शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाणीटंचाई निवारणासाठी ७.३० कोटींचा आराखडा मंजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 12:50 IST

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जानेवारी ते जून अखेरपर्यंतच्या कालावधीकरिता ७ कोटी ३० लाख २६ हजार रुपयांचा कृती आराखडा मंजूर करण्यात येत असल्याचा आदेश शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जानेवारी ते जून अखेरपर्यंतच्या कालावधीकरिता ७ कोटी ३० लाख २६ हजार रुपयांचा कृती आराखडा मंजूर करण्यात येत असल्याचा आदेश शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. कृती आराखड्यात जिल्ह्यातील ३१० गावांत पाणीटंचाई निवारणाच्या विविध ३६८ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यासह विविध भागात हिवाळ्यातच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने जून ते जून अखेरपर्यंत या कालावधीत जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकाºयांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. त्यानुषंगाने जिल्ह्यातील ३१० गावांसाठी विविध ३६० उपाययोजनांचा पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी २९ डिसेंबर रोजी दिला. पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांच्या कामांकरिता ७ कोटी ३० लाख २६ हजार रुपयांचा खर्च आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला.आराखड्यात प्रस्तावित अशा आहेत उपाययोजना!पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात विविध ३६८ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. त्यामध्ये १८६ विहिरींचे अधिग्रहण, २३ टँकरद्वारे पाणी पुरवठा, ५८ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, नऊ तात्पुरत्या पूरक नळ योजना, ५० नवीन विंधन विहिरी व ४२ नवीन कूपनलिकांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला