शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
2
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
3
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
4
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
5
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
6
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
7
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
8
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
9
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
10
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
11
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
12
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
13
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
14
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
15
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
16
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
17
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
18
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
19
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
20
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट

अकोला जिल्ह्यात टंचाई उपाययोजनांची २८ टक्केच कामे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 02:11 IST

अकोला : दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा बसणाºया गावांमध्ये तातडीच्या उपाययोजना पाणी टंचाई आराखड्यात समाविष्ट केल्या जातात. त्या उपाययोजनांना मंजुरी जिल्हाधिका-यांकडून घेत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून कामे केली जातात. चालू वर्षात आतापर्यंत टंचाईचा दुसरा टप्पा आटोपत आहे, त्यासाठी उपाययोजनांपैकी केवळ २८ टक्केच कामांना मंजुरी मिळाल्याची माहिती आहे. उर्वरित ७२ टक्के कामांना येत्या काळात मंजुरी देऊन सुरुवात होणार आहे. तोपर्यंत जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होणार आहेत, हे निश्चित.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा बसणा-या गावांमध्ये तातडीच्या उपाययोजना पाणी टंचाई आराखड्यात समाविष्ट केल्या जातात. त्या उपाययोजनांना मंजुरी जिल्हाधिका-यांकडून घेत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून कामे केली जातात. चालू वर्षात आतापर्यंत टंचाईचा दुसरा टप्पा आटोपत आहे, त्यासाठी उपाययोजनांपैकी केवळ २८ टक्केच कामांना मंजुरी मिळाल्याची माहिती आहे. उर्वरित ७२ टक्के कामांना येत्या काळात मंजुरी देऊन सुरुवात होणार आहे. तोपर्यंत जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होणार आहेत, हे निश्चित.नेहमीप्रमाणे चालू वर्षातही ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने २०१७-१८ मध्ये उन्हाळ्यासाठी पाणी टंचाई आराखडा तयार केला. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात-२५९, दुसरा टप्पा-२३३, तिसरा टप्प्यात-७१ गावांमध्ये पाणी टंचाईचा अंदाज व्यक्त झाला, त्यानंतर झालेल्या सुधारणेनुसार ५३४ गावांमध्ये पाणी टंचाईच्या उपाययोजनांचा आराखडा अंतिम झाला. त्यातील पहिल्या टप्प्यातील उपाययोजनांचा काळ आटोपला. आता जानेवारी ते मार्च या दुसºया टप्प्यातील कालावधीची कामेही अंतिम होणे आवश्यक आहे, तर त्याचवेळी पुढील एप्रिल महिन्यात तीव्र टंचाईचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. आतापर्यंत मंजूर आराखड्यातील उपाययोजनांची केवळ २८ टक्केच कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील ५३४ गावांमध्ये असलेल्या एकूण १०८४ उपाययोजनांपैकी १९३ गावांमध्ये १९५ कामे पूर्ण झाली आहेत. त्याचवेळी १२६ गावांमध्ये ८५ उपाययोजनांची कामे सुरू असल्याची माहिती आहे. टंचाईग्रस्त गावे, त्यामध्ये करावयाच्या उपाययोजना आणि प्रत्यक्षात पूर्ण झालेली कामे पाहता टंचाई कामांची गती मंदावल्याचे चित्र जिल्हाभरात आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाण्यासाठी हाहाकार उडालेला असताना जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग, तसेच मंजुरी देणारा महसूल विभाग कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. विशेष म्हणजे, पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ ग्रामस्थांवर आणली जात आहे. 

उपाययोजना १५ एप्रिलपर्यंत होणार! गावातील तीव्र पाणी टंचाईवर तातडीची उपाययोजना म्हणून १२८ गावांमध्ये विंधन विहिरी आणि कूपनलिकांच्या १४४ कामांना मंजुरी देण्यात आली. १२ मार्चअखेर त्यापैकी १२७ कामे पूर्ण झाली. त्यावर ६७ हातपंप बसविण्यात आले.  त्यातील १५ ठिकाणी वीज पंप आणि आरओ मशीनद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला. पाणी पातळी खोल गेल्याने १२ विंधन विहिरी अयशस्वी झाल्या. नव्या आदेशानुसार ६४ गावांमध्ये ४२ विंधन विहिरी, २४ कूपनलिकांना मंजुरी देण्यात आली. त्यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले. येत्या १५ एप्रिलपर्यंत कामे पूर्ण होणार आहेत.

टॅग्स :Akola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयAkolaअकोला