शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अनियमितता प्रकरणात सचिवाला अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:18 IST

खेट्री : पातूर तालुक्यातील सुकळी ग्रामपंचायतमध्ये १४व्या वित्त आयोगांतर्गत आलेल्या निधीचा गैरवापर केल्याबाबत तत्कालीन सचिव जी.एस. फसाले यांची ...

खेट्री : पातूर तालुक्यातील सुकळी ग्रामपंचायतमध्ये १४व्या वित्त आयोगांतर्गत आलेल्या निधीचा गैरवापर केल्याबाबत तत्कालीन सचिव जी.एस. फसाले यांची चाैकशी आटाेपण्याचा साेपस्कार केला जात असून, या प्रकरणात त्यांना अभय देण्यात येत असल्याचा आराेप तक्रारकर्त्यांनी केला आहे.

सुकळी येथील माजी सरपंच काशीराम सीताराम हिवराळे यांनी तत्कालीन सचिव जी. एस. फसाले व पातूरच्या तत्कालीन गटविकास अधिकारी यांना वारंवार माहिती अधिकारात माहिती मागितली; परंतु माहिती अधिकाराच्या अर्जाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे हिवराळे यांनी अमरावतीच्या आयुक्तांकडे अपील करून संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार केली. सदर तक्रारीवरून २०२०च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये पातूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर.एस. गवई यांनी चौकशीसाठी वारंवार सुकळी ग्रामपंचायतला भेट दिली; परंतु चौकशीसाठी तत्कालीन सचिव जी.एस. फसाले यांना, अभिलेख सादर करण्यासाठी विस्तार अधिकारी यांनी वारंवार सूचना दिल्या; परंतु सचिवांनी अभिलेख सादर केले नाही, असे चौकशी अहवालामध्ये नमूद आहे.

१४व्या वित्त आयोगामध्ये मंजूर कृती आराखड्यानुसार कामे करण्यात आली नाही, त्यामुळे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार तत्कालीन सचिव जी.एस. फसाले यांनी केल्याचा आरोप माजी सरपंच काशीराम सीताराम हिवराळे यांनी केला होता. या प्रकरणी पातूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर.एस. गवई यांनी चौकशीदरम्यान १४व्या वित्त आयोगाचे निधीचे बँक स्टेटमेंट, १४व्या वित्त आयोगाचा मंजूर कृती आराखडा, अंदाजपत्रक, मोजमाप, नोंदवही, काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र व इतर सर्व अभिलेख मागितले होते. परंतु तत्कालीन सचिव जी.एस. फसाले यांनी चौकशीसाठी अभिलेख सादर केले नाही, असे अहवालानुसार समोर आले आहे. याबाबत विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

बॉक्स

पाच महिने उलटूनही सचिवावर कारवाई नाही

माजी सरपंच काशीराम सीताराम हिवराळे यांनी खातेनिहाय चौकशीसाठी तक्रार केली होती. सदर तक्रारीवर चौकशी करण्यात आली, तेव्हापासून पाच महिन्याचा कालावधी उलटला मात्र तत्कालीन सचिवावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

काेट

चौकशीदरम्यान तसेच विस्तार अधिकाऱ्यांच्या वारंवार सांगण्यावरून तत्कालीन सचिव जी.एस. फसाले यांनी अभिलेख सादर केले नाही त्यामुळे निधीचा अपहार केल्याचे निष्पन्न होत आहे. पाच ते सहा महिन्याचा कालावधी उलटूनही तत्कालीन सचिवावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. सदर प्रकरण थंड बस्त्यात टाकून तत्कालीन सचिवाला अभय दिल्याचा प्रकार आहे.

काशीराम सीताराम हिवराळे, माजी सरपंच, सुकळी