शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

पातूर तालुक्यातील ५,८३६ हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:32 IST

पांढुर्णा: पातूर तालुक्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने धरणे तुडुंब भरलेली आहेत. त्यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. ...

पांढुर्णा: पातूर तालुक्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने धरणे तुडुंब भरलेली आहेत. त्यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. येथून जवळच असलेल्या निर्गुणा चोंढी धरणातून शुक्रवारी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील जवळपास १९ गावातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, तालुक्यातील ५,८३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यंदा अतिपावसामुळे खरीप हंगामात पिकांची नासाडी झाली होती. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांपासून आशा आहे. रब्बी हंगामासाठी निर्गुणा येथील चोंढी धरण हे वरदान ठरत आहे. शुक्रवारी धरणातून पाटबंधारे विभागातर्फे कॅनॉलमधून पाणी सोडण्यात आले. यामुळे चोंढी, चारमोळी, घोटमाळ, जांभ, आलेगाव, कार्ला, पिंपळडोळी, शेकापूर, भानुस, सस्ती, आसोला, अंबाशी, चरणगाव, विवरा, देऊळगाव, बाभूळगाव, तांदळी, बेलुरा आदी गावातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाटबंधारे विभागाच्यावतीने शुक्रवारी येथील धरणावर मशीनची पूजा करून पाणी सोडण्यात आले. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी वैभव आखाडे, आयुशी अग्रवाल, आत्तरकर, बाणचार, भावसर यांसह कर्मचारी उपस्थित होते. (फोटो)

------------------------हरभऱ्याचे क्षेत्र वाढले!

यंदा परिसरात रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. चोंढी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गतवर्षी गव्हाला भाव नसल्याने शेतकऱ्यांना नापसंती दर्शविली आहे, तसेच उन्हाळी भुईमूग पिकापासून शेतकऱ्यांना आशा आहे.