शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

वऱ्हाडात ५० टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:52 IST

आजमितीस ५०२ प्रकल्पांमध्ये केवळ ५०.११ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत यावर्षी ९० टक्क्यांवर पाऊस पडला आहे. पिकांना पोषक ठरणाऱ्या या पावसामुळे शेतकरी आनंदित आहेत; परंतु पावसाचे तीन महिने संपूनही धरणांच्या जल पातळीत पूरक वाढ झाली नाही. गत तीन ते चार वर्षांपासून टंचाईचे चटके सहन करणाºया या भागातील जनतेला आता पिण्याच्या पाण्यासाठी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, आजमितीस ५०२ प्रकल्पांमध्ये केवळ ५०.११ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.जुलै-आॅगस्ट महिन्याच्या सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत पावसाच्या आकड्यात वाढ झालेली असली तरी धरणांच्या साठ्यात मात्र अपेक्षित वाढ झालेली नाही. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाºया काटेपूर्णा विस्ताराने मोठे असलेल्या या धरणात आजमितीस केवळ ८.३४ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ९.६६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा मोठ्या धरणात २३.३७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पेनटाकळीमध्ये यावर्षी बºयापैकी ७८.४२ टक्के साठा असला तरी खडकपूर्णा धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पात ८२.८५ टक्के जलसाठा संचयित झाला असून, मोर्णा मध्यम प्रकल्पात २३.८५ टक्के जलसाठा आहे. निर्गुणा प्रकल्पात १७.३०, टक्के उमा प्रकल्पात ११.५६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. अमरावती जिल्ह्यातील मोठ्या अप्पर वर्धा प्रकल्पात ६८.७६ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी पूसमध्ये केवळ ४०.०७ टक्के, अरुणावती प्रकल्पात १२.१६ टक्के जलसाठा आहे. बेंबळा प्रकल्पात मात्र ८१.७९ टक्के पाणी आले आहे.

 मोठ्या नऊ प्रकल्पांत ५२.४७ टक्के साठाअमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत असलेल्या नऊ मोठ्या सिंचन प्रकल्पात आजमितीस ५२.४७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. २४ मध्यम प्रकल्पांत ५८.४२ तर ४६९ लघू प्रकल्पांत ४१.९८ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. पावसाळ्याचे आता तीन महिने संपले असून, आता येणारा पाऊस बिनभरवशाचा असतो. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDamधरण