शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

फासेपारधी कुटुंबाची गर्भवती, चिमुकल्यांसह ६०० कि.मी.ची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 10:16 IST

दररोज ३० ते ४० किलोमीटर पायपीट करीत मजल दरमजल करीत त्यांनी १६ दिवसांच्या प्रवासानंतर गुरुवारी सायंकाळी निंबा फाटा गाठले.

- विलास बोरचाटे लोकमत न्यूज नेटवर्कनिंबा फाटा : अकोट तालुक्यातील अंबोडा येथील फासेपारधी समाजाचे भोसले व पवार कुटुंब उदरनिर्वाहाकरिता नाशिक येथे वास्तव्यास होते. बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या या कुटुंबावर लॉकडाउनमुळे उपासमारीची पाळी आली. त्यामुळे घर गाठण्यासाठी सुरू केलेला ६०० कि.मी.चा पायी प्रवास पाय रक्ताळले तरी संपत नव्हता. २ मे रोजी सायंकाळी १६ दिवस प्रवासानंतर त्यांनी निंबा फाटा गाठले; मात्र आता निंबा फाटा येथून आंबोडा येथील घर ४० किमीवरच असल्याची माहिती मिळताच या कुटुंबाचे चेहºयावर आपण फार मोठा पल्ला गाठल्याचा आनंद दिसत होता. भुकेची व्याकुळता होती.कोरोनाच्या महामारीच्या पृष्ठभूमीवर २३ मार्चपासून लॉकडाउन घोषित झाले आणि सर्व उद्योगधंदे ठप्प झाले.स्थलांतरित मोलमजुरी करून पोट भरणाºया मजुरांवर तर आभाळच कोसळले. अशीच परिस्थिती नाशिक येथे बांधकाम मजूर म्हणून काम करणाºया अकोट तालुक्यातील आंबोडा येथील दीपक भोसले (३५) त्यांची सात महिन्यांची गर्भवती पत्नी शिवगंगा भोसले, भाऊ बिरजू भोसले, मुली सारिका पाच वर्षे, दिया तीन वर्षे व मुलगा दीपक एक वर्ष यासह पवार कुटुंबातील वदळबाई रतन पवार (५५), आकाश पवार, पत्नी हलवा आकाश पवार, मुलगा रोहित वय ८, मुलगी शिक्षा ४, मुलगी मिक्षा २ वर्षे अशा १२ जणांचा गरीब परिवार मोलमजुरी करून आपले पोट भरायचा.या कुटुंबाला पोसणाºया दीपक, बिरजू व आकाश यांचे लॉकडाउनमुळे हातचे काम गेले. जवळ पैसा नाही, अन्नधान्य नाही. महिना उलटूनही लॉकडाउन संपत नसल्यामुळे या दोन्ही परिवाराने नाइलाजास्तव नाशिक येथून अकोट तालुक्यातील आंबोडा गाव गाठण्याचा निश्चय केला आणि सुरू झाला ६०० कि.मी.चा पायी प्रवास.चिमुकली मुले म्हातारी आई व गर्भवती पत्नीसह दररोज ३० ते ४० किलोमीटर पायपीट करीत मजल दरमजल करीत त्यांनी १६ दिवसांच्या प्रवासानंतर गुरुवारी सायंकाळी निंबा फाटा गाठले. येथून आंबोडा ४० कि.मी. असल्याचे कळताच आपण घराजवळ आल्याचे व फार मोठा पल्ला गाठल्याचा आनंद झाला होता; मात्र उपाशीपोटी असल्यामुळे त्यांनी निंबा फाटा येथे विसावा घेतला.

दानशूरांची मदतया भुकेलेल्या कुटुंबाची निंबा येथील गोपालशेट चितलांगे यांनी जेवणाची व्यवस्था केली, तर सायंकाळची चूल पेटावी म्हणून कवठा येथील स्वस्त धान्य दुकानदार पुरुषोत्तम घ्यारे यांनी त्यांना २० किलो तांदूळ मोफत दिले. लॉकडाउनमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांचा स्वगृही परतण्याकरिता शासनाने निर्णय घेतला आहे; मात्र आॅनलाइन अर्जाच्या माहितीअभावी भोसले व पवार यांच्यासारखी अनेक गरीब कुटुंबे आजही राष्ट्रीय महामार्गावर घर गाठण्यासाठी पायपीट करीत असल्याचे भयानक वास्तवही नाकारता येणार नाही.

टॅग्स :Akolaअकोला