शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महावीरांच्या सिद्धांतात काेराेनावर मात करण्याची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:17 IST

अकाेला : काेराेनाच्या संकटामुळे सध्या संपूर्ण जग धास्तावले आहे. या संकटावर मात करण्यासाठी ज्या उपाययाेजना केल्या जात आहेत त्या ...

अकाेला : काेराेनाच्या संकटामुळे सध्या संपूर्ण जग धास्तावले आहे. या संकटावर मात करण्यासाठी ज्या उपाययाेजना केल्या जात आहेत त्या उपाययाेजनांचे मूळ हे भगवान महावीरांच्या सिद्धांतात आहे, असे विवेचन औरंगाबाद येथील उद्याेजक सुनील देसरडा यांनी केले. भगवान महावीर जन्मोत्सवाच्या निमित्ताने नाशिकच्या महावीर इंटनॅशनलकडून आयाेजित ऑनलाईन महावीर व्याख्यानमालेत ते बाेलत हाेते. परमपूज्य वाणीभूषण प्रीतिसुधाजी म. सा. क्रांतिकारी मधुस्मिता जी म. सा. यांच्या उपस्थितीत आयाेजित या व्याख्यानमालेचे उद्घाटन महावीर इंटरनॅशनलच्या झाेन चेअरमन सुमन जैन यांच्या हस्ते झाले. यावेळी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुभाष ओसवाल, एमआरसी जैन सोशल ग्रुप नाशिकचे सचिन शाह उपस्थित हाेते. देसरडा यांनी अहिंसा, सत्य, संयम, अपरिग्रह, ब्रह्मचर्य या महावीरांच्या सिद्धांतांची काेराेना काळातील उपयुक्तता विशद केली. संक्रमित असाल तर सत्य बाेला, नियमांचे पालन करा कुणालाही कायिक, वाचिक हिंसा करू नका, ज्या गाेष्टी टाळायला सांगितल्या आहेत त्या संयमाने टाळा, जेवढे आवश्यक आहे तेवढेच घ्या हेच अपरिग्रह आहे, दान करा. ‘जिओ और जिने दाे’ या विचारांचे पालन दानातून हाेते. माैन बाळगा त्यामुळे मुखाद्वारे संक्रमण टाळता येईल असे सूत्र देसरडा यांनी सांगितले. जैन धर्मात अडीच हजार वर्षांपूर्वीपासूनच मुखपट्टीचा वापर केला जाताे. आज काेराेनाच्या विराेधात मास्क हे सर्वात उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट झाले. शाकाहाराचा सर्वत्र हाेत असलेला स्वीकार, ध्यान करण्यासाठी जैन मुनी एकांतवास ग्रहण करत असत त्यालाच

अलगाव आणि साैम्य अलगाव असे म्हणतात. काेराेनाच्या काळात सध्या रुग्णांसाठी अलगीकरण आणि विलगीकरणाच्या ज्या संकल्पना आहेत त्याचा उगम याच सिद्धांतात असल्याचे मत देसरडा यांनी व्यक्त केले. जैन धर्म हा जीवन जगण्याचा धर्म आहे. जन, जंगल व पर्यावरण यांच्याबाबत संवेदनशील न राहिल्यानेच काेराेनासारखे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जैन विचारांचे कृतियुक्त पालन करून आपण काेराेनाला दूर करू शकताे, असा विश्वास त्यांनी केला. साध्वी प्रीतिसुधाजी यांनी महावीरांच्या आयुष्यातील प्रसंग सांगत त्यांच्या विचारांची सर्वव्यापी उपयुक्तता विशद केली. प्रारंभी सुमन जैन यांनी महावीरांचे तत्त्वज्ञान सर्वव्यापी असल्याचे मत व्यक्त केले. सुभाष ओसवाल यांनी आजच्या तणावाच्या वातावरणात महावीरांच्या विचारांचा कृतियुक्त वारसा अतिशय उपकारक ठरेल, असा आशावाद व्यक्त केला. सचिन शहा यांनी काेराेना काळात सुरू असलेल्या समाजकार्याची माहिती दिली. संचालन डॉ. संगीता बाफना यांनी केले. यावेळी महावीर इंटनॅशनलचे अध्यक्ष अनिल नहार, सचिव राजेंद्र बाफना आदी उपस्थित हाेते.