शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

महिनाभरापासून ६४ गावांना मिळाले नाही पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 12:41 IST

अकोला : ६४ गावांचा पाणी पुरवठा गत महिनाभरापासून बंद असल्याने, जीवाची लाही-लाही करणाऱ्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.

- संतोष येलकर

अकोला : जिल्ह्यात खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणी पुरवठा गत महिनाभरापासून बंद असल्याने, जीवाची लाही-लाही करणाऱ्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पुढारी आणि अधिकारी व्यस्त असल्याने, ६४ खेड्यातील पाणी प्रश्नाकडे कानाडोळा करण्यात येत आहे.खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून खांबोराजवळील उन्नई बंधाºयात पाणी सोडण्यात येते; परंतु पाणीसाठा उपलब्ध असला तरी पाणी पुरवठा करण्यासाठी खांबोरा येथील पाणी उचल करण्याचे पंप गत २४ मार्च रोजी नादुरस्त झाल्याने, योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत गावांना गत महिनाभरापासून पिण्याचे पाणी मिळाले नाही. जिवाची लाही-लाही करणाºया उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून, पुढारी आणि प्रशासनातील संबंधित अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने ६४ खेड्यातील पाणी प्रश्नाकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.पाणी विकत घेऊन भागविली जाते तहान !खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत महिनाभरापासून पाणी पुरवठा बंद असल्याने, योजनेंतर्गत गावातील ग्रामस्थांना १०० रुपये प्रती कोठी प्रमाणे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.गरिबांची ‘झिऱ्यां’वर धाव !महिनाभरापासून गावातील नळांना पाणी आले नसल्याने, ६४ गावांमधील काही ग्रामस्थ पाणी विकत घेऊन तहान भागवित आहेत; मात्र ज्यांना पाणी विकत घेऊन तहान भागविणे परवडणारे नाही, अशा गरीब ग्रामस्थांना तहान भागविण्यासाठी नदी-नाल्यातील ‘झिºयां’वर धाव घ्यावी लागत आहे. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिला-पुरुषांना दोन-तीन तास झिºयांवर ताटकळत बसावे लागत आहे.खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत गावांना महिनाभरापासून पिण्याचे पाणी मिळाले नाही, त्यामुळे पाणी विकत घेऊन ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे., तर पाणी विकत घेणे ज्यांना शक्य नाही, अशा गरीब ग्रामस्थांना झिºयातील पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने ६४ गावांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्याची उपाययोजना करणे गरजेचे आहे.-दिलीप मोहोडसरपंच, आखतवाडा तथाअध्यक्ष, बारुला विभाग कृती समिती.पाणी उचल करण्याचे पंप नादुरुस्त झाल्याने गत २४ मार्चपासून खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत गावांचा पाणी पुरवठा बंद आहे. पंप दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, मंगळवारपासून गावांना पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे.-अनिल चव्हाणशाखा अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई