शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

बाबासाहेबांच्या  ‘त्या’ आठवांचा आजही गहीवर! - शांताबार्इंनी दिला स्मृतींना उजाळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 19:17 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार धम्मक्रांतीच्या माध्यमातून समाजात रुजल्याने ते आजही विचार रूपाने आमच्यात जिवंत असल्याच्या भावना मोठी उमरीतील ८४ वर्षीय शांताबाई नंदकुमार गवई यांनी महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या.

- राजू चिमणकरअकोला: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वैश्विक विचारांच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली. मानवता जोपासत त्यांनी समतेचा संदेश दिला. शिका, संघटीत व्हा! संघर्ष करा! या त्यांच्या आवाहनाने नवी पिढी जागरुक झाली. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हा विचार अंगीकारत समाजानेही क्रांतीची बिजे रोवली. बाबासाहेब हयात असताना समाजबांधवांना फार मोठे पाठबळ होते. त्यांच्या महापरिनिर्वाणाने अखिल मानवमन गहीवरून आले. त्यांनी दिलेला विचार धम्मक्रांतीच्या माध्यमातून समाजात रुजल्याने ते आजही विचार रूपाने आमच्यात जिवंत असल्याच्या भावना मोठी उमरीतील ८४ वर्षीय शांताबाई नंदकुमार गवई यांनी महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या. औरंगाबादमध्ये असताना सन १९५३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माझ्या घरी जेवण केल्याचे भाग्य मला लाभल्याचे सांगत आठवणींना उजाळा दिला.अकोल्याचा जन्मलेल्या शांताबाई यांचे वडील राजारामजी पळसपगार यांचा शेतीचा व्यवसाय. शिक्षणासाठी त्यांनी आग्रह धरलेला. शाळेची आवड कायम राहावी म्हणून दमणीत बसवून शाळेत सोडून द्यायचे. ते अकोल्यात सुरू झालेल्या वसतिगृहास अन्नधान्य देत होते. ते सेवाभावी वृत्तीचे होते. शांताबाई चौथीमध्ये असताना त्यांचे निधन झाले. शांताबार्इंचे अकोल्यातील तत्कालीन गर्व्हमेंट हायस्कूलमध्ये नववीपर्यंत शिक्षण झाले. औरंगाबाद येथील शासकीय अधिकारी सुधाकर वानखडे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. त्या छावनीतील शासकीय निवासस्थानी राहायला होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या औरंगाबादेतील मिलींद महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य डॉ. मनोहर नामदेव वानखडे हे शांताबार्इंचे जेठ त्यांच्यासोबतच राहायला होते. आंबेडकरी चळवळीच्या निमित्ताने बाबासाहेबांचे औरंगाबादला जाणे येणे असायचे. दरम्यानच्या काळात सन १९५३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे डॉ. म. ना. वानखडे यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी त्यांच्या घरी आले होते. त्यांच्यासोबत माईसाहेबही होत्या. त्यांच्या घरी त्यांनी जेवणही केले. बाबासाहेब यांना शांताबाई, त्यांच्या सासू मनोरमाबाई वानखडे यांनी जेवण वाढले. बाबासाहेबांनी बराच वेळ चर्चा केली. शांताबाई त्या वेळी २२ वर्षांच्या होत्या. त्यांचा मुलगा रत्नाकर वानखडे त्यावेळी दोन वर्षांचा असेल, रत्नाकरला बाबासाहेबांनी कडेवर घेऊन त्याचा लाडही केला होता. त्यांचे आमच्या घरी येणे म्हणजे आमच्या जगण्याला परिसाचा स्पर्श झाल्यासारखे होते, असेही शांताबाई म्हणाल्या. या प्रसंगाने आमच्या परिवाराचे आंबेडकरी चळवळीशी असलेले नाते अधिक घट्ट झाले, असेही त्या म्हणाल्या. डॉ.म. ना. वानखडे यांनी अस्मितादर्शची संकल्पना रुजवली.दरम्यान, पती सुधाकर वानखडे यांचे आजारामुळे निधन झाले. परिवाराला फार मोठा धक्का बसला. त्यानंतर शांताबाई माहेरी अकोल्यात आल्या. सन १९६३ मध्ये त्यांचा नंदकुमार गवई यांच्याशी दुसरा विवाह झाला. दरम्यानच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेत त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहून सक्षम बनण्याच्या उद्देशाने त्या आरोग्य सेविका म्हणून बाळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू झाल्या. कापशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्या २७ सप्टेंबर ११९२ ला सेवानिवृत्त झाल्या.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर