शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

अतिवृष्टीच्या तडाख्यात ग्रामीण भागात ७९ रस्त्यांचे नुकसान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:20 IST

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात २४५ किलोमीटर लांबीच्या ७९ रस्त्यांचे नुकसान झाले असून, ३५ कोटी ...

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात २४५ किलोमीटर लांबीच्या ७९ रस्त्यांचे नुकसान झाले असून, ३५ कोटी ६५ लाख रुपयांच्या रस्ते दुरुस्ती कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मंगळवारी शासनाकडे पाठविला.

जिल्ह्यात २१ जुलै रोजी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नदी व नाल्यांना पूर आला. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील विविध भागात रस्ते वाहून गेले. तसेच रस्त्यांवरील लहान पूल, मोऱ्या व रपट्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रस्त्यांचे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात दळणवळणावर परिणाम झाला. त्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७९ इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांचे नुकसान झाले असून, त्यामध्ये या रस्त्यांवरील ३७ लहान पूल, मोऱ्या व रपट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३५ कोटी ६५ लाख रुपयांच्या रस्ते दुरुस्ती कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत २७ जुलै रोजी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला.

सहा प्रमुख जिल्हा मार्गांचे नुकसान!

अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यातील सहा प्रमुख जिल्हा मार्गांचे आठ ते दहा किलोमीटर लांबीचे नुकसान झाले आहे. या मार्गाच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहे.

संपर्क तुटलेल्या गावांत तातडीच्या

कामांसाठी अंदाजपत्रक सादर !

अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील काही ठिकाणी रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात संपर्क तुटलेल्या गावांत तातडीने करावयाच्या दुरुस्तीच्या कामांसाठी ४३ लाख रुपयांचे कामांचे अंदाजपत्रक जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले. संपर्क तुटलेल्या गावांमध्ये तातडीने करावयाची दुरुस्तीची कामे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात येणार आहेत.

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात नुकसान झालेल्या ७९ इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांच्या दुरुस्ती कामांसाठी ३५ कोटी ६५ लाख रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. रस्ते दुरुस्ती कामांच्या या प्रस्तावात संबंधित रस्त्यांवरील लहान पूल, मोऱ्या व रपटे दुरुस्ती कामांचाही समावेश आहे. तसेच संपर्क तुटलेल्या गावांत तातडीने करावयाच्या दुरुस्तीच्या कामांसाठी ४३ लाख रुपयांच्या कामांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.

नरेश अघम

कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग.