शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पंतप्रधान आवास योजनेसाठी ४०० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 13:44 IST

अकोला: केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ उभारण्याचे केंद्रासह राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे.

ठळक मुद्दे केंद्र शासनाने २४० कोटींचा निधी दिला असून, १६० कोटींची रक्कम राज्य शासनाने जमा केली आहे.केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरे उभारून दिली जाणार आहेत. राज्य शासनाने १४० कोटी रुपयांचा हिस्सा जमा केला असून, तो वितरीत करण्याचे निर्देश ग्राम विकास विभागाने दिले आहेत.

अकोला: केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ उभारण्याचे केंद्रासह राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. महापालिक ांच्या स्तरावर ही योजना तातडीने निकाली काढण्याचे प्रयत्न होत असतानाच ग्रामीण भागात योजनेचा लाभ देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने ४०० कोटींचा निधी वितरीत केला आहे. यामध्ये केंद्र शासनाने २४० कोटींचा निधी दिला असून, १६० कोटींची रक्कम राज्य शासनाने जमा केली आहे.केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरे उभारून दिली जाणार आहेत. ग्राम विकास विभागाच्या निर्देशानुसार स्वायत्त संस्थांनी ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांचा सर्व्हे करण्यासाठी तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती केली. सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या कंपन्यांनी योजनेचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करीत केंद्र व राज्य शासनाकडे सादर केला. योजनेंतर्गत योजनेच्या पहिल्या टप्प्यात पात्र लाभार्थींना ३२२ चौरस फुटाचे बांधकाम करण्यासाठी केंद्र शासनाकडून दीड लाख रुपये तर राज्य शासनाकडून १ लाख रुपये असे एकूण अडीच लाख रुपये अनुदान देण्याची तरतूद आहे. त्या व्यतिरिक्त बँकेमार्फत सव्वा लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल; मात्र ३२२ चौरस फुटापेक्षा अधिक बांधकाम करायचे असल्यास तशी परवानगी दिली जात नसल्यामुळे नागरिकांची कोंडी झाली आहे. ‘पीएम’आवास योजनेंतर्गत घरांच्या बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर विविध अडचणी निर्माण होत आहेत. ही बाब ध्यानात घेता स्वायत्त संस्थांच्या स्तरावर सुधारित ‘डीपीआर’तयार केले जात आहेत. तीन टप्प्यात राबवल्या जाणाऱ्या योजनेची व्याप्ती लक्षात घेता शासनाची स्वायत्त संस्थांच्या कामकाजावर करडी नजर आहे. केंद्र व राज्य शासनासमोर २०२२ पर्यंत योजना निकाली काढण्याचे उद्दिष्ट असून, त्यानुषंगाने केंद्र शासनाने २४० कोटींचा निधी राज्य शासनाकडे वर्ग केला आहे.राज्य शासनाकडून १४० कोटी जमापंतप्रधान आवास योजनेंतर्गत उभारल्या जाणाºया घरांसाठी केंद्र शासनाकडून ६० टक्के निधीची रक्कम वितरीत केली जात आहे. उर्वरित ४० टक्के रक्कम राज्य शासनाने जमा करणे भाग आहे. केंद्राकडून प्राप्त २४० कोटींच्या निधीत राज्य शासनाने १४० कोटी रुपयांचा हिस्सा जमा केला असून, तो वितरीत करण्याचे निर्देश ग्राम विकास विभागाने दिले आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना