शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

५० टक्के बालके आहारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 10:20 IST

अंगणवाडी परिसरातील सर्वेक्षण केलेल्या ५० टक्क्यांपेक्षाही अधिक बालके पोषण आहारापासून वंचित असल्याची माहिती आहे.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केवळ शासकीय अंगणवाड्यांमध्ये शिकत असलेल्या बालकांनाच पोषण आहार दिला जात असल्याने अंगणवाडी परिसरातील सर्वेक्षण केलेल्या ५० टक्क्यांपेक्षाही अधिक बालके पोषण आहारापासून वंचित असल्याची माहिती आहे. खासगी कॉन्व्हेंट, शाळांमध्ये जाणाऱ्या बालकांनाही पोषण आहार दिला जावा, अशी मागणी सातत्याने होत असतानाही शासनाकडून हेतूपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार घडत आहे. दरम्यान, मार्च-एप्रिल दोन महिन्यांसाठी अंगणवाड्यांमध्ये बालकांना दिला जाणारा पोषण आहाराचा पुरवठाही ३० एप्रिल रोजी म्हणजे, ४२ दिवस उशिराने झाल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे, बालकांकडे आधी असलेला पोषण आहार १८ मार्च रोजीच संपला होता. इतके दिवस बालकांना पोषणापासूनही वंचित ठेवण्यात आले आहे.कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे २३ मार्च रोजी लॉकडाउन करण्यात आले. त्यापूर्वी म्हणजे,१८ मार्च रोजीच बालकांना आधी पुरवठा केलेला आहार संपुष्टात आला होता. त्यावेळी आहार पुरवठा होणे आवश्यक होते. ही बाब महिला व बालकल्याण विभागाच्या वरिष्ठांनाही सांगण्यात आली; मात्र लॉकडाउन आहे, वाहनांना परवानगी नाही, या कारणाने पोषण आहार पुरवठ्याला तब्बल ४२ दिवस उशीर झाला आहे. त्यातही शहरातील काही भागात अद्याप पुरवठाच झालेला नाही. ऐन लॉकडाउनच्या काळात पोषण आहार नसल्याने शहरासह ग्रामीण भागातील बालकांना त्यापासून वंचित राहावे लागले आहे. आता पुढील दोन महिन्यांसाठी पोषण आहार पुरवठ्यासाठीची मागणी महिला व बालकल्याण विभागाकडून केली जात आहे. त्यानुसार मे व जून महिन्याच्या धान्याचा पुरवठा होऊ शकतो.

आहार वाटपाची ठरलेली पद्धतशासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेतून तीन ते सहा वर्षांच्या बालकांना प्रती दिन, प्रती लाभार्थी ८ रुपये खर्च करून ५०० किलो कॅलरीज उष्मांक असणाºया पाककृती-१ मध्ये गहू, मसूर डाळ, मिरची, हळदी, मीठ, सोयाबीन तेल, चवळी हे सर्व मिळून एकूण-१४२ ग्रॅम प्रतिदिन द्यावे लागते. त्याचे एकत्रित वाटप करताना ५० दिवसांसाठी ७ किलो १०० ग्रॅम धान्य द्यावे लागते. तर पाककृती-२ मध्ये सर्व घटकातील दोन कडधान्य वगळून मूग डाळ, मटकी हे धान्य देत दैनंदिन १४० ग्रॅम धान्य असे ५० दिवसांसाठी ६ किलो ९५० ग्रॅम द्यावे लागते.

सर्वच तालुक्यात लवकरच पुरवठा!लॉकडाउनमुळे अंगणवाड्या बंद झाल्या. त्यानंतर बालकांना गरम, ताजा आहार देणे अशक्य झाले. त्याऐवजी घरीच कच्चे धान्य पुरवठा करण्यासाठी कंझ्युमर्स फेडरेशनला २३ मार्च रोजी आदेश दिला. त्यानुसार २० एप्रिलपासून पुरवठा सुरू झाला. सर्वच तालुक्यांमध्ये लवकरच पूर्ण होईल.- विलास मरसाळे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, जि.प.

टॅग्स :Akolaअकोला