शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

अकोला  जिल्ह्यात ७४ हजार शेतकऱ्यांचे ५१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 11:21 IST

Crop loss due to rain in Akola ७४ हजार ७४९ शेतकऱ्यांचे ५१ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.पाऊस व पुरामुळे जिल्ह्यात मूग पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

अकोला : यावर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सतत पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात ७४ हजार ७४९ शेतकऱ्यांचे ५१ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला असून, पीक नुकसानाचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

सतत पाऊस आणि नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी इत्यादी खरीप पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर गत जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत करण्यात आले असून, जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासनाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यात ७४ हजार ७४९ शेतकऱ्यांचे ५१ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पाऊस व पुराच्या तडाख्यात हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

मूग पिकाचे सर्वाधिक नुकसान!

प्रशासनाच्या अहवालानुसार पाऊस व पुरामुळे जिल्ह्यात मूग पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ३० हजार ५६५ हेक्टर क्षेत्रावरील मूग पिकाचे नुकसान झाले असून, त्यापाठोपाठ १३ हजार ८६९ हेक्टर क्षेत्रावरील उडीद, ३ हजार ४३४ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन व २ हजार ८४२ हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे.

पाऊस आणि पुरामुळे जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात ७४ हजार ७४९ शेतकऱ्यांचे ५१ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पीक नुकसानाचा अहवाल ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

- उदयकुमार नलवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी