शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

पातूर तालुक्यातील ११४ बचत गटांचे पन्नास लाख रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 01:15 IST

शिर्ला :  केंद्र सरकारच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बालकांना दिला जाणार्‍या पूरक पोषण आहाराचे पातूर तालुक्यातील ११४ बचत गटांचे गेल्या दहा महिन्यांपासून सुमारे पन्नास लाख रुपये अनुदान शासनाकडे रखडले आहेत.

ठळक मुद्देपोषण आहार योजना पातूर तालुक्यातील ११४ बचत गट अडचणीत!

संतोषकुमार गवई । लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला :  केंद्र सरकारच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बालकांना दिला जाणार्‍या पूरक पोषण आहाराचे पातूर तालुक्यातील ११४ बचत गटांचे गेल्या दहा महिन्यांपासून सुमारे पन्नास लाख रुपये अनुदान शासनाकडे रखडले आहेत.सन १९७५ला राज्यात केंद्र सरकारने कार्यान्वित करण्यात आलेल्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे बळकटीकरण आणि पुनर्रचना करून एप्रिल २0१७ नव्या स्वरूपात सदर योजना अकोलासह २0 जिल्ह्यात कार्यान्वित केली. तीव्र कमी वजनाच्या बालकासह सर्वसाधारण बालकांसाठी सदर पोषण आहार योजना बालविकास कार्यक्रमाची फलनिष्पत्ती साधण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. पातूर तालुक्यात  0ते ६ वयोगटात ११ हजार 0७९ बालक,0३ ते 0६ गटातील ३ हजार ९१५ बालक, ८७१ स्तनदा माता,८२३ गरोदर मातांना १२१ अंगणवाडी आणि १९ मिनी अंगणवाडी एकूण १४0 अंगणवाड्यातून ११४ बचत गटांच्या माध्यमातून प्रतिदिन प्रति लाभार्थी यांच्यासाठी सकस पूरक पोषण आहार दिला जातो. यासाठी शासन प्रतिदिन प्रति लाभार्थी बचत गटांना सहा रुपये मोबदला देते.गेल्या दहा महिन्यांपासून बचत गट स्वत: सकस पूरक आहार शिजवून रेडी टू इट या प्रणालीद्वारे प्रतिदिन प्रति लाभार्थींना अंगणवाडीत आणून देतात; मात्र शासनाने ११४ बचत गटांचे प्रतिमाह ५ लाख याप्रमाणे सुमारे दहा महिन्यांपासून एक छदाम बचत गटांना दिला नसल्याने अडचणीत आलेल्या गटांना आहार तरी कसा पुरवावा, असा यक्ष प्रश्न पडला आहे.

महाराष्ट्र शासनाकडे निधीची मागणी केली आहे. तरतूद झाल्यावर बचत गटांचे अन्न शिजवून देण्याचे प्रतिदिन प्रति लाभार्थी सहा रुपये अनुदान वितरीत करण्यात येईल. - योगेश जवादे, महिला व बाल विकास अधिकारी, जि.प.अकोला.

 

बचत गटांना प्रतिदिन प्रति लाभार्थी दिले जाणारे मोबदला निधीची मागणी वरिष्ठ स्तरावर गेल्या फेब्रुवारी २0१७ पासून केली जात आहे.- समाधान राठोड, महिला व बाल प्रकल्प विकास अधिकारी, पातूर.

 

आहार देण्यासाठी वाटाणे, तांदूळ, पोहे कांदे,मुरमुरे ,तेल मसाला आदी विकत आणण्यासाठी पैसे लागतात; मात्र शासनाने दहा महिन्यांपासून पैसेच दिले नाहीत. त्यामुळे आहार तरी कसा पुरवावा, असे संकट आम्हाला पडले आहे.- सुनीता अनिल गिर्हे, वटेश्‍वर महिला बचतगट, खानापूर.