शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

लॉकडाऊन काळात 'लालपरी'ला ३१ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 10:27 IST

Akola News अकोला जिल्ह्यातील पाच आगारांना सुमारे ३१ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

- सचिन राऊत

अकोला : कोरोनाच्या संसर्गजन्य विषाणूमुळे मार्च महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत देशभरात कडक लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जागेवरच उभ्या असल्याने अकोला जिल्ह्यातील पाच आगारांना सुमारे ३१ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागीय कार्यालयांतर्गत अकोला जिल्ह्यातील अकोला १, अकोला २, अकोट, तेल्हारा व मूर्तिजापूर हे पाच आगार आहेत. या पाच आगारांतून जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या रोज सुरू असतात. त्यामुळे एका आगाराला दिवसाला सुमारे पाच लाख रुपयांचे उत्पन्न आहे; मात्र कोरोनाच्या संकटकाळात शासनाने कडक निर्बंध लावल्यामुळे एसटीतून होणारा संसर्ग रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. याच सहा महिन्यांच्या कालावधीत एसटीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. अकोला जिल्ह्यातील पाच आगारांना सुमारे ३१ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून आता ही परिस्थिती या स्वरूपात असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. राज्य परिवहन महामंडळ या आर्थिक नुकसानीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत आहे; मात्र ज्या ठिकाणी दिवसाला पाच लाख रुपयांचे उत्पन्न होते त्या ठिकाणी आताच्या काळात दिवसाला केवळ दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे. त्यामुळे एसटी आताही आर्थिक घडी बसविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मालवाहतुकीचा हातभार

कोरोनाच्या संकटकाळात एसटीची प्रवासी वाहतूक बंद असल्याने त्यांनी थोडाफार आर्थिक हातभार लागावा म्हणून तातडीने मालवाहतूक सेवा सुरू केली. एसटीला या संकटकाळात मालवाहतुकीचा मोठा हातभार लागला. मालवाहतुकीमुळे एसटीला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी खारीचा हातभार उचलण्यास मदत केली. मालवाहतूकीतून आताही एसटीला बऱ्याच प्रमाणात उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे.

१८० दिवस एसटी होती बंद

कोरोनाच्या भयावह संकटामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस २२ मार्च ते २० ऑगस्ट २०२० या कालावधीत तब्बल १८० दिवस बंद होत्या. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील अकोला एक, अकोला २, अकोट, तेल्हारा व मूर्तीजापूर या पाच आगारांना सुमारे ३० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे एसटीवर मोठे आर्थिक संकट आले आहे.

सहा महिन्यांत केवळ तीस फेऱ्या

कोरोनाच्या संकटामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस बंद असताना अकोला आगारातून केवळ ३० फेऱ्या मारण्यात आले आहेत. परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी तीस फेऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला आगारातील बसने पूर्ण केल्या. मात्र, त्याची ही देयक अद्यापही थकलेली असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

टॅग्स :state transportएसटीAkolaअकोला