शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात विद्युत अपघातात दरवर्षी जातो ३४ जणांचा बळी; गत तीन वर्षांत १०३ जणांचा मृत्यू

By atul.jaiswal | Updated: January 11, 2018 13:30 IST

अकोला : विजेमुळे अनेक गोष्टी सुकर होऊन मानवी जीवन उजळून निघत असले, तरी वीज सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा फटकाही जबर असतो. सदोष विद्युत संच मांडणी व सदोष उपकरणांमुळे विद्युत अपघाताने जीवित हानी होण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत असून, विजेच्या धक्क्याने गत तीन वर्षांत जिल्ह्यात १०३ जण मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देसदोष विद्युत संच मांडणी व सदोष उपकरणांमुळे विद्युत अपघाताने जीवित हानी होण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे.गत तीन वर्षांत विद्युतसंबंधी अपघातांमध्ये १०३ जणांना प्राण गमवावा लागल्याची माहिती विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून मिळाली आहे. विद्युत अपघातांमध्ये ४१ जण जखमी झाले आहेत, तर ८३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. गत तीन वर्षांत शॉर्ट सर्किटमुळे ५१ ठिकाणी आग लागल्याची नोंद कार्यालयाकडे आहे.

अकोला : विजेमुळे अनेक गोष्टी सुकर होऊन मानवी जीवन उजळून निघत असले, तरी वीज सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा फटकाही जबर असतो. सदोष विद्युत संच मांडणी व सदोष उपकरणांमुळे विद्युत अपघाताने जीवित हानी होण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत असून, विजेच्या धक्क्याने गत तीन वर्षांत जिल्ह्यात १०३ जण मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे.महावितरणकडून राज्यभरात वीज पुरवठा केला जातो. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषी अशा प्रकारच्या जोडण्या महावितरणतर्फे देण्यात येतात. घरात येणारी वीज ही फायद्याची आहे; परंतु सुरक्षा उपायांचा वापर न केल्यास ती तेवढीच धोकादायकही ठरते. शहर असो वा ग्रामीण भाग विजेची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. विजेशिवाय जगणे तसूभरही शक्य नाही. दैनंदिन जीवन असो वा उद्योग, व्यवसाय, शेती असो वीज हवी म्हणजे हवी. विजेच्या वापराचे प्रमाण पाहता विजेपासून होणाºया दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना गरजेचे आहे; परंतु दुर्दैवाने अनेक ठिकाणी सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे विजेपासून होणारे अपघात वाढले आहेत. उघड्या तारांना स्पर्श होणे, शॉर्ट सर्किटमुळे आग लागणे, घरावरील टिनपत्र्यांमधून विद्युत धक्का लागणे, कृषी पंपांमध्ये विजेचा संचार होणे आदी घटनांमध्ये मानवी जीवनाची हानी होण्याच्या घटना दरवर्षी मोठ्या प्रमाणात घडत आहेत. जिल्ह्यात गत तीन वर्षांत विद्युतसंबंधी अपघातांमध्ये १०३ जणांना प्राण गमवावा लागल्याची माहिती विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून मिळाली आहे. या तीन वर्षांमध्ये विद्युत अपघातांमध्ये ४१ जण जखमी झाले आहेत, तर ८३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. गत तीन वर्षांत शॉर्ट सर्किटमुळे ५१ ठिकाणी आग लागल्याची नोंद कार्यालयाकडे आहे.विद्युत निरीक्षक कार्यालयाकडील नोंदीनुसार, वर्ष २०१५-१६ मध्ये ३६, २०१६-१७ मध्ये ३३, तर वर्ष २०१७-१८ मध्ये ३४ जणांचा मृत्यू विद्युत अपघातांमध्ये झाला. या कालावधीत लागलेल्या आगींमध्ये लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.आजपासून विद्युत सुरक्षा सप्ताहसर्वसामान्य लोकांमध्ये विद्युत नियमांचे पालन करण्याची जाणीव निर्माण होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने ११ जानेवारी २०१८ ते १७ जानेवारी २०१८ पर्यंत विद्युत सुरक्षा सप्ताह राबविण्याचे ठरविले आहे. या सप्ताहात विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग, अकोला यांच्यामार्फत शाळा, महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शनपर कार्यक्रम, निबंध व चित्रकला स्पर्धा, जनजागृती रॅली, ग्रामीण स्तरावर सभा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्युत निरीक्षक आर. डब्ल्यू. महालक्ष्मे, सहा. विद्युत निरीक्षक वैष्णव, शाखा अभियंता थोटे, घुगे, धात्रक, तिवारी, कनिष्ठ अभियंता चौधरी हे विद्युत सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वीज वितरण कंपनी व जिल्ह्यातील विद्युत कंत्राटदार यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.

टॅग्स :Akola cityअकोला शहरmahavitaranमहावितरण