शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

काटेपूर्णा धरणात ३६.४२ टक्के जलसाठा; यावर्षी सिंचनासाठी पाणी देण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 12:46 IST

अकोला: जिल्ह्यातील धरणामध्ये ३० टक्क्यावर जलसाठा संकलित झाल्याने यावर्षी खरिपातील पिकांना सिंचनासाठी पाणी देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देबार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा या मोठ्या धरणात आतमितीस ३६.४२ टक्के जलसाठा आहे. नियमानुसार धरणात ३३ टक्के जलसाठा उपलब्ध असला तर सिंचनासाठी पाणी देता येते. धरणात बºयापैकी जलसाठा असल्याने रब्बीतही सिंचनासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

अकोला: जिल्ह्यातील धरणामध्ये ३० टक्क्यावर जलसाठा संकलित झाल्याने यावर्षी खरिपातील पिकांना सिंचनासाठी पाणी देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा या मोठ्या धरणात आतमितीस ३६.४२ टक्के जलसाठा आहे. नियमानुसार धरणात ३३ टक्के जलसाठा उपलब्ध असला तर सिंचनासाठी पाणी देता येते. त्यामुळे यावर्षी या धरणाच्या क्षेत्रातील सिंचनासाठी पाणी मिळते का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. रब्बी हंगामाला पाणी देण्यापूर्वी पिण्यासाठीच्या पाण्याचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर उर्वरित पाणी सिंचनासाठी सोडण्याचा विचार केला जातो. गत वर्षापेक्षा यावर्षी धरणात बºयापैकी जलसाठा असल्याने रब्बीतही सिंचनासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पावसाळ््याचे आणखी दोन महिने पुढे असल्याने धरण साठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पातूर तालुक्यातील निर्गुणा मध्यम धरणात ३८.८९ टक्के जलसाठा संचयित झाला असून, याच तालुक्यातील मोर्णा धरणात २१.८३ टक्के जलसाठा आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात ३०.५७ टक्के जलसाठा असून, अकोला, बुलडणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वान धरणात आजमितीस ५५.५६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.- जिल्ह्यातील धरणात आजमितीस सरासरी ३० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पावसाचे दोन महिने पुढे असल्याने चांगला पाऊस येऊन धरण पूर्ण क्षमतेने भरतील अशी अपेक्षा आहे. सिंचनासाठी पाणी हा शेतकºयांचा हक्क आहे; पण धरणातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार यासंदर्भातील निर्णय होत असतात. त्यासाठी आणखी वेळ आहे.अंकुर देसाई,अधीक्षक अभियंता,पाटबंधारे मंडळ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण