शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

जिल्हय़ात ३४ हजार दशलक्ष घनमीटर पाणीसाठय़ाची कामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:44 IST

अकोला : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गत दोन वर्षांच्या कालावधीत जिल्हय़ात ३२५ गावांमध्ये ३४ हजार ५३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध करणारी ८ हजार ५५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियान ३२५ गावांत ८0५५ कामे पूर्ण

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गत दोन वर्षांच्या कालावधीत जिल्हय़ात ३२५ गावांमध्ये ३४ हजार ५३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध करणारी ८ हजार ५५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.राज्यात वारंवार निर्माण होणार्‍या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सन २0१५-१६ या वर्षात अकोला जिल्हय़ात २00 गावांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये ६ हजार ७४८ कामे पूर्ण करण्यात आली. ९३ कोटी १५ लाख रुपये खर्च करून करण्यात आलेल्या ‘जलयुक्त शिवार’च्या कामांद्वारे २२ हजार ५९९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा अपेक्षित आहे. सन २0१६-१७ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हय़ात १२५ गावांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये २ हजार ७६४ प्रस्तावित कामांपैकी १ हजार ३0७ कामे पूर्ण करण्यात आली. २९ कोटी २४ लाख रुपये खर्च करण्यात आलेल्या ‘जलयुक्त शिवार’च्या या कामांतून ११ हजार ९३८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. सन २0१५-१६ व २0१६-१७ या  दोन वर्षांच्या कालावधीत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हय़ातील ३२५ गावांमध्ये ८ हजार ५५ कामे पूर्ण करण्यात आली असून, या कामांद्वारे ३४ हजार ५३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

१४४ गावांसाठी ८६ कोटींचा आराखडा!जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २0१७-१८ या वर्षात जिल्हय़ातील १४४ गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे करण्यासाठी ३ हजार ४२७ कामांकरिता ८६ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा आराखडा कृषी विभागामार्फत तयार करण्यात आला आहे.

४९ हजार १३३ हेक्टर संरक्षित ओलिताचा लाभ!जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गत दोन वर्षांत जिल्हय़ात पूर्ण करण्यात आलेल्या कामांद्वारे ३४ हजार ५३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. या पाणीसाठय़ाचा जिल्हय़ातील ४९ हजार १३३ हेक्टर शेती क्षेत्राला संरक्षित ओलीतासाठी लाभ होणार आहे.

‘जलयुक्त शिवार’ विभागीय बैठक; पुरस्कार वितरण सोहळा आज अकोल्यात!जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अमरावती विभागीय आढावा बैठक आणि पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २0१५-१६, २0१६-१७ या दोन वर्षांतील अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्हय़ांतील कामांचा आढावा आणि २0१७-१८ मधील कामांच्या नियोजनाचा प्रकल्प अहवाल यासंदर्भात सकाळी १0 वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. आढावा बैठकीनंतर दुपारी ४ वाजता  पुरस्कार वितरण सोहळ्याला मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे, कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह विभागातील पाचही जिल्हय़ांचे पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार