शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात शेतकरी अपघात विम्याचे २६६ लाभार्थी

By admin | Updated: March 5, 2016 02:28 IST

२0१४-१५ या आर्थिक वर्षात अमरावती विभागात आलेल्या ३१९ प्रस्ताव.

दादाराव गायकवाड/ कारंजा लाड (जि.वाशिम)शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, सर्पदंश, विषबाधा, वीज पडणे यामुळे मृत्यू ओढवला किंवा अपंगत्व आले, तर शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ मिळण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेत सन २0१४-१५ या आर्थिक वर्षात अमरावती विभागात आलेल्या ३१९ प्रस्तावांतून २६६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. अपघातग्रस्त शेतकर्‍यास किंवा त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने ह्यशेतकरी अपघात विमा योजनाह्ण सुरू केली होती. या योजनेची मुदत ३0 नोव्हेंबर २0१५ रोजी समाप्त होण्यापूर्वी राज्य शासनाने या योजनेला दिवंगत केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. हा आर्थिक लाभ धनादेशाच्या स्वरूपात अपंग शेतकर्‍यास स्वत: किंवा मृत शेतकर्‍याची पत्नी, मुलगी, शेतकर्‍याची आई, मुलगा, नातवंडे यांना प्राधान्यक्रमानुसार देण्यात येतो. एकापेक्षा जास्त लाभधारक असल्यास अर्जदारास दुसर्‍या लाभधारकाचे नाहरकत शपथपत्र द्यावे लागते. विम्याचा दावा अपंग शेतकरी किंवा मृत शेतकर्‍याच्या लाभधारकास विहित नमुन्यात पुराव्याच्या कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकार्‍यांकडे सादर करावयाचा असतो. अपघाताच्या स्वरूपानुसार काही दाव्यांत या व्यतिरिक्त अजून काही माहिती आवश्यक असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे संपर्क करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकार्‍यांनी केले आहे. संपूर्ण कागदपत्रासह हा दावा लाभधारकाने तालुका कृषी अधिकार्‍यांकडे दिल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कागदपत्रांची छाननी करून दावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांकडे पाठवतात. नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ!शेतकर्‍याचा अपघाती मृत्यू झाल्यास तसेच दोन डोळे, दोन अवयव किंवा एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास विमा रक्कम एक लाख रुपये आणि एखादा अवयव किंवा डोळा निकामी झाल्यास ५0 हजार रुपये आर्थिक लाभ मिळत होता. आता शासनाच्या नोव्हेंबर २0१५ च्या निर्णयानंतर त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार विमाधारक शेतकर्‍याचा अपघाती मृत्यू, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी तसेच अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी अशा तिन्ही प्रकारच्या हानीसाठी दोन लाख रुपये तर अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे.अमरावती विभागातील शेतकरी अपघात विम्याचे प्रस्तावजिल्हा            प्राप्त प्रस्ताव             मंजूर प्रस्ताव बुलडाणा                   ७६                   ६७अकोला                    ३५                   २८वाशिम                     ३९                   ३४अमरावती                ७३                     ६२यवतमाळ                 ९६                    ४५-----------------------------एकूण                     ३१९                   २६६