शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पातूर तालुक्यातील ११४ बचत गटांचे पन्नास लाख रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 01:15 IST

शिर्ला :  केंद्र सरकारच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बालकांना दिला जाणार्‍या पूरक पोषण आहाराचे पातूर तालुक्यातील ११४ बचत गटांचे गेल्या दहा महिन्यांपासून सुमारे पन्नास लाख रुपये अनुदान शासनाकडे रखडले आहेत.

ठळक मुद्देपोषण आहार योजना पातूर तालुक्यातील ११४ बचत गट अडचणीत!

संतोषकुमार गवई । लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला :  केंद्र सरकारच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बालकांना दिला जाणार्‍या पूरक पोषण आहाराचे पातूर तालुक्यातील ११४ बचत गटांचे गेल्या दहा महिन्यांपासून सुमारे पन्नास लाख रुपये अनुदान शासनाकडे रखडले आहेत.सन १९७५ला राज्यात केंद्र सरकारने कार्यान्वित करण्यात आलेल्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे बळकटीकरण आणि पुनर्रचना करून एप्रिल २0१७ नव्या स्वरूपात सदर योजना अकोलासह २0 जिल्ह्यात कार्यान्वित केली. तीव्र कमी वजनाच्या बालकासह सर्वसाधारण बालकांसाठी सदर पोषण आहार योजना बालविकास कार्यक्रमाची फलनिष्पत्ती साधण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. पातूर तालुक्यात  0ते ६ वयोगटात ११ हजार 0७९ बालक,0३ ते 0६ गटातील ३ हजार ९१५ बालक, ८७१ स्तनदा माता,८२३ गरोदर मातांना १२१ अंगणवाडी आणि १९ मिनी अंगणवाडी एकूण १४0 अंगणवाड्यातून ११४ बचत गटांच्या माध्यमातून प्रतिदिन प्रति लाभार्थी यांच्यासाठी सकस पूरक पोषण आहार दिला जातो. यासाठी शासन प्रतिदिन प्रति लाभार्थी बचत गटांना सहा रुपये मोबदला देते.गेल्या दहा महिन्यांपासून बचत गट स्वत: सकस पूरक आहार शिजवून रेडी टू इट या प्रणालीद्वारे प्रतिदिन प्रति लाभार्थींना अंगणवाडीत आणून देतात; मात्र शासनाने ११४ बचत गटांचे प्रतिमाह ५ लाख याप्रमाणे सुमारे दहा महिन्यांपासून एक छदाम बचत गटांना दिला नसल्याने अडचणीत आलेल्या गटांना आहार तरी कसा पुरवावा, असा यक्ष प्रश्न पडला आहे.

महाराष्ट्र शासनाकडे निधीची मागणी केली आहे. तरतूद झाल्यावर बचत गटांचे अन्न शिजवून देण्याचे प्रतिदिन प्रति लाभार्थी सहा रुपये अनुदान वितरीत करण्यात येईल. - योगेश जवादे, महिला व बाल विकास अधिकारी, जि.प.अकोला.

 

बचत गटांना प्रतिदिन प्रति लाभार्थी दिले जाणारे मोबदला निधीची मागणी वरिष्ठ स्तरावर गेल्या फेब्रुवारी २0१७ पासून केली जात आहे.- समाधान राठोड, महिला व बाल प्रकल्प विकास अधिकारी, पातूर.

 

आहार देण्यासाठी वाटाणे, तांदूळ, पोहे कांदे,मुरमुरे ,तेल मसाला आदी विकत आणण्यासाठी पैसे लागतात; मात्र शासनाने दहा महिन्यांपासून पैसेच दिले नाहीत. त्यामुळे आहार तरी कसा पुरवावा, असे संकट आम्हाला पडले आहे.- सुनीता अनिल गिर्हे, वटेश्‍वर महिला बचतगट, खानापूर.