शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

महानच्या धरणात उरला ९.३३ टक्के जलसाठा; तिसरा व्हॉल्व्ह पडला उघडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 13:52 IST

महान : संपूर्ण अकोला शहरासह नदीकाठावरील ६३ खेडी गावांची तहान मिटविणाऱ्या महान धरणाची पाणी पातळी दिवसेंदिवस घसरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून पाऊस पाहिजे तेवढ्या प्रमाणात पडत नसल्याने महान धरणाचा जलसाठा १०० टक्क्यापर्यंत पोहचू शकला नसल्याने त्याचा फटका नदीकाठावरील ६३ खेड्यांना बसला आहे.

ठळक मुद्देमहान धरणात सद्यस्थितीत १११३.०९ फूट, ३३९.२७ मीटर, ८.०६५ द.ल.घ.मी अर्थात ९.३३ टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहरासाठी आरक्षित ठेवण्यात आल्याने धरणातील पाणी नदीकाठावरील ६३ गावे, मत्स्य बीज केंद्र व सिंचनाकरिता पाणी धरणातून सोडण्यात आले नाही. हगदरी टेकडीपासून पाणी शेकडो फूट दूरवर गेल्याने या टेकडीवर जांभरूण, कोथळी येथील महिला कपडे धुण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.

महान : संपूर्ण अकोला शहरासह नदीकाठावरील ६३ खेडी गावांची तहान मिटविणाऱ्या महान धरणाची पाणी पातळी दिवसेंदिवस घसरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून पाऊस पाहिजे तेवढ्या प्रमाणात पडत नसल्याने महान धरणाचा जलसाठा १०० टक्क्यापर्यंत पोहचू शकला नसल्याने त्याचा फटका नदीकाठावरील ६३ खेड्यांना बसला आहे. धरणाच्या जलसाठ्यात पाहिजे तशी वाढ न झाल्यामुळे जुलै २०१७ पासून धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यात आले नाही. १९ मार्च रोजी माहितीनुसार महान धरणात सद्यस्थितीत १११३.०९ फूट, ३३९.२७ मीटर, ८.०६५ द.ल.घ.मी अर्थात ९.३३ टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी १९ मार्च रोजी धरणात ११२६.७७ फूट, ३४३.४४ मीटर, ३५.१६८ द.ल.घ.मी. व ४०.७२ टक्के एवढा जलसाठा होता. या तुलनेत धरणात आजमितीला ३१ टक्के जलसाठा कमी आहे.महान धरणाची खालावलेली पाणी पातळी लक्षात घेता धरणातील पाणी केवळ अकोला शहरासाठी आरक्षित ठेवण्यात आल्याने धरणातील पाणी नदीकाठावरील ६३ गावे, मत्स्य बीज केंद्र व सिंचनाकरिता पाणी धरणातून सोडण्यात आले नाही. सद्यस्थितीत धरणातून केवळ अकोला शहरालाच पाणी पुरवठा होत असून, त्यामुळे व बाष्पीभवनामुळे धरणाची पाणी पातळी दररोज सरासरी एक ते दोन से.मी.ने कमी होत आहे.अकोला शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महान धरणात एकूण पाच व्हॉल्व्ह बसविलेले असून, त्यापैकी तीन व्हॉल्व्ह पूर्णपणे उघडे पडले आहे. तसेच विश्रामगृहाकडील धरणातील टेकड्या उघड्या पडल्या आहेत. इतकेच नव्हे, तर धरणाच्या मध्यभागी असलेल्या हगदरी टेकडीपासून पाणी शेकडो फूट दूरवर गेल्याने या टेकडीवर जांभरूण, कोथळी येथील महिला कपडे धुण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. तसेच एरवी धरणाच्या पाण्यात बुडालेले असणारे ‘दीपमाय’चे मंदिरसुद्धा उघडे पडले आहे. धरणातील पाणी नदीपात्रात सोडणे बंद असल्याने काटेपूर्णा नदी सद्यस्थितीत कोरडीठण्ण पडली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण