शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

वऱ्हाडात ५० टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:52 IST

आजमितीस ५०२ प्रकल्पांमध्ये केवळ ५०.११ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत यावर्षी ९० टक्क्यांवर पाऊस पडला आहे. पिकांना पोषक ठरणाऱ्या या पावसामुळे शेतकरी आनंदित आहेत; परंतु पावसाचे तीन महिने संपूनही धरणांच्या जल पातळीत पूरक वाढ झाली नाही. गत तीन ते चार वर्षांपासून टंचाईचे चटके सहन करणाºया या भागातील जनतेला आता पिण्याच्या पाण्यासाठी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, आजमितीस ५०२ प्रकल्पांमध्ये केवळ ५०.११ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.जुलै-आॅगस्ट महिन्याच्या सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत पावसाच्या आकड्यात वाढ झालेली असली तरी धरणांच्या साठ्यात मात्र अपेक्षित वाढ झालेली नाही. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाºया काटेपूर्णा विस्ताराने मोठे असलेल्या या धरणात आजमितीस केवळ ८.३४ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ९.६६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा मोठ्या धरणात २३.३७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पेनटाकळीमध्ये यावर्षी बºयापैकी ७८.४२ टक्के साठा असला तरी खडकपूर्णा धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पात ८२.८५ टक्के जलसाठा संचयित झाला असून, मोर्णा मध्यम प्रकल्पात २३.८५ टक्के जलसाठा आहे. निर्गुणा प्रकल्पात १७.३०, टक्के उमा प्रकल्पात ११.५६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. अमरावती जिल्ह्यातील मोठ्या अप्पर वर्धा प्रकल्पात ६८.७६ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी पूसमध्ये केवळ ४०.०७ टक्के, अरुणावती प्रकल्पात १२.१६ टक्के जलसाठा आहे. बेंबळा प्रकल्पात मात्र ८१.७९ टक्के पाणी आले आहे.

 मोठ्या नऊ प्रकल्पांत ५२.४७ टक्के साठाअमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत असलेल्या नऊ मोठ्या सिंचन प्रकल्पात आजमितीस ५२.४७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. २४ मध्यम प्रकल्पांत ५८.४२ तर ४६९ लघू प्रकल्पांत ४१.९८ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. पावसाळ्याचे आता तीन महिने संपले असून, आता येणारा पाऊस बिनभरवशाचा असतो. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDamधरण