शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान शाखेच्या ५५ टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 11:17 IST

९८ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखा प्रवेशासाठी केवळ ३ हजार ५00 विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत

- नितीन गव्हाळे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : इयत्ता अकरावी विज्ञान शाखेच्या आॅनलाइन प्रवेशाची प्रक्रिया १२ आॅगस्टपासून सुरू करण्यात आली. गत आठ दिवसांमध्ये शहरातील ९८ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखा प्रवेशासाठी केवळ ३ हजार ५00 विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेच्या एकूण ८ हजार ९५५ जागा आहे. यंदा कोरोनाचा फटका प्रवेश प्रक्रियेलासुद्धा बसणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत. प्रवेश अर्ज कमी आल्यामुळे यंदा ५५ टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यावर्षी इ. दहावीचा निकाल ९५ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून ८ हजार ९३८ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत तर प्रथम श्रेणीत ९ हजार ९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे यंदा विज्ञान शाखेच्या जागा कमी पडतील, असे वाटत होते; परंतु कोरोनामुळे तालुका ठिकाणांवरील विद्यार्थ्यांनी यंदा शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशाकडे पाठ फिरविली आहे. तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्येच प्रवेश घेण्यावर विद्यार्थ्यांचा भर दिसत आहेत. दरवर्षी जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यांमधील विद्यार्थीसुद्धा विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासोबतच खासगी शिकवणी वर्गांसाठी अकोला शहराकडे धाव घेत होते; मात्र कोरोनाच्या धास्तीमुळे पालक आता विद्यार्थ्यांना बाहेरगावी पाठवायला तयार दिसत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्याचा परिणाम शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेवर झालेला दिसून येत आहेत. अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची २0 आॅगस्ट अखेरची मुदत होती. २५ आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांची गुणवत्ता, आरक्षणनिहाय यादी प्रकाशित होणार आहे. उशिरा सायंकाळपर्यंत आणखी ५00 ते ६00 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज येणार आहे. साडेचार हजारापर्यंत विद्यार्थ्यांचे आले तरी उर्वरित ४ हजार ४५५ जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास, त्यांनी प्रवेश प्रक्रिया समिती, भारत स्काउट गाइड कार्यालयात संपर्क साधावा, अशी माहिती प्रवेश प्रक्रिया समितीचे सचिव प्राचार्य गजानन चौधरी यांनी दिली.

तालुक्यातील महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा कलकोरोनाच्या पृष्ठभूमीवर पालक सतर्क झाले आहेत. आॅनलाइन शिक्षणाचे महत्त्व वाढल्यामुळे आता पालक, विद्यार्थ्यांचा शहरात येण्याचा कल कमी दिसत आहे. शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यापेक्षा तालुक्यांमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे अधिक कल दिसून येत आहे.

१ सप्टेंबरपासून प्रवेशाची दुसरी फेरीशिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ज्या महाविद्यालयांमधील विज्ञान शाखेच्या जागा भरल्या गेल्या, ती महाविद्यालये वगळून इतर महाविद्यालयांमधील विज्ञान शाखेच्या जागांवर आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र