शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

२00 गावांमध्ये ५५ कोटींची कामे

By admin | Updated: January 26, 2015 01:31 IST

‘जलयुक्त शिवार’मध्ये ३३ हजार हेक्टरवरील ढाळीच्या बांधासह विविध कामांचा समावेश.

संतोष येलकर / अकोला:टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील २00 गावांमध्ये ५५ कोटी ५४ लाख ४९ हजार रुपयांची जलसंधारणाची कामे जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणार आहेत. त्यामध्ये ३३ हजार हेक्टरवर ढाळीच्या बांधासह विविध कामांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, जिल्ह्यात सोमवारपासून जलयुक्त शिवार अभियानातील कामांना प्रारंभ करण्यात येणार आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील विविध भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात वारंवार उद्भवणार्‍या टंचाई परिस्थितीवर मात करण्याकरिता आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने गेल्या नोव्हेंबरमध्ये घेतला. या अभियानाच्या अंमलबजावणीत अकोला जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील गावांची निवड करून, प्राधान्याने करावयाच्या जलसंधारणाच्या कामांचा आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील सातही तालुक्यात निवड करण्यात आलेल्या २00 गावांमध्ये ५५ कोटी ५४ लाख ४९ हजार रुपयांची विविध जलसंधारणाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार अभियानातील या कामांना २६ जानेवारीपासून सुरुवात केली जाणार आहे.