शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

पाणीपुरवठा याेजनेचे ७५ काेटी अदा; तरीही कामे अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST

'अमृत' अभियानांतर्गत शहरात जलवाहिनीचे जाळे टाकण्याच्या माेबदल्यात कंत्राटदाराला ७५ काेटी रुपये देयक अदा करण्यात आले आहे. याेजनेचे केवळ दहा ...

'अमृत' अभियानांतर्गत शहरात जलवाहिनीचे जाळे टाकण्याच्या माेबदल्यात कंत्राटदाराला ७५ काेटी रुपये देयक अदा करण्यात आले आहे. याेजनेचे केवळ दहा टक्के काम बाकी असल्याचा दावा करणाऱ्या मनपाच्या जलप्रदाय विभागाकडून व तांत्रिक सल्लागार असलेल्या मजीप्रामार्फत देखरेख ठेवण्यात कुचराई केली जात असल्याने अद्यापही याेजना अर्धवट स्थितीत असल्याचे समाेर आले आहे. जलकुंभांची उभारणी केली परंतु त्यापर्यंत पाणी पाेहचत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

केंद्र व राज्य शासनाच्या अमृत अभियान अंतर्गत संपूर्ण शहरात जलवाहिनीचे नवीन जाळे टाकणे, महान धरण ते अकोला शहरापर्यंत मुख्य जलवाहिनीचे जाळे बदलणे या व्यतिरिक्त शहरात विविध ठिकाणी नवीन ८ जलकुंभ उभारण्याच्या कामासाठी शासनाने ११० कोटी रुपये निधी मंजूर केला होता. यापैकी मनपाने ८७ कोटी रुपयांची निविदा प्रकाशित केली. या कामासाठी 'एपी अँड जीपी' कंपनीची नियुक्ती केली. कंपनीमार्फत निकषानुसार किमान साडेतीन फूट अंतरावर जलवाहिनीचे जाळे टाकणे अपेक्षित असताना अवघ्या सव्वा ते दीड फूट अंतरावर जलवाहिनी टाकली जात आहे. मध्यंतरी या प्रकरणी शिवसेनेने आक्षेप घेतला असता, जलवाहिनीचे जाळे निकषानुसार टाकले नसल्याची बाब तांत्रिक सल्लागार असलेल्या मजीप्राने मान्य केली होती हे विशेष.

जलकुंभ उभारणीकडे पाठ

शहराची भविष्यातील लाेकसंख्या गृहीत धरुन नवीन आठ जलकुंभांच्या उभारणीचा समावेश हाेता. याेजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा मनपाकडून केला जात असला तरी आठव्या जलकुंभाची उभारणी करण्यास इच्छुक नसल्याचे अजब पत्र एजन्सीने मनपाला दिले,हे येथे उल्लेखनीय.

जलवाहिन्यांची जाेडणी केलीच नाही!

मुख्य जलवाहिन्या व प्रभागात अंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे टाकण्यात आले असले तरी अद्यापपर्यंत या दाेन्ही जलवाहिन्यांची एकमेकांशी जाेडणीच केली नाही. या कामासाठी बराच अवधी लागणार असल्याने एजन्सी काढता पाय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

मजीप्राला तीन टक्के कशासाठी?

‘अमृत अभियान’मध्ये शासनाने तांत्रिक सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नियुक्ती केली. प्रकल्पाच्या एकूण रकमेच्या बदल्यात मजीप्राला तीन टक्के प्रमाणे मनपाकडून आर्थिक मोबदला अदा केला जात आहे. मजीप्राकडून हाेणारे दुर्लक्ष पाहता तीन टक्के रक्कम कशासाठी, असा सवाल उपस्थित हाेत आहे.