शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरापासून ६४ गावांना मिळाले नाही पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 12:41 IST

अकोला : ६४ गावांचा पाणी पुरवठा गत महिनाभरापासून बंद असल्याने, जीवाची लाही-लाही करणाऱ्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.

- संतोष येलकर

अकोला : जिल्ह्यात खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणी पुरवठा गत महिनाभरापासून बंद असल्याने, जीवाची लाही-लाही करणाऱ्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पुढारी आणि अधिकारी व्यस्त असल्याने, ६४ खेड्यातील पाणी प्रश्नाकडे कानाडोळा करण्यात येत आहे.खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून खांबोराजवळील उन्नई बंधाºयात पाणी सोडण्यात येते; परंतु पाणीसाठा उपलब्ध असला तरी पाणी पुरवठा करण्यासाठी खांबोरा येथील पाणी उचल करण्याचे पंप गत २४ मार्च रोजी नादुरस्त झाल्याने, योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत गावांना गत महिनाभरापासून पिण्याचे पाणी मिळाले नाही. जिवाची लाही-लाही करणाºया उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून, पुढारी आणि प्रशासनातील संबंधित अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने ६४ खेड्यातील पाणी प्रश्नाकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.पाणी विकत घेऊन भागविली जाते तहान !खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत महिनाभरापासून पाणी पुरवठा बंद असल्याने, योजनेंतर्गत गावातील ग्रामस्थांना १०० रुपये प्रती कोठी प्रमाणे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.गरिबांची ‘झिऱ्यां’वर धाव !महिनाभरापासून गावातील नळांना पाणी आले नसल्याने, ६४ गावांमधील काही ग्रामस्थ पाणी विकत घेऊन तहान भागवित आहेत; मात्र ज्यांना पाणी विकत घेऊन तहान भागविणे परवडणारे नाही, अशा गरीब ग्रामस्थांना तहान भागविण्यासाठी नदी-नाल्यातील ‘झिºयां’वर धाव घ्यावी लागत आहे. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिला-पुरुषांना दोन-तीन तास झिºयांवर ताटकळत बसावे लागत आहे.खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत गावांना महिनाभरापासून पिण्याचे पाणी मिळाले नाही, त्यामुळे पाणी विकत घेऊन ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे., तर पाणी विकत घेणे ज्यांना शक्य नाही, अशा गरीब ग्रामस्थांना झिºयातील पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने ६४ गावांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्याची उपाययोजना करणे गरजेचे आहे.-दिलीप मोहोडसरपंच, आखतवाडा तथाअध्यक्ष, बारुला विभाग कृती समिती.पाणी उचल करण्याचे पंप नादुरुस्त झाल्याने गत २४ मार्चपासून खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत गावांचा पाणी पुरवठा बंद आहे. पंप दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, मंगळवारपासून गावांना पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे.-अनिल चव्हाणशाखा अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई