शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

नोंदणीकृत भाडेकरारनामा असेल तरच मिळणार २५ टक्के कोट्यात प्रवेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 17:00 IST

अकोला : दुय्यम निंबधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा असेल तरच शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत २५ टक्के कोट्यात प्रवेश द्यावा असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी काढल्यामुळे यादीत खोटी माहिती देऊन प्रात्र ठरलेल्या पालकांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

ठळक मुद्देऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अनेक दोष असल्यामुळे  आर्थिक सक्षम असलेल्या पालकांनीच या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली होती.ऑनलाईन पद्दतीत निवड झालेल्या लाभार्थ्याकडे  दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा असणे आता बंधनकारक करण्यात आला आहे.नोटरी स्टॅम्प पेपर,साध्या कागदावर भाडेकरारनामा आणणाऱ्यांना शाळांनी प्रवेश् देऊ नये असेही स्पष्ट करण्यात आले.

अकोला : दुय्यम निंबधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा असेल तरच शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत २५ टक्के कोट्यातप्रवेश द्यावा असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी काढल्यामुळे यादीत खोटी माहिती देऊन प्रात्र ठरलेल्या पालकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. या निर्णयामुळे खऱ्या खुऱ्याा लाभथ्र्यांना या योजनाचा आता लाभ मिळणार आहे.या संदर्भात युवासेनेचे जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ही यादीच रद्द करावी व नव्याने गरीब विद्याथ्र्यांना न्याय मिळण्यासाठी पुन्हा हि प्रक्रिया राबवावी अशी मागणी केली होती.चांगल्या दर्जाच्या शिक्षणापासुन गरीब विद्यार्थी वचिंत राहु नये, म्हणुन शासनातर्फे प्रत्येक खाजगी शाळांना २५ टक्के प्रवेश बंधनकारक करण्यात आले आहेत. मात्र योजनेचा लाभ घेण्यासाठी राबविण्यात येणारी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अनेक दोष असल्यामुळे  आर्थिक सक्षम असलेल्या पालकांनीच या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली होती. या संदर्भात युवासेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील यांनी जिल्हाधिकारी यांनी निवेदन देऊन हि यादी रद्द करून पुन्हा हि प्रक्रिया राबवावी, अशी मागणी केली आहे. गरीब विद्याथ्र्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही तर युवासेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला होता. दरम्यान या मागणीचे एक लेखी निवेदन  शिक्षण मंत्री ना.विनोद तावडे, पालकमंत्री ना.डॉ.रणजीत पाटील व शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे.  या ऑनलाईन पध्दतीमुळे  सरकारी कर्मचारी, अधिकारी, शिक्षण विभागातील अधिकारी यांच्यांच मुलांचे नंबर कसे काय लागले यााबाबत त प्राप्त माहिती नुसार हि प्रक्रियाच मुळात चुकीची आहे. ऑनलाईन अर्ज सादर करतांना द्यावयाची माहिती व कागदपत्रे तपासण्याची शासनाकडे कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे अर्जदार पालकांनी दिलेली माहिती गृहीत धरून त्यांच्या मुलाला या योजनेत पात्र ठरविण्यात येते हे कितपत योग्य आहे.ऑनलाईन अर्ज सादर करतांना शाळेचा आसपास जिथे वस्तीही नाही तिथे घराचा पाईंट दाखविण्यात आला आहे. या संदर्भात शसनस्तरावर दखल घेतल्यामुळे ऑनलाईन पद्दतीत निवड झालेल्या लाभार्थ्याकडे  दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा असणे आता बंधनकारक करण्यात आला आहे. नोटरी स्टॅम्प पेपर,साध्या कागदावर भाडेकरारनामा आणणाऱ्यांना शाळांनी प्रवेश् देऊ नये असेही स्पष्ट करण्यात आले. या आदेशााचे उल्लघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान युवासेनेच्या आंदालनातील पहिल्या टप्प्यात यश आले असुन आता रिकाम्या जागा भरण्यासाठी हि प्रक्रिया पुन्हा राबविण्यात यावी अशी मागणी विठ्ठल सरप पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Akolaअकोलाeducationशैक्षणिकAkola cityअकोला शहर