्तीचा भुर्दंड सहन करावा लागणार, हे निश्चित झाले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका