शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

अनियमितता प्रकरणात सचिवाला अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:18 IST

खेट्री : पातूर तालुक्यातील सुकळी ग्रामपंचायतमध्ये १४व्या वित्त आयोगांतर्गत आलेल्या निधीचा गैरवापर केल्याबाबत तत्कालीन सचिव जी.एस. फसाले यांची ...

खेट्री : पातूर तालुक्यातील सुकळी ग्रामपंचायतमध्ये १४व्या वित्त आयोगांतर्गत आलेल्या निधीचा गैरवापर केल्याबाबत तत्कालीन सचिव जी.एस. फसाले यांची चाैकशी आटाेपण्याचा साेपस्कार केला जात असून, या प्रकरणात त्यांना अभय देण्यात येत असल्याचा आराेप तक्रारकर्त्यांनी केला आहे.

सुकळी येथील माजी सरपंच काशीराम सीताराम हिवराळे यांनी तत्कालीन सचिव जी. एस. फसाले व पातूरच्या तत्कालीन गटविकास अधिकारी यांना वारंवार माहिती अधिकारात माहिती मागितली; परंतु माहिती अधिकाराच्या अर्जाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे हिवराळे यांनी अमरावतीच्या आयुक्तांकडे अपील करून संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार केली. सदर तक्रारीवरून २०२०च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये पातूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर.एस. गवई यांनी चौकशीसाठी वारंवार सुकळी ग्रामपंचायतला भेट दिली; परंतु चौकशीसाठी तत्कालीन सचिव जी.एस. फसाले यांना, अभिलेख सादर करण्यासाठी विस्तार अधिकारी यांनी वारंवार सूचना दिल्या; परंतु सचिवांनी अभिलेख सादर केले नाही, असे चौकशी अहवालामध्ये नमूद आहे.

१४व्या वित्त आयोगामध्ये मंजूर कृती आराखड्यानुसार कामे करण्यात आली नाही, त्यामुळे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार तत्कालीन सचिव जी.एस. फसाले यांनी केल्याचा आरोप माजी सरपंच काशीराम सीताराम हिवराळे यांनी केला होता. या प्रकरणी पातूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर.एस. गवई यांनी चौकशीदरम्यान १४व्या वित्त आयोगाचे निधीचे बँक स्टेटमेंट, १४व्या वित्त आयोगाचा मंजूर कृती आराखडा, अंदाजपत्रक, मोजमाप, नोंदवही, काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र व इतर सर्व अभिलेख मागितले होते. परंतु तत्कालीन सचिव जी.एस. फसाले यांनी चौकशीसाठी अभिलेख सादर केले नाही, असे अहवालानुसार समोर आले आहे. याबाबत विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

बॉक्स

पाच महिने उलटूनही सचिवावर कारवाई नाही

माजी सरपंच काशीराम सीताराम हिवराळे यांनी खातेनिहाय चौकशीसाठी तक्रार केली होती. सदर तक्रारीवर चौकशी करण्यात आली, तेव्हापासून पाच महिन्याचा कालावधी उलटला मात्र तत्कालीन सचिवावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

काेट

चौकशीदरम्यान तसेच विस्तार अधिकाऱ्यांच्या वारंवार सांगण्यावरून तत्कालीन सचिव जी.एस. फसाले यांनी अभिलेख सादर केले नाही त्यामुळे निधीचा अपहार केल्याचे निष्पन्न होत आहे. पाच ते सहा महिन्याचा कालावधी उलटूनही तत्कालीन सचिवावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. सदर प्रकरण थंड बस्त्यात टाकून तत्कालीन सचिवाला अभय दिल्याचा प्रकार आहे.

काशीराम सीताराम हिवराळे, माजी सरपंच, सुकळी