शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात ३०५ तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 14:23 IST

अकोला: जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सोमवारी घेण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात विविध विभागांसंबंधी नागरिकांकडून ३०५ तक्रारी प्राप्त झाल्या.

अकोला: जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सोमवारी घेण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात विविध विभागांसंबंधी नागरिकांकडून ३०५ तक्रारी प्राप्त झाल्या. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन तक्रारींचे तातडीने निवारण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जनता दरबाराला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर,मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम व इतर विभागप्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सभागृहात उपस्थित तक्रारकर्त्या नागरिकांकडे जाऊन तक्रारी स्वीकारल्या. मागील जनता दरबारात प्राप्त तक्रारींवर संबंधित विभागांमार्फत करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेत, सामूहिक व वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी पालकमंत्र्यांनी स्वीकारल्या. त्यामध्ये विविध विभागांसंबंधी जिल्ह्यातील नागरिकांकडून ३०५ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये महसूल, जिल्हा परिषद, पोलीस विभाग,मनपा, विद्युत विभाग, आदिवासी विकास विभाग, जिल्हा उपनिबंधक, समाजकल्याण, भूमिअभिलेख विभाग, कृषी विभाग, एसटी महामंडळ, पाटबंधारे विभाग, कृषी विद्यापीठ,जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा अग्रणी बँक, समाजिक वनीकरण व इतर विभागासंबंधी तक्रारींचा समावेश आहे. प्राप्त तक्रारींची दखल घेऊन नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले. अशा करण्यात आल्या सामूहिक तक्रारी!जनता दरबारात विविध प्रश्नांवर जिल्ह्यातील नागरिकांनी पालकमंत्र्यांकडे सामूहिक तक्रारी केल्या. त्यामध्ये मूर्तिजापूर येथील राजगुरू नगरमधील रहिवाशांनी दलित वस्तीमध्ये रस्ता, पाणी व सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या आदी सुविधा नसल्याची तक्रार दिली. तसेच धरणाच्या बॅक वॉटरचे पाणी शेतातून गेल्याने शेत खराब झाल्याची तक्रार बार्शीटाकळी तालुक्यातील ढाकलीच्या शेतकºयांनी केली. मनपा हद्दवाढीत समाविष्ट ग्रामपंचायतींच्या कर्मचाºयांचे महानगरपालिकेत समायोजन करण्याची मागणी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्यावतीने करण्यात आली. मनपाने सेवेतून कमी केलेल्या अस्थायी कलाशिक्षकांना सेवेत सामावून घेण्याची मागणी अस्थायी कलाशिक्षकांच्यावतीने करण्यात आली.सामाजिक वनीकरण विभागात कामांत गैरव्यवहार झाल्याची तक्रार बार्शीटाकळी तालुक्यातील झोडगा व वस्तापूर या गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांकडे केली. शेतकºयांना त्रास देणारे चान्नी येथील तलाठी लाड यांची बदली करण्याची मागणी चान्नी येथील शेतकºयांनी पालकमंत्र्यांकडे केली. प्राप्त सामूहिक तक्रारींची दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील