शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
4
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
5
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
6
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
7
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
8
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
9
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
10
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
11
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
12
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
13
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
15
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच संपवले जीवन; पालकांचा शिक्षकावर गंभीर आरोप
16
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
17
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
18
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
19
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
20
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडात ५० टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:52 IST

आजमितीस ५०२ प्रकल्पांमध्ये केवळ ५०.११ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत यावर्षी ९० टक्क्यांवर पाऊस पडला आहे. पिकांना पोषक ठरणाऱ्या या पावसामुळे शेतकरी आनंदित आहेत; परंतु पावसाचे तीन महिने संपूनही धरणांच्या जल पातळीत पूरक वाढ झाली नाही. गत तीन ते चार वर्षांपासून टंचाईचे चटके सहन करणाºया या भागातील जनतेला आता पिण्याच्या पाण्यासाठी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, आजमितीस ५०२ प्रकल्पांमध्ये केवळ ५०.११ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.जुलै-आॅगस्ट महिन्याच्या सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत पावसाच्या आकड्यात वाढ झालेली असली तरी धरणांच्या साठ्यात मात्र अपेक्षित वाढ झालेली नाही. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाºया काटेपूर्णा विस्ताराने मोठे असलेल्या या धरणात आजमितीस केवळ ८.३४ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ९.६६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा मोठ्या धरणात २३.३७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पेनटाकळीमध्ये यावर्षी बºयापैकी ७८.४२ टक्के साठा असला तरी खडकपूर्णा धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पात ८२.८५ टक्के जलसाठा संचयित झाला असून, मोर्णा मध्यम प्रकल्पात २३.८५ टक्के जलसाठा आहे. निर्गुणा प्रकल्पात १७.३०, टक्के उमा प्रकल्पात ११.५६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. अमरावती जिल्ह्यातील मोठ्या अप्पर वर्धा प्रकल्पात ६८.७६ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी पूसमध्ये केवळ ४०.०७ टक्के, अरुणावती प्रकल्पात १२.१६ टक्के जलसाठा आहे. बेंबळा प्रकल्पात मात्र ८१.७९ टक्के पाणी आले आहे.

 मोठ्या नऊ प्रकल्पांत ५२.४७ टक्के साठाअमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत असलेल्या नऊ मोठ्या सिंचन प्रकल्पात आजमितीस ५२.४७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. २४ मध्यम प्रकल्पांत ५८.४२ तर ४६९ लघू प्रकल्पांत ४१.९८ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. पावसाळ्याचे आता तीन महिने संपले असून, आता येणारा पाऊस बिनभरवशाचा असतो. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDamधरण