शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

अमरावती विभागात शेतकरी अपघात विम्याचे २६६ लाभार्थी

By admin | Updated: March 5, 2016 02:28 IST

२0१४-१५ या आर्थिक वर्षात अमरावती विभागात आलेल्या ३१९ प्रस्ताव.

दादाराव गायकवाड/ कारंजा लाड (जि.वाशिम)शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, सर्पदंश, विषबाधा, वीज पडणे यामुळे मृत्यू ओढवला किंवा अपंगत्व आले, तर शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ मिळण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेत सन २0१४-१५ या आर्थिक वर्षात अमरावती विभागात आलेल्या ३१९ प्रस्तावांतून २६६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. अपघातग्रस्त शेतकर्‍यास किंवा त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने ह्यशेतकरी अपघात विमा योजनाह्ण सुरू केली होती. या योजनेची मुदत ३0 नोव्हेंबर २0१५ रोजी समाप्त होण्यापूर्वी राज्य शासनाने या योजनेला दिवंगत केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. हा आर्थिक लाभ धनादेशाच्या स्वरूपात अपंग शेतकर्‍यास स्वत: किंवा मृत शेतकर्‍याची पत्नी, मुलगी, शेतकर्‍याची आई, मुलगा, नातवंडे यांना प्राधान्यक्रमानुसार देण्यात येतो. एकापेक्षा जास्त लाभधारक असल्यास अर्जदारास दुसर्‍या लाभधारकाचे नाहरकत शपथपत्र द्यावे लागते. विम्याचा दावा अपंग शेतकरी किंवा मृत शेतकर्‍याच्या लाभधारकास विहित नमुन्यात पुराव्याच्या कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकार्‍यांकडे सादर करावयाचा असतो. अपघाताच्या स्वरूपानुसार काही दाव्यांत या व्यतिरिक्त अजून काही माहिती आवश्यक असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे संपर्क करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकार्‍यांनी केले आहे. संपूर्ण कागदपत्रासह हा दावा लाभधारकाने तालुका कृषी अधिकार्‍यांकडे दिल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कागदपत्रांची छाननी करून दावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांकडे पाठवतात. नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ!शेतकर्‍याचा अपघाती मृत्यू झाल्यास तसेच दोन डोळे, दोन अवयव किंवा एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास विमा रक्कम एक लाख रुपये आणि एखादा अवयव किंवा डोळा निकामी झाल्यास ५0 हजार रुपये आर्थिक लाभ मिळत होता. आता शासनाच्या नोव्हेंबर २0१५ च्या निर्णयानंतर त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार विमाधारक शेतकर्‍याचा अपघाती मृत्यू, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी तसेच अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी अशा तिन्ही प्रकारच्या हानीसाठी दोन लाख रुपये तर अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे.अमरावती विभागातील शेतकरी अपघात विम्याचे प्रस्तावजिल्हा            प्राप्त प्रस्ताव             मंजूर प्रस्ताव बुलडाणा                   ७६                   ६७अकोला                    ३५                   २८वाशिम                     ३९                   ३४अमरावती                ७३                     ६२यवतमाळ                 ९६                    ४५-----------------------------एकूण                     ३१९                   २६६