शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

९ वर्षात वाढले ७८ लाख विजेचे ग्राहक

By admin | Updated: November 15, 2014 23:45 IST

विजेचा वापर वाढला साडेचार हजार मेगावॅटने.

विवेक चांदूरकर/ अकोला जसजशी राज्याची लोकसंख्या वाढत आहे, तसतसे शहरीकरण व औद्योगिकीकरणही वाढत आहे. त्यामुळे सहाजिकच विजेचा वापरही त्याच प्रमाणात वाढला. २00५ पासून २0१४ पर्यंत राज्यात ७८ लाखांच्यावर ग्राहक वाढले असून, या ९ वर्षात विजेचा वापर साडेचार हजार मेगावॅटने वाढला आहे. राज्याची लोकसंख्या ११ कोटीच्या जवळपास असून, शहरीकरण मोठय़ा प्रमाणात होत आहे. सोबतच विभक्त कुटुंबांच्या संख्येतही वाढ होत आहे. वीज ही आधुनिक युगात जीवनावश्यक बाब बनली असून विजेच्या मागणीतही मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. राज्यात महावितरणचे २00५ साली १ कोटी ३६ लाख ५६ हजार ग्राहक होते. १ ऑक्टोबर २0१४ पर्यंत यामध्ये ७८ लाख १६ हजार ग्राहकांनी वाढ होऊन आता राज्यात २ कोटी १४ लाख ७२ हजार ग्राहक झाले आहेत. एवढय़ा ग्राहकांना सेवा पुरविणारी महावितरण ही विद्युत क्षेत्रातील आशियातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. २00५ मध्ये राज्यात १२,५00 मेगावॅट विजेचा वापर होत होता. आता त्यामध्ये वाढ होऊन ऑक्टोबर २0१४ मध्ये १७ हजार मेगावॅटच्या वर विजेची मागणी होत आहे. विजेचा वापर वाढल्यामुळे वीज निर्मितीपासून, वीज ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यापर्यंत सर्वच बाबींचा विस्तार झाला आहे. राज्यात २00५ साली १ हजार ७७0 उपकेंद्र होते तर २0१४ साली त्यामध्ये ५१ टक्क्यांनी वाढ होऊन २ हजार ६८0 उपकेंद्र झाले आहेत. फिडरनिहाय भारनियमन करणारी महावितरण देशातील एकमेव कंपनी असून, ४२ टक्क्यांपेक्षा जास्त गळती असलेल्या भागात भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे विद्युत गळतीवर अंकुश मिळविण्यात महावितरणला काही प्रमाणात यश आले आहे. ज्या प्रमाणात विजेच्या ग्राहकांमध्ये वाढ होत आहे, त्या प्रमाणात वीज निर्मितीत वाढ होत नसल्याचे वास्तव आहे. महावितरणने गत दहा वर्षांमध्ये नवनवीन प्रयोग राबवून ग्राहकांना नियमित व अखंड वीज देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. सध्या विजेची मागणी १७ हजार मेगावॅट आहे. तरीही महावितरण संपूर्ण राज्यातील ग्राहकांपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करीत असल्याचे महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक (सांघिक महावि तरण) राम दोतोंडे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.