शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

बाबासाहेबांच्या  ‘त्या’ आठवांचा आजही गहीवर! - शांताबार्इंनी दिला स्मृतींना उजाळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 19:17 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार धम्मक्रांतीच्या माध्यमातून समाजात रुजल्याने ते आजही विचार रूपाने आमच्यात जिवंत असल्याच्या भावना मोठी उमरीतील ८४ वर्षीय शांताबाई नंदकुमार गवई यांनी महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या.

- राजू चिमणकरअकोला: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वैश्विक विचारांच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली. मानवता जोपासत त्यांनी समतेचा संदेश दिला. शिका, संघटीत व्हा! संघर्ष करा! या त्यांच्या आवाहनाने नवी पिढी जागरुक झाली. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हा विचार अंगीकारत समाजानेही क्रांतीची बिजे रोवली. बाबासाहेब हयात असताना समाजबांधवांना फार मोठे पाठबळ होते. त्यांच्या महापरिनिर्वाणाने अखिल मानवमन गहीवरून आले. त्यांनी दिलेला विचार धम्मक्रांतीच्या माध्यमातून समाजात रुजल्याने ते आजही विचार रूपाने आमच्यात जिवंत असल्याच्या भावना मोठी उमरीतील ८४ वर्षीय शांताबाई नंदकुमार गवई यांनी महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या. औरंगाबादमध्ये असताना सन १९५३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माझ्या घरी जेवण केल्याचे भाग्य मला लाभल्याचे सांगत आठवणींना उजाळा दिला.अकोल्याचा जन्मलेल्या शांताबाई यांचे वडील राजारामजी पळसपगार यांचा शेतीचा व्यवसाय. शिक्षणासाठी त्यांनी आग्रह धरलेला. शाळेची आवड कायम राहावी म्हणून दमणीत बसवून शाळेत सोडून द्यायचे. ते अकोल्यात सुरू झालेल्या वसतिगृहास अन्नधान्य देत होते. ते सेवाभावी वृत्तीचे होते. शांताबाई चौथीमध्ये असताना त्यांचे निधन झाले. शांताबार्इंचे अकोल्यातील तत्कालीन गर्व्हमेंट हायस्कूलमध्ये नववीपर्यंत शिक्षण झाले. औरंगाबाद येथील शासकीय अधिकारी सुधाकर वानखडे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. त्या छावनीतील शासकीय निवासस्थानी राहायला होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या औरंगाबादेतील मिलींद महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य डॉ. मनोहर नामदेव वानखडे हे शांताबार्इंचे जेठ त्यांच्यासोबतच राहायला होते. आंबेडकरी चळवळीच्या निमित्ताने बाबासाहेबांचे औरंगाबादला जाणे येणे असायचे. दरम्यानच्या काळात सन १९५३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे डॉ. म. ना. वानखडे यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी त्यांच्या घरी आले होते. त्यांच्यासोबत माईसाहेबही होत्या. त्यांच्या घरी त्यांनी जेवणही केले. बाबासाहेब यांना शांताबाई, त्यांच्या सासू मनोरमाबाई वानखडे यांनी जेवण वाढले. बाबासाहेबांनी बराच वेळ चर्चा केली. शांताबाई त्या वेळी २२ वर्षांच्या होत्या. त्यांचा मुलगा रत्नाकर वानखडे त्यावेळी दोन वर्षांचा असेल, रत्नाकरला बाबासाहेबांनी कडेवर घेऊन त्याचा लाडही केला होता. त्यांचे आमच्या घरी येणे म्हणजे आमच्या जगण्याला परिसाचा स्पर्श झाल्यासारखे होते, असेही शांताबाई म्हणाल्या. या प्रसंगाने आमच्या परिवाराचे आंबेडकरी चळवळीशी असलेले नाते अधिक घट्ट झाले, असेही त्या म्हणाल्या. डॉ.म. ना. वानखडे यांनी अस्मितादर्शची संकल्पना रुजवली.दरम्यान, पती सुधाकर वानखडे यांचे आजारामुळे निधन झाले. परिवाराला फार मोठा धक्का बसला. त्यानंतर शांताबाई माहेरी अकोल्यात आल्या. सन १९६३ मध्ये त्यांचा नंदकुमार गवई यांच्याशी दुसरा विवाह झाला. दरम्यानच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेत त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहून सक्षम बनण्याच्या उद्देशाने त्या आरोग्य सेविका म्हणून बाळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू झाल्या. कापशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्या २७ सप्टेंबर ११९२ ला सेवानिवृत्त झाल्या.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर