शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गोंधळी मद्यपींवर १२ तासांत कारवाई

By admin | Updated: April 20, 2017 00:51 IST

अवैध धंदे, दारूबंदीसाठी ग्रामरक्षक दलाचा आधार

अकोला : दारू पिऊन गोंधळ घालणारे, मारामारी करणाऱ्यांची माहिती मिळताच बारा तासांच्या आत पोलीस त्या व्यक्तीला पकडून गुन्हे दाखल करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक गावात ग्रामरक्षक दल कायद्यानुसार स्थापन करण्याचे निर्देश गृह विभागाने पोलीस विभागासह उत्पादन शुल्क विभागाला मंगळवारी दिले आहेत. अवैध दारू उत्पादन, वाहतूक, विक्री होत असल्यास या प्रकारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दारूबंदी अधिनियम करण्यात आला आहे. १६ जानेवारी २०१७ रोजी महाराष्ट्र दारूबंदी (सुधारणा) अधिनियम २०१६ प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्येच ग्राम स्तरावर ग्रामरक्षक दल स्थापन करण्याची अधिसूचनाही २२ मार्च २०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर अद्यापही कार्यवाही सुरू न झाल्याने गृह विभागाने १८ एप्रिल रोजी नव्याने आदेश दिले आहेत.महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रामरक्षक दलाने गावातील अवैध धंदे, दारू विक्री, वाहतूक करणे, जवळ बाळगणे याबाबतची माहिती पोलिसांना, उत्पादन शुल्क विभागाला द्यावयाची आहे. माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेशात बजावण्यात आले आहे.बारा तासांत कारवाई करा!अवैध दारू उत्पादन, विक्रीसंदर्भात ग्रामरक्षक दलाने माहिती देताच पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने १२ तासांच्या आत कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे बजावण्यात आले.नशेत असल्याची वैद्यकीय तपासणीगावात दारू पिऊन गोंधळ घालणारे, मारामारी करणाऱ्या व्यक्तीची माहिती पोलिसांना मिळताच तो नशेत असेपर्यंत शक्य तितक्या लवकर ताब्यात घेतले जाणार आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई केली जाईल. सराईताला हद्दपारीचा प्रस्तावअवैध दारू निर्मिती, विक्री तसेच दारूविषयी गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सराईत व्यक्तीविरुद्ध कारवाई करताना चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र घेतले जाईल. सातत्याने हा प्रकार घडत असल्यास हद्दपारीची कारवाई प्रस्तावित होणार आहे. हा प्रस्ताव सादर न केल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.