शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीतून पहिल्याच टप्प्यात ६३ हजार शेतकरी बाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:20 IST

अकोला : तत्त्वत: आणि निकषानुसार शेतकर्‍यांना कर्जमाफी देताना  ३0 जून २0१६ पर्यंत कर्ज थकीत असणार्‍यांच्या यादीतून पहिल्याच टप्प्यात ३२,0८३, तर अर्ज दाखल केल्यानंतर ३0,९५७ खातेधारक वगळल्याची माहिती आहे. एकूण ६३,0४0 हजार शेतकर्‍यांना पहिल्याच टप्प्यात वगळून शासनाने झटका दिला आहे.  

ठळक मुद्देअर्ज दाखल करताना ३१ हजार खातेदार वगळले!मदतीचा हात ‘देणार’ की ‘दाखविणार’!

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तत्त्वत: आणि निकषानुसार शेतकर्‍यांना कर्जमाफी देताना  ३0 जून २0१६ पर्यंत कर्ज थकीत असणार्‍यांच्या यादीतून पहिल्याच टप्प्यात ३२,0८३, तर अर्ज दाखल केल्यानंतर ३0,९५७ खातेधारक वगळल्याची माहिती आहे. एकूण ६३,0४0 हजार शेतकर्‍यांना पहिल्याच टप्प्यात वगळून शासनाने झटका दिला आहे.  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीचा लाभ देताना शेतकर्‍यांना भीक नको पण कुत्रे आवर, म्हणण्याची वेळ आणली. कर्जमाफीच्या निकषांची चाळणी लावून, ५0 टक्क्यांपेक्षा अधिक कर्जदार शेतकरी आधीच बाद करण्यात आले. त्याची प्रचिती अकोला जिल्ह्यातील अपात्र शेतकरी संख्येवरून येते. शासन निर्णय झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात ३0 जून २0१६ पर्यंत थकीत असलेल्या शेतकर्‍यांची संख्या मागवण्यात आली. अकोला जिल्ह्यात एकूण २,७९,000 पैकी २,0२,00३ शेतकरी त्यासाठी पहिल्या टप्प्यात पात्र समजण्यात आले. त्यानंतर सर्वच बँकांकडून ढोबळमानाचा आकडा घेण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यात एकूण १,६९,९२0 एवढे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे पुढे आले. त्या सर्व शेतकर्‍यांना ऑनलाइन अर्ज दाखल करण्याचे सांगितल्यानंतर ती संख्या आता १,३८,९६३ वर स्थिरावली आहे. त्या शेतकर्‍यांची आता निकषानुसार देय लाभासाठी पडताळणी सुरू आहे. त्यामध्ये आणखी २५ ते ३0 टक्के शेतकरी गळण्याची शक्यता आहे. अंतिमत: लाभ मिळण्यासाठी एकूण अर्जदार संख्येच्या ५0 टक्केही शेतकरी पात्र ठरणार की नाही, ही भीती आता निर्माण झाली आहे. 

मदतीचा हात ‘देणार’ की ‘दाखविणार’!निकषानुसार नियमित कर्ज भरणारे, पुनर्गठण करून कर्जाचा हप्ता भरणारे, त्यांना देय असलेल्या कर्जमाफी लाभाच्या कोणत्या योजनेत बसतात, यावरच प्रत्यक्ष लाभ पदरात पडणार आहे. त्यामुळे एवढा गाजावाजा झालेल्या योजनेतून शेतकर्‍यांना खरोखर मदतीचा हात दिला जातो की हात दाखवला जातो, हे लवकरच पुढे येणार आहे. 

अर्ज दाखल करताना शेतकर्‍यांनी दिलेल्या माहितीच्या पडताळणीतून कर्जमाफी योजनेच्या निकषानुसार पात्र लाभार्थीच्या प्राथमिक याद्यांची तयारी वेगात सुरू आहे. त्या याद्यातील खातेदारांना शासन निर्देशानुसार ठरलेल्या वेळी लाभ दिला जाईल.  - तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक. -