शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आवास योजनेसाठी ४०० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 13:44 IST

अकोला: केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ उभारण्याचे केंद्रासह राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे.

ठळक मुद्दे केंद्र शासनाने २४० कोटींचा निधी दिला असून, १६० कोटींची रक्कम राज्य शासनाने जमा केली आहे.केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरे उभारून दिली जाणार आहेत. राज्य शासनाने १४० कोटी रुपयांचा हिस्सा जमा केला असून, तो वितरीत करण्याचे निर्देश ग्राम विकास विभागाने दिले आहेत.

अकोला: केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ उभारण्याचे केंद्रासह राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. महापालिक ांच्या स्तरावर ही योजना तातडीने निकाली काढण्याचे प्रयत्न होत असतानाच ग्रामीण भागात योजनेचा लाभ देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने ४०० कोटींचा निधी वितरीत केला आहे. यामध्ये केंद्र शासनाने २४० कोटींचा निधी दिला असून, १६० कोटींची रक्कम राज्य शासनाने जमा केली आहे.केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरे उभारून दिली जाणार आहेत. ग्राम विकास विभागाच्या निर्देशानुसार स्वायत्त संस्थांनी ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांचा सर्व्हे करण्यासाठी तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती केली. सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या कंपन्यांनी योजनेचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करीत केंद्र व राज्य शासनाकडे सादर केला. योजनेंतर्गत योजनेच्या पहिल्या टप्प्यात पात्र लाभार्थींना ३२२ चौरस फुटाचे बांधकाम करण्यासाठी केंद्र शासनाकडून दीड लाख रुपये तर राज्य शासनाकडून १ लाख रुपये असे एकूण अडीच लाख रुपये अनुदान देण्याची तरतूद आहे. त्या व्यतिरिक्त बँकेमार्फत सव्वा लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल; मात्र ३२२ चौरस फुटापेक्षा अधिक बांधकाम करायचे असल्यास तशी परवानगी दिली जात नसल्यामुळे नागरिकांची कोंडी झाली आहे. ‘पीएम’आवास योजनेंतर्गत घरांच्या बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर विविध अडचणी निर्माण होत आहेत. ही बाब ध्यानात घेता स्वायत्त संस्थांच्या स्तरावर सुधारित ‘डीपीआर’तयार केले जात आहेत. तीन टप्प्यात राबवल्या जाणाऱ्या योजनेची व्याप्ती लक्षात घेता शासनाची स्वायत्त संस्थांच्या कामकाजावर करडी नजर आहे. केंद्र व राज्य शासनासमोर २०२२ पर्यंत योजना निकाली काढण्याचे उद्दिष्ट असून, त्यानुषंगाने केंद्र शासनाने २४० कोटींचा निधी राज्य शासनाकडे वर्ग केला आहे.राज्य शासनाकडून १४० कोटी जमापंतप्रधान आवास योजनेंतर्गत उभारल्या जाणाºया घरांसाठी केंद्र शासनाकडून ६० टक्के निधीची रक्कम वितरीत केली जात आहे. उर्वरित ४० टक्के रक्कम राज्य शासनाने जमा करणे भाग आहे. केंद्राकडून प्राप्त २४० कोटींच्या निधीत राज्य शासनाने १४० कोटी रुपयांचा हिस्सा जमा केला असून, तो वितरीत करण्याचे निर्देश ग्राम विकास विभागाने दिले आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना