शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

८९ जणांना मिळाले हक्काचे घर !

By admin | Updated: January 20, 2015 00:47 IST

डोणगाव येथील ग्रामस्थांचा असाही पुढाकार, ग्रामसभेत घेतला ठराव.

सचिन गाभणे /डोणगाव (बुलडाणा): शासनाच्या इंदिरा आवास घरकुल योजनेंतर्गत येथील बेघरांना घरकुल मंजूर झाले; परंतु त्यांच्याकडे स्वत:ची जागाच नसल्याने त्यांना घरकुल योजनेपासून वंचित रहावे लागत होते. अशा बेघरांना हक्काचे घर मिळावे म्हणून ग्रामपंचायतने ८९ कुटुंबीयांना घरकुलासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देत बेघरांना हक्काचे घर उपलब्ध करून दिले. अन्न, वस्त्र, निवारा मानवाच्या मूलभूत गरजा समजल्या जातात. अन्न व वस्त्रासाठी मानव दिवसभर राबतो; मात्र एवढे करूनही या महागाईच्या काळात विसाव्यासाठी डोक्यावर हक्काचे छत तो उभारू शकत नाही. त्यामुळे शासनस्तरावरून घरकुलसारख्या योजना राबविल्या जातात. प्रत्येकाला आपले स्वत:चे घर असावे, असे वाटते. त्यानुसार शासनाच्या घरकुल योजनेत आपला समावेश होऊन हक्काचे घर मिळावे अशी धडपड अनेक बेघरांची सुरू असते. अनेकांजवळ शासनाच्या योजना असूनही स्वत:च्या मालकीची जागा घर बांधण्यासाठी नसते. शेवटी त्यांचा संसार उघड्यावरच राहतो असे चित्र आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायत अंतर्गत दारिद्रय़रेषेखालील लोकांना ह्यइंदिरा आवास घरकुलह्ण योजनेंतर्गत घरकुले मंजूर करून घरकुल बांधण्यासाठी शासनाच्यावतीने लाभार्थी यादी मंजूर झाली होती; परंतु अनेक लाभार्थ्यांजवळ मालकीची जागाच उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्यांना जागेअभावी घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागत होते. गावातील आपलेच बांधव स्वत:च्या घरापासून वंचित राहत असल्याचे समजताच सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र आले. त्यांनी सरंपच व ग्रामपंचायत सदस्यांशी चर्चा केली. सरपंच संजय आखाडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेऊन हक्काची जागा नसलेल्यांना घरकुलासाठी ते राहत असलेली अतिक्रमित शासकीय जागा मोजून देण्याचा ठराव घेतला. त्याचबरोबर त्या जागेची गाव नमुना आठ ह्यअह्ण ची नक्कलही सर्व लाभार्थ्यांना देण्यात आली. बेघरांच्या स्वप्नातील घरकुल साकार करण्यासाठी व शासनाची मदत इंदिरा आवास योजनेंतर्गत मिळण्यासाठी बेघरांना ग्रा.पं.च्या अख्त्यारीतील जागा देण्याच्या ग्रामस्थांच्या एकमुखी निर्णयाने ८९ कुटुंबीयांना हक्काचे छत मिळाले. दारिद्रय़रेषेखालील लाभार्थ्यांना गाव नमुना आठ 'अ' ची नक्कल देऊन त्यांच्या घराचे स्वप्न साकार केले. आणखी ६00 घरकुल प्रस्तावित आहेत. त्यात अनेकांकडे मालकीची जागा उपलब्ध नाही. त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून त्यांनाही हक्काचे घर देण्याचा प्रयत्न असल्याचे डोणगावचे सरपंच संजय आखाडे यांनी सांगीतले.