शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

विज्ञान शाखेच्या ५५ टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 11:17 IST

९८ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखा प्रवेशासाठी केवळ ३ हजार ५00 विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत

- नितीन गव्हाळे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : इयत्ता अकरावी विज्ञान शाखेच्या आॅनलाइन प्रवेशाची प्रक्रिया १२ आॅगस्टपासून सुरू करण्यात आली. गत आठ दिवसांमध्ये शहरातील ९८ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखा प्रवेशासाठी केवळ ३ हजार ५00 विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेच्या एकूण ८ हजार ९५५ जागा आहे. यंदा कोरोनाचा फटका प्रवेश प्रक्रियेलासुद्धा बसणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत. प्रवेश अर्ज कमी आल्यामुळे यंदा ५५ टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यावर्षी इ. दहावीचा निकाल ९५ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून ८ हजार ९३८ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत तर प्रथम श्रेणीत ९ हजार ९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे यंदा विज्ञान शाखेच्या जागा कमी पडतील, असे वाटत होते; परंतु कोरोनामुळे तालुका ठिकाणांवरील विद्यार्थ्यांनी यंदा शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशाकडे पाठ फिरविली आहे. तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्येच प्रवेश घेण्यावर विद्यार्थ्यांचा भर दिसत आहेत. दरवर्षी जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यांमधील विद्यार्थीसुद्धा विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासोबतच खासगी शिकवणी वर्गांसाठी अकोला शहराकडे धाव घेत होते; मात्र कोरोनाच्या धास्तीमुळे पालक आता विद्यार्थ्यांना बाहेरगावी पाठवायला तयार दिसत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्याचा परिणाम शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेवर झालेला दिसून येत आहेत. अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची २0 आॅगस्ट अखेरची मुदत होती. २५ आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांची गुणवत्ता, आरक्षणनिहाय यादी प्रकाशित होणार आहे. उशिरा सायंकाळपर्यंत आणखी ५00 ते ६00 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज येणार आहे. साडेचार हजारापर्यंत विद्यार्थ्यांचे आले तरी उर्वरित ४ हजार ४५५ जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास, त्यांनी प्रवेश प्रक्रिया समिती, भारत स्काउट गाइड कार्यालयात संपर्क साधावा, अशी माहिती प्रवेश प्रक्रिया समितीचे सचिव प्राचार्य गजानन चौधरी यांनी दिली.

तालुक्यातील महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा कलकोरोनाच्या पृष्ठभूमीवर पालक सतर्क झाले आहेत. आॅनलाइन शिक्षणाचे महत्त्व वाढल्यामुळे आता पालक, विद्यार्थ्यांचा शहरात येण्याचा कल कमी दिसत आहे. शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यापेक्षा तालुक्यांमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे अधिक कल दिसून येत आहे.

१ सप्टेंबरपासून प्रवेशाची दुसरी फेरीशिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ज्या महाविद्यालयांमधील विज्ञान शाखेच्या जागा भरल्या गेल्या, ती महाविद्यालये वगळून इतर महाविद्यालयांमधील विज्ञान शाखेच्या जागांवर आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र