शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा याेजनेचे ७५ काेटी अदा; तरीही कामे अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST

'अमृत' अभियानांतर्गत शहरात जलवाहिनीचे जाळे टाकण्याच्या माेबदल्यात कंत्राटदाराला ७५ काेटी रुपये देयक अदा करण्यात आले आहे. याेजनेचे केवळ दहा ...

'अमृत' अभियानांतर्गत शहरात जलवाहिनीचे जाळे टाकण्याच्या माेबदल्यात कंत्राटदाराला ७५ काेटी रुपये देयक अदा करण्यात आले आहे. याेजनेचे केवळ दहा टक्के काम बाकी असल्याचा दावा करणाऱ्या मनपाच्या जलप्रदाय विभागाकडून व तांत्रिक सल्लागार असलेल्या मजीप्रामार्फत देखरेख ठेवण्यात कुचराई केली जात असल्याने अद्यापही याेजना अर्धवट स्थितीत असल्याचे समाेर आले आहे. जलकुंभांची उभारणी केली परंतु त्यापर्यंत पाणी पाेहचत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

केंद्र व राज्य शासनाच्या अमृत अभियान अंतर्गत संपूर्ण शहरात जलवाहिनीचे नवीन जाळे टाकणे, महान धरण ते अकोला शहरापर्यंत मुख्य जलवाहिनीचे जाळे बदलणे या व्यतिरिक्त शहरात विविध ठिकाणी नवीन ८ जलकुंभ उभारण्याच्या कामासाठी शासनाने ११० कोटी रुपये निधी मंजूर केला होता. यापैकी मनपाने ८७ कोटी रुपयांची निविदा प्रकाशित केली. या कामासाठी 'एपी अँड जीपी' कंपनीची नियुक्ती केली. कंपनीमार्फत निकषानुसार किमान साडेतीन फूट अंतरावर जलवाहिनीचे जाळे टाकणे अपेक्षित असताना अवघ्या सव्वा ते दीड फूट अंतरावर जलवाहिनी टाकली जात आहे. मध्यंतरी या प्रकरणी शिवसेनेने आक्षेप घेतला असता, जलवाहिनीचे जाळे निकषानुसार टाकले नसल्याची बाब तांत्रिक सल्लागार असलेल्या मजीप्राने मान्य केली होती हे विशेष.

जलकुंभ उभारणीकडे पाठ

शहराची भविष्यातील लाेकसंख्या गृहीत धरुन नवीन आठ जलकुंभांच्या उभारणीचा समावेश हाेता. याेजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा मनपाकडून केला जात असला तरी आठव्या जलकुंभाची उभारणी करण्यास इच्छुक नसल्याचे अजब पत्र एजन्सीने मनपाला दिले,हे येथे उल्लेखनीय.

जलवाहिन्यांची जाेडणी केलीच नाही!

मुख्य जलवाहिन्या व प्रभागात अंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे टाकण्यात आले असले तरी अद्यापपर्यंत या दाेन्ही जलवाहिन्यांची एकमेकांशी जाेडणीच केली नाही. या कामासाठी बराच अवधी लागणार असल्याने एजन्सी काढता पाय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

मजीप्राला तीन टक्के कशासाठी?

‘अमृत अभियान’मध्ये शासनाने तांत्रिक सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नियुक्ती केली. प्रकल्पाच्या एकूण रकमेच्या बदल्यात मजीप्राला तीन टक्के प्रमाणे मनपाकडून आर्थिक मोबदला अदा केला जात आहे. मजीप्राकडून हाेणारे दुर्लक्ष पाहता तीन टक्के रक्कम कशासाठी, असा सवाल उपस्थित हाेत आहे.