शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

अकोला शहरात २९६ शिकस्त इमारती धोकादायक; ३७ जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 11:33 IST

महापालिका क्षेत्रात २९६ शिकस्त इमारती धोकादायक असून, यापैकी ३७ इमारती अत्यंत जीर्ण झाल्या आहेत

अकोला : दरवर्षी पावसाळ््याच्या तोंडावर शहरातील शिकस्त इमारतींचा मुद्दा ऐरणीवर येतो. महापालिका क्षेत्रात २९६ शिकस्त इमारती धोकादायक असून, यापैकी ३७ इमारती अत्यंत जीर्ण झाल्या आहेत. प्रशासनाने नेहमीप्रमाणे शिकस्त इमारतधारकांना नोटीस देण्याची औपचारिकता पूर्ण केली असली तरी महाडसारखी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोण स्वीकारणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.नुकतीच रायगड जिल्ह्यातील महाड येथील रहिवासी इमारत कोसळून निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. यंदा पावसाची संततधार पाहता महाड दुर्घटनेच्या निमित्ताने शहरातील शिकस्त इमारतींचा मुद्दा उपस्थित झाला आहे. शहरातील उत्तर झोनमध्ये सर्वाधिक शिकस्त इमारती आहेत. मुख्य बाजारपेठ अशी ओळख असलेल्या या झोनमधील इमारतींमध्ये नागरिकांचे वास्तव्य आहे. यापैकी काही इमारती अत्यंत जीर्ण झाल्या आहेत; परंतु इमारतींमधील रहिवासी इमारत सोडण्यास नकार देत असल्याने मनपा प्रशासनासमोर कायदेशीर पेच निर्माण झाल्याचे दिसून येते. शहरातील चारही झोनमध्ये २९६ शिकस्त इमारती असून, यापैकी ३७ इमारती अत्यंत जीर्ण झाल्या आहेत. संबंधित मालमत्ताधारक तसेच पोटभाडेक रूंना मनपा प्रशासनाने इमारत खाली करण्यासंदर्भात नोटीस जारी केली असली तरीही मालमत्ताधारक इमारत सोडण्यास नकार देत असल्याने प्रशासन हतबल ठरत असल्याचे चित्र आहे.मालकी हक्क जाईल ही धास्तीउत्तर झोनमध्ये सर्वाधिक १७० शिकस्त इमारती आहेत. बहुतांश इमारती मुख्य बाजारपेठेत असल्यामुळे व बाजारमूल्य लक्षात घेता इमारतींमधील पोटभाडेकरू मालकी हक्क जाईल, या धास्तीने इमारत सोडण्यास नकार देत असल्याची माहिती आहे. इमारतीच्या मूळ मालकी हक्कावरूनही कुटुंबीयांमध्ये आपसात वाद असून, सदर प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे जीव धोक्यात घालून ही कुटुंबे शिकस्त इमारतींमध्ये मुक्कामी राहत असल्याची माहिती आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाBuilding Collapseइमारत दुर्घटना