शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

५० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य!

By admin | Updated: April 19, 2017 01:47 IST

वन विभागाचा पुढाकार: जिल्हा परिषद, मनपाकडून मागविली माहिती

अकोला : सिमेंट काँक्रिटचे वाढत असलेले जंगल आणि वृक्षांची बेसुमार होत असलेल्या कत्तलीमुळे वातावरणाचे संतुलन बिघडत आहे. वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप थांबता थांबत नाहीये. उन्हाचा वाढता प्रकोप, पावसाची कमतरता यामुळे वातावरण सातत्याने बदलत आहे. त्यावर मात करण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू होत आहेत. वृक्ष लागवडीच्या माध्यमातून जिल्ह्याचे रान आणि रस्ते हिरवेगार आणि वृक्षवल्ली करण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. २०१७ ते २०१९ या तीन वर्षांमध्ये जिल्ह्यामध्ये ५० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात एकेकाळी ७० टक्के जंगल होते; परंतु सातत्याने होत असलेल्या वृक्षतोडीमुळे जिल्ह्यातील वनक्षेत्र ३० टक्क्यांवर आले आहे. रस्त्यांच्या दुतर्फा असलेले वृक्षसुद्धा तोडली जात आहेत. त्याचा परिणाम वातावरणावर होत असून, जिल्ह्याच्या तापमानात वर्षोगणिक वाढ होत आहे. वाढत्या वातावरणावर मात करण्यासाठी आणि निसर्गाचे ढासळते संतुलन कायम राखण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज निर्माण झाली आहे. यंदा शासनानेसुद्धा प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या संख्येने वृक्षारोपण करण्यासाठी वन विभागाला प्रोत्साहन दिले आहे. २०१७ ते २०१९ या तीन वर्षांमध्ये ५० कोटी वृक्षांची लागवड झालीच पाहिजे. या उद्देशाने वन विभाग कामाला लागला आहे. वन विभागाच्या वतीने वृक्ष लागवडीसंदर्भात जिल्हा परिषद, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून कोणत्या ठिकाणी, कोणत्या रस्त्यावर वृक्ष लागवडीसाठी किती जागा उपलब्ध आहे, जागा उपलब्ध नसल्यास ती उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे. ५० कोटी वृक्ष लागवड करून राज्यात अव्वल क्रमांक प्राप्त करण्याचा वन विभागाचा मानस असून, यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण, सामाजिक, धार्मिक संस्था, शैक्षणिक संस्थांची मदत घेतली जाणार आहे. अकोला जिल्हा हिरवेगार करण्याचा संकल्प वन विभागासह सामाजिक वनीकरण विभागाने केला आहे. तालुकानिहाय वृक्ष लागवडीचे लक्ष्य५० कोटी वृक्ष लागवड करण्यासंदर्भात वन विभागाने नियोजन केले असून, तालुकानिहाय वृक्ष लागवडीवर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला वृक्ष लागवडीचे लक्ष्य देण्यात येणार आहे.