शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

कर्जमाफीतून पहिल्याच टप्प्यात ६३ हजार शेतकरी बाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:20 IST

अकोला : तत्त्वत: आणि निकषानुसार शेतकर्‍यांना कर्जमाफी देताना  ३0 जून २0१६ पर्यंत कर्ज थकीत असणार्‍यांच्या यादीतून पहिल्याच टप्प्यात ३२,0८३, तर अर्ज दाखल केल्यानंतर ३0,९५७ खातेधारक वगळल्याची माहिती आहे. एकूण ६३,0४0 हजार शेतकर्‍यांना पहिल्याच टप्प्यात वगळून शासनाने झटका दिला आहे.  

ठळक मुद्देअर्ज दाखल करताना ३१ हजार खातेदार वगळले!मदतीचा हात ‘देणार’ की ‘दाखविणार’!

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तत्त्वत: आणि निकषानुसार शेतकर्‍यांना कर्जमाफी देताना  ३0 जून २0१६ पर्यंत कर्ज थकीत असणार्‍यांच्या यादीतून पहिल्याच टप्प्यात ३२,0८३, तर अर्ज दाखल केल्यानंतर ३0,९५७ खातेधारक वगळल्याची माहिती आहे. एकूण ६३,0४0 हजार शेतकर्‍यांना पहिल्याच टप्प्यात वगळून शासनाने झटका दिला आहे.  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीचा लाभ देताना शेतकर्‍यांना भीक नको पण कुत्रे आवर, म्हणण्याची वेळ आणली. कर्जमाफीच्या निकषांची चाळणी लावून, ५0 टक्क्यांपेक्षा अधिक कर्जदार शेतकरी आधीच बाद करण्यात आले. त्याची प्रचिती अकोला जिल्ह्यातील अपात्र शेतकरी संख्येवरून येते. शासन निर्णय झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात ३0 जून २0१६ पर्यंत थकीत असलेल्या शेतकर्‍यांची संख्या मागवण्यात आली. अकोला जिल्ह्यात एकूण २,७९,000 पैकी २,0२,00३ शेतकरी त्यासाठी पहिल्या टप्प्यात पात्र समजण्यात आले. त्यानंतर सर्वच बँकांकडून ढोबळमानाचा आकडा घेण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यात एकूण १,६९,९२0 एवढे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे पुढे आले. त्या सर्व शेतकर्‍यांना ऑनलाइन अर्ज दाखल करण्याचे सांगितल्यानंतर ती संख्या आता १,३८,९६३ वर स्थिरावली आहे. त्या शेतकर्‍यांची आता निकषानुसार देय लाभासाठी पडताळणी सुरू आहे. त्यामध्ये आणखी २५ ते ३0 टक्के शेतकरी गळण्याची शक्यता आहे. अंतिमत: लाभ मिळण्यासाठी एकूण अर्जदार संख्येच्या ५0 टक्केही शेतकरी पात्र ठरणार की नाही, ही भीती आता निर्माण झाली आहे. 

मदतीचा हात ‘देणार’ की ‘दाखविणार’!निकषानुसार नियमित कर्ज भरणारे, पुनर्गठण करून कर्जाचा हप्ता भरणारे, त्यांना देय असलेल्या कर्जमाफी लाभाच्या कोणत्या योजनेत बसतात, यावरच प्रत्यक्ष लाभ पदरात पडणार आहे. त्यामुळे एवढा गाजावाजा झालेल्या योजनेतून शेतकर्‍यांना खरोखर मदतीचा हात दिला जातो की हात दाखवला जातो, हे लवकरच पुढे येणार आहे. 

अर्ज दाखल करताना शेतकर्‍यांनी दिलेल्या माहितीच्या पडताळणीतून कर्जमाफी योजनेच्या निकषानुसार पात्र लाभार्थीच्या प्राथमिक याद्यांची तयारी वेगात सुरू आहे. त्या याद्यातील खातेदारांना शासन निर्देशानुसार ठरलेल्या वेळी लाभ दिला जाईल.  - तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक. -