शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

कृषी विभागाची अफलातून सूचना; विक्रेत्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:19 IST

आधीच नैसर्गिक संकटाने घेरलेल्या शेतकऱ्याला सोयाबीनच्या निकृष्ठ बियाण्यांमुळे मोठे नुकसान झाले. सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीबाबत कृषी विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या ...

आधीच नैसर्गिक संकटाने घेरलेल्या शेतकऱ्याला सोयाबीनच्या निकृष्ठ बियाण्यांमुळे मोठे नुकसान झाले. सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीबाबत कृषी विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आगामी हंगामात असे प्रकार टाळता यावे याकरिता विभागीय कृषी सहसंचालकांसोबत कृषी विभागाची ऑनलाइन सभा पार पडली. त्यानुसार सोयाबीन बियाण्याची विक्रीपूर्व त्याची कंपनी व लॉटनिहाय उगवण क्षमता चाचणी करावी, असे पत्र वरिष्ठांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद कृषी विकास अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांच्या संघटनेला दिले.

या पत्राला अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघाने उत्तर दिले आहे. यात कंपनीनिहाय, लॉटनिहाय सोयाबीन बियाण्याची चाचणी कशी करावी, चाचणी करण्यासाठी सोयाबीन बियाण्याची बॅग एका लॉटची फोडल्यावर नंतर त्या बॅगचे काय करावे, सोयाबीन बियाण्याची फोडलेली बॅग बिलामध्ये शेतकऱ्याला विकणे हे कायद्याच्या चौकटीत बसते काय, असे प्रश्‍न विचारले आहेत. शिवाय एका विक्रेत्यांकडे कुठल्याही कंपनीच्या सोयाबीनच्या १०० बॅग येत असतील, तर त्या सरासरी तीन लॉट असतात. याप्रमाणे तीन लॉटच्या तीन बॅग नमुना घेण्यासाठी फोडाव्या लागतील. अशा साधारण पाच कंपन्यांचे बियाणे एका विक्रेत्याकडे येत असेल, तर १५ बॅग नमुन्यासाठी फोडाव्या लागतील.

ही परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व विक्रेते २०२१-२२ च्या या हंगामात केवळ प्रमाणित बियाणे विकणार आहोत. प्रमाणित बियाणे हे शासनाने प्रमाणित केलेले असल्याने त्याची पूर्वउगवण चाचणी करणे आवश्‍यक राहील काय, याबाबतही कृषी खात्याने मार्गदर्शन करावे, असे पत्रात कृषी विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष मोहन सोनोने व सचिव सचिन राऊत यांनी कळविले आहे.

--बॉक्स--

तर बियाणे जाईल वाया

जिल्ह्यात ६०० कृषी विक्रेते आहेत. प्रत्येकाने १५ बॅग फोडल्या तर ९००० बॅगची एकूण चाचणी होईल. त्यामुळे एवढे बियाणे वाया जाईल. या बॅगांमुळे ९००० एकराचे बियाणे पेरणीविना राहील, असे गणित मांडले आहे.