शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महावीरांच्या सिद्धांतात काेराेनावर मात करण्याची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:17 IST

अकाेला : काेराेनाच्या संकटामुळे सध्या संपूर्ण जग धास्तावले आहे. या संकटावर मात करण्यासाठी ज्या उपाययाेजना केल्या जात आहेत त्या ...

अकाेला : काेराेनाच्या संकटामुळे सध्या संपूर्ण जग धास्तावले आहे. या संकटावर मात करण्यासाठी ज्या उपाययाेजना केल्या जात आहेत त्या उपाययाेजनांचे मूळ हे भगवान महावीरांच्या सिद्धांतात आहे, असे विवेचन औरंगाबाद येथील उद्याेजक सुनील देसरडा यांनी केले. भगवान महावीर जन्मोत्सवाच्या निमित्ताने नाशिकच्या महावीर इंटनॅशनलकडून आयाेजित ऑनलाईन महावीर व्याख्यानमालेत ते बाेलत हाेते. परमपूज्य वाणीभूषण प्रीतिसुधाजी म. सा. क्रांतिकारी मधुस्मिता जी म. सा. यांच्या उपस्थितीत आयाेजित या व्याख्यानमालेचे उद्घाटन महावीर इंटरनॅशनलच्या झाेन चेअरमन सुमन जैन यांच्या हस्ते झाले. यावेळी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुभाष ओसवाल, एमआरसी जैन सोशल ग्रुप नाशिकचे सचिन शाह उपस्थित हाेते. देसरडा यांनी अहिंसा, सत्य, संयम, अपरिग्रह, ब्रह्मचर्य या महावीरांच्या सिद्धांतांची काेराेना काळातील उपयुक्तता विशद केली. संक्रमित असाल तर सत्य बाेला, नियमांचे पालन करा कुणालाही कायिक, वाचिक हिंसा करू नका, ज्या गाेष्टी टाळायला सांगितल्या आहेत त्या संयमाने टाळा, जेवढे आवश्यक आहे तेवढेच घ्या हेच अपरिग्रह आहे, दान करा. ‘जिओ और जिने दाे’ या विचारांचे पालन दानातून हाेते. माैन बाळगा त्यामुळे मुखाद्वारे संक्रमण टाळता येईल असे सूत्र देसरडा यांनी सांगितले. जैन धर्मात अडीच हजार वर्षांपूर्वीपासूनच मुखपट्टीचा वापर केला जाताे. आज काेराेनाच्या विराेधात मास्क हे सर्वात उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट झाले. शाकाहाराचा सर्वत्र हाेत असलेला स्वीकार, ध्यान करण्यासाठी जैन मुनी एकांतवास ग्रहण करत असत त्यालाच

अलगाव आणि साैम्य अलगाव असे म्हणतात. काेराेनाच्या काळात सध्या रुग्णांसाठी अलगीकरण आणि विलगीकरणाच्या ज्या संकल्पना आहेत त्याचा उगम याच सिद्धांतात असल्याचे मत देसरडा यांनी व्यक्त केले. जैन धर्म हा जीवन जगण्याचा धर्म आहे. जन, जंगल व पर्यावरण यांच्याबाबत संवेदनशील न राहिल्यानेच काेराेनासारखे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जैन विचारांचे कृतियुक्त पालन करून आपण काेराेनाला दूर करू शकताे, असा विश्वास त्यांनी केला. साध्वी प्रीतिसुधाजी यांनी महावीरांच्या आयुष्यातील प्रसंग सांगत त्यांच्या विचारांची सर्वव्यापी उपयुक्तता विशद केली. प्रारंभी सुमन जैन यांनी महावीरांचे तत्त्वज्ञान सर्वव्यापी असल्याचे मत व्यक्त केले. सुभाष ओसवाल यांनी आजच्या तणावाच्या वातावरणात महावीरांच्या विचारांचा कृतियुक्त वारसा अतिशय उपकारक ठरेल, असा आशावाद व्यक्त केला. सचिन शहा यांनी काेराेना काळात सुरू असलेल्या समाजकार्याची माहिती दिली. संचालन डॉ. संगीता बाफना यांनी केले. यावेळी महावीर इंटनॅशनलचे अध्यक्ष अनिल नहार, सचिव राजेंद्र बाफना आदी उपस्थित हाेते.