शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार किमीनंतर ज्येष्ठांनाही प्रवास भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:30 IST

चार हजार किलोमीटर संपताच पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वर्षभरात कितीही प्रवास केला तरी अर्धे तिकीट लागेल, या अलिखित सवलतीला ज्येष्ठ नागरिकांना आता मुकावे लागणार आहे. स्मार्ट कार्ड मिळताच प्रवासाचा हिशेब सुरू होणार आहे. चार हजार किलोमीटर संपताच पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे.ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटात वर्र्षभरात चार हजार किमीचा प्रवास करता येतो; मात्र त्याची मोजणी होत नव्हती. आधार कार्ड, मतदान कार्ड या आधारे अर्धे तिकीट दिले जात होते. या मर्यादेपासून सवलत घेणारही अनभिज्ञ होते. आता एसटी महामंडळ सवलत घेणाऱ्यास स्मार्ट कार्ड देण्यात येत आहे.१ एप्रिल ते ३१ मार्च, अशी एक वर्ष स्मार्ट कार्डची मुदत राहील. प्रत्येक वर्षी नूतनीकरण करावे लागेल. ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्ट कार्ड मशीनद्वारे स्वाइप केले जातील. याद्वारे कार्डधारकांनी नेमका किती प्रवास केला, याची माहिती वाहकाला मिळणार आहे. प्रवास सवलत चार हजार किमीचा हिशेब प्रत्येक प्रवासात होणार आहे. चार हजार किलोमीटर संपले की, वाहक पूर्ण तिकीट फाडणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता आपण किती प्रवास केला, याची मोजदाद करावी लागणार आहे. स्मार्ट कार्डची नोंदणी केली जात आहे.ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड नाही, त्यांच्याकडील आधार कार्ड पाहून त्यांना अर्ध्या तिकिटाने प्रवास करू दिला जाणार आहे. पुढील काळात मात्र अर्ध्या तिकिटासाठी आधार तुटणार आहे. स्मार्ट कार्ड योजना लागू झाल्याने प्रवासादरम्यान होणारी बोगसगिरी आणि महामंडळाचे होणारे नुकसान थांबणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड दिले जाणार असल्याने आधार कार्ड, मतदान कार्डची गरज नाही. स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी ज्येष्ठांना ५५ रुपये शुल्क आकारले जात आहे. आॅनलाइन नोंदणीनंतर स्मार्ट कार्ड आधारशी लिंक केले जाते.महाराष्ट्र राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार धोरणात्मक नियमावली लावून दिली आहे. त्यानुसार स्मार्ट कार्डच्या सवलती राज्यभरात देण्यात येत आहेत.-चेतना खिरवाळकर, विभागीय नियंत्रक, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाstate transportएसटी