शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

४४ गावांपर्यंत पोहोचले नाही टँकरद्वारे पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:26 IST

अकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश गत आठवड्यात जिल्हाधिकार्‍यांनी दिला; मात्र शुक्रवारपर्यंत ६१ पैकी ४४ गावांपर्यंत टँॅकरद्वारे पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी टँॅकरद्वारे पाणीपुरवठय़ाचा खेळखंडोबा होत असल्याची बाब समोर येत आहे.

ठळक मुद्देटंचाईग्रस्त ६१ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठय़ाचा खेळखंडोबा४५ पैकी १७ टँकरद्वारेच पाणीपुरवठा!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश गत आठवड्यात जिल्हाधिकार्‍यांनी दिला; मात्र शुक्रवारपर्यंत ६१ पैकी ४४ गावांपर्यंत टँॅकरद्वारे पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी टँॅकरद्वारे पाणीपुरवठय़ाचा खेळखंडोबा होत असल्याची बाब समोर येत आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नसल्याने, अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे या धरणातील जलसाठा अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. या पृष्ठभूमीवर खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा गत ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी गत ७ सप्टेंबर रोजी दिला. आठवडाभराच्या कालावधीत ६१ पैकी केवळ १७ गावांना टँॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला, तरी उर्वरित पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांना मात्र १५ सप्टेंबरपर्यंत टँॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त या गावातील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू असल्याने टँॅकरद्वारे पाणीपुरवठय़ाचा खेळखंडोबा होत असल्याचे चित्र आहे.

४५ पैकी १७ टँकरद्वारेच पाणीपुरवठा!पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना पाच शासकीय आणि ४0 खासगी अशा एकूण ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिला असला, तरी आठवडा उलटूनही केवळ १७ टँकरद्वारेच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांतील ग्रामस्थांपर्यंत टँकरद्वारे पाणी शुक्रवारपर्यंंत पोहोचले नसल्याची स्थिती आहे.

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६१ गावांना टँॅकरद्वारे पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले आहे. १५ सप्टेंबरपर्यंत १७ टँॅकरद्वारे १७ गावांना टँॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. १६ सप्टेंबरपासून आणखी पाच गावांना टँॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.- राजेश्‍वर हांडे,तहसीलदार, अकोला.