शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

९ वर्षात वाढले ७८ लाख विजेचे ग्राहक

By admin | Updated: November 15, 2014 23:45 IST

विजेचा वापर वाढला साडेचार हजार मेगावॅटने.

विवेक चांदूरकर/ अकोला जसजशी राज्याची लोकसंख्या वाढत आहे, तसतसे शहरीकरण व औद्योगिकीकरणही वाढत आहे. त्यामुळे सहाजिकच विजेचा वापरही त्याच प्रमाणात वाढला. २00५ पासून २0१४ पर्यंत राज्यात ७८ लाखांच्यावर ग्राहक वाढले असून, या ९ वर्षात विजेचा वापर साडेचार हजार मेगावॅटने वाढला आहे. राज्याची लोकसंख्या ११ कोटीच्या जवळपास असून, शहरीकरण मोठय़ा प्रमाणात होत आहे. सोबतच विभक्त कुटुंबांच्या संख्येतही वाढ होत आहे. वीज ही आधुनिक युगात जीवनावश्यक बाब बनली असून विजेच्या मागणीतही मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. राज्यात महावितरणचे २00५ साली १ कोटी ३६ लाख ५६ हजार ग्राहक होते. १ ऑक्टोबर २0१४ पर्यंत यामध्ये ७८ लाख १६ हजार ग्राहकांनी वाढ होऊन आता राज्यात २ कोटी १४ लाख ७२ हजार ग्राहक झाले आहेत. एवढय़ा ग्राहकांना सेवा पुरविणारी महावितरण ही विद्युत क्षेत्रातील आशियातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. २00५ मध्ये राज्यात १२,५00 मेगावॅट विजेचा वापर होत होता. आता त्यामध्ये वाढ होऊन ऑक्टोबर २0१४ मध्ये १७ हजार मेगावॅटच्या वर विजेची मागणी होत आहे. विजेचा वापर वाढल्यामुळे वीज निर्मितीपासून, वीज ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यापर्यंत सर्वच बाबींचा विस्तार झाला आहे. राज्यात २00५ साली १ हजार ७७0 उपकेंद्र होते तर २0१४ साली त्यामध्ये ५१ टक्क्यांनी वाढ होऊन २ हजार ६८0 उपकेंद्र झाले आहेत. फिडरनिहाय भारनियमन करणारी महावितरण देशातील एकमेव कंपनी असून, ४२ टक्क्यांपेक्षा जास्त गळती असलेल्या भागात भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे विद्युत गळतीवर अंकुश मिळविण्यात महावितरणला काही प्रमाणात यश आले आहे. ज्या प्रमाणात विजेच्या ग्राहकांमध्ये वाढ होत आहे, त्या प्रमाणात वीज निर्मितीत वाढ होत नसल्याचे वास्तव आहे. महावितरणने गत दहा वर्षांमध्ये नवनवीन प्रयोग राबवून ग्राहकांना नियमित व अखंड वीज देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. सध्या विजेची मागणी १७ हजार मेगावॅट आहे. तरीही महावितरण संपूर्ण राज्यातील ग्राहकांपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करीत असल्याचे महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक (सांघिक महावि तरण) राम दोतोंडे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.