शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रोजगार मेळाव्यात ३.५ हजारांवर युवक-युवतींना मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 13:47 IST

अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पुढाकारातून लरातो वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी आयोजित कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या रोजगार मेळाव्यातून तीन हजार ५११ युवक-युवतींनी मुलाखती देऊन नोकरीची संधी प्राप्त केली.

ठळक मुद्देअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते मुलाखतीद्वारे नामांकित कंपन्यांमध्ये निवड झालेल्या युवक-युवतींना नोकरीचे पत्र प्रदान करण्यात आले.रोजगार मेळाव्यासाठी पश्चिम विदर्भातून दहा हजारांवर युवक-युवतींनी नोंदणी केली होती. मेळाव्यात आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती संपेपर्यंत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील लरातो वाणिज्य महाविद्यालयात थांबून होते.

अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पुढाकारातून लरातो वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी आयोजित कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या रोजगार मेळाव्यातून तीन हजार ५११ युवक-युवतींनी मुलाखती देऊन नोकरीची संधी प्राप्त केली. रोजगार मेळाव्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथील ४६ नामांकित कंपन्यांनी सहभाग घेऊन योग्य उमेदवारांची निवड करून त्यांना नोकरीचे पत्र दिले.दुपारी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते मुलाखतीद्वारे नामांकित कंपन्यांमध्ये निवड झालेल्या युवक-युवतींना नोकरीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी माजी महापौर उज्ज्वला देशमुख, अशोक ओळंबे, जि.प. सदस्य अक्षय लहाने, ज्येष्ठ नगरसेवक हरीश आलिमचंदानी, नगरसेवक आशिष पवित्रकार, गोपी ठाकरे, रालतो विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी, संजय तिकांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमात बोलताना कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सचिव असिमकुमार गुप्ता यांनी रोजगार मेळाव्यांची सध्या गरज आहे. यातूनच युवकांना रोजगार मिळतो, त्यामुळे सातत्याने रोजगार मेळावे आयोजित केल्या जातील. कंपनी आणि रोजगार इच्छुकांमध्ये आम्ही दुवा म्हणून काम करू. विदर्भातील युवकांना रोजगार मिळण्यासाठी आमचा विभाग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या साक्षी गायधनी हिचा सत्कार करण्यात आला.रोजगार मेळाव्यासाठी पश्चिम विदर्भातून दहा हजारांवर युवक-युवतींनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या हजारो युवक-युवतींची लरातो वाणिज्य महाविद्यालय, रालतो विज्ञान महाविद्यालय आणि सीताबाई कला महाविद्यालयांमध्ये नामांकित कंपनींच्या प्रतिनिधींनी मुलाखती घेतल्या. मुलाखतीद्वारे निवड झालेल्या ३ हजार ५११ उमेदवारांना नोकरीची संधी मिळाली. सकाळी ९ वाजतापासून रोजगार इच्छुक युवक-युवतींनी कार्यक्रमस्थळी गर्दी केली होती. मेळाव्यात आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती संपेपर्यंत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील लरातो वाणिज्य महाविद्यालयात थांबून होते.अर्थमंत्री मुनगंटीवारांनी दिले नोकरीचे पत्र!अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते मनीषा अशोक इकडे (पुणे येथील कंपनी) मुकेश भीमराव थाटे (बारामती येथील कंपनी), शुभम समदुर (फियाट इंडिया पुणे), गजानन राठोड (मॅग्मा लि. पुणे), गणेश सपकाळ (फियाट इंडिया पुणे), अमित बोपटे, अजय उमाळे(मॅग्मा लि. पुणे) यांना नोकरीचे पत्र देण्यात आले.

१२ हजार लोकांची जेवणाची व्यवस्थारोजगार मेळाव्यामध्ये पश्चिम विदर्भातून आलेल्या १0 हजारांवर उमेदवार व इतर लोकांसाठी ज्येष्ठ नगसेवक हरीश आलिमचंदानी यांनी खिचडीची व्यवस्था लरातो वाणिज्य महाविद्यालय परिसरात केली होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार