शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

अकोला जिल्ह्यात विद्युत अपघातात दरवर्षी जातो ३४ जणांचा बळी; गत तीन वर्षांत १०३ जणांचा मृत्यू

By atul.jaiswal | Updated: January 11, 2018 13:30 IST

अकोला : विजेमुळे अनेक गोष्टी सुकर होऊन मानवी जीवन उजळून निघत असले, तरी वीज सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा फटकाही जबर असतो. सदोष विद्युत संच मांडणी व सदोष उपकरणांमुळे विद्युत अपघाताने जीवित हानी होण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत असून, विजेच्या धक्क्याने गत तीन वर्षांत जिल्ह्यात १०३ जण मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देसदोष विद्युत संच मांडणी व सदोष उपकरणांमुळे विद्युत अपघाताने जीवित हानी होण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे.गत तीन वर्षांत विद्युतसंबंधी अपघातांमध्ये १०३ जणांना प्राण गमवावा लागल्याची माहिती विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून मिळाली आहे. विद्युत अपघातांमध्ये ४१ जण जखमी झाले आहेत, तर ८३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. गत तीन वर्षांत शॉर्ट सर्किटमुळे ५१ ठिकाणी आग लागल्याची नोंद कार्यालयाकडे आहे.

अकोला : विजेमुळे अनेक गोष्टी सुकर होऊन मानवी जीवन उजळून निघत असले, तरी वीज सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा फटकाही जबर असतो. सदोष विद्युत संच मांडणी व सदोष उपकरणांमुळे विद्युत अपघाताने जीवित हानी होण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत असून, विजेच्या धक्क्याने गत तीन वर्षांत जिल्ह्यात १०३ जण मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे.महावितरणकडून राज्यभरात वीज पुरवठा केला जातो. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषी अशा प्रकारच्या जोडण्या महावितरणतर्फे देण्यात येतात. घरात येणारी वीज ही फायद्याची आहे; परंतु सुरक्षा उपायांचा वापर न केल्यास ती तेवढीच धोकादायकही ठरते. शहर असो वा ग्रामीण भाग विजेची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. विजेशिवाय जगणे तसूभरही शक्य नाही. दैनंदिन जीवन असो वा उद्योग, व्यवसाय, शेती असो वीज हवी म्हणजे हवी. विजेच्या वापराचे प्रमाण पाहता विजेपासून होणाºया दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना गरजेचे आहे; परंतु दुर्दैवाने अनेक ठिकाणी सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे विजेपासून होणारे अपघात वाढले आहेत. उघड्या तारांना स्पर्श होणे, शॉर्ट सर्किटमुळे आग लागणे, घरावरील टिनपत्र्यांमधून विद्युत धक्का लागणे, कृषी पंपांमध्ये विजेचा संचार होणे आदी घटनांमध्ये मानवी जीवनाची हानी होण्याच्या घटना दरवर्षी मोठ्या प्रमाणात घडत आहेत. जिल्ह्यात गत तीन वर्षांत विद्युतसंबंधी अपघातांमध्ये १०३ जणांना प्राण गमवावा लागल्याची माहिती विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून मिळाली आहे. या तीन वर्षांमध्ये विद्युत अपघातांमध्ये ४१ जण जखमी झाले आहेत, तर ८३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. गत तीन वर्षांत शॉर्ट सर्किटमुळे ५१ ठिकाणी आग लागल्याची नोंद कार्यालयाकडे आहे.विद्युत निरीक्षक कार्यालयाकडील नोंदीनुसार, वर्ष २०१५-१६ मध्ये ३६, २०१६-१७ मध्ये ३३, तर वर्ष २०१७-१८ मध्ये ३४ जणांचा मृत्यू विद्युत अपघातांमध्ये झाला. या कालावधीत लागलेल्या आगींमध्ये लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.आजपासून विद्युत सुरक्षा सप्ताहसर्वसामान्य लोकांमध्ये विद्युत नियमांचे पालन करण्याची जाणीव निर्माण होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने ११ जानेवारी २०१८ ते १७ जानेवारी २०१८ पर्यंत विद्युत सुरक्षा सप्ताह राबविण्याचे ठरविले आहे. या सप्ताहात विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग, अकोला यांच्यामार्फत शाळा, महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शनपर कार्यक्रम, निबंध व चित्रकला स्पर्धा, जनजागृती रॅली, ग्रामीण स्तरावर सभा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्युत निरीक्षक आर. डब्ल्यू. महालक्ष्मे, सहा. विद्युत निरीक्षक वैष्णव, शाखा अभियंता थोटे, घुगे, धात्रक, तिवारी, कनिष्ठ अभियंता चौधरी हे विद्युत सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वीज वितरण कंपनी व जिल्ह्यातील विद्युत कंत्राटदार यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.

टॅग्स :Akola cityअकोला शहरmahavitaranमहावितरण