शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

जिल्ह्यात १.९६ लाख शेतकऱ्यांचे १.३१ लाख हेक्टरवरील पीक, जमिनीचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:23 IST

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार ६४२ शेतकऱ्यांचे १ लाख ३१ हजार ४९४ हेक्टरवरील ...

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार ६४२ शेतकऱ्यांचे १ लाख ३१ हजार ४९४ हेक्टरवरील पिकांसह शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत मंगळवारी शासनाकडे सादर करण्यात आला असून, नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ११५ कोटी ३५ लाख ३४ हजार २१६ रुपये मदतनिधी मागणीचा प्रस्तावदेखील शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

जिल्ह्यात २१ जुलै रोजी रात्रभर बरसलेल्या मुसळधार पावसाने नदी व नाल्यांना पूर आला होता. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिके पाण्यात बुडाली तसेच शेतजमीन खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पीक आणि जमिनीचे नुकसान झाल्याने आधीच अडचणीत असलेला शेतकरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या पथकांमार्फत जिल्ह्यातील पीक नुकसानासह खरडून गेलेल्या शेतजमिनीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील शेती आणि पिकांच्या नुकसानीचा अंतिम अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात १ लाख ९६ हजार ६८२ शेतकऱ्यांचे १ लाख ३१ हजार ४९४ हेक्टर ९४ क्षेत्रावरील पिकासह शेतजमिनीचे नुकसान झाले असून, नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ११५ कोटी ३५ लाख ३४ हजार २१६ रुपये मदतनिधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला.

पीक, शेती नुकसानीचा असा आहे अंतिम अहवाल!

क्षेत्राचा प्रकार शेतकरी क्षेत्र (हेक्टर) अपेक्षित निधी (रुपये)

जिरायती पिके १७८०८३ १२१२९५.३६ ८२४८०८४४८

बागायत पिके १०४१ ५७९.१८ ७८१८९३०

फळ पिके ९०९ ५८२.३३ १०४८१९४०

खरडून गेलेली जमीन १६६४९ ९०३८.०७ ३१०४२४८९८

..................................................................................................................................

एकूण १९६६८२ १३१४९४ ११५३५३४२१६

तालुकानिहाय शेतकरी आणि पिकांचे नुकसान !

तालुका शेतकरी क्षेत्र (हेक्टर)

अकोला ६६८३५ ४७७३९.००

अकोट ९८९५ ५५१६.०६

तेल्हारा २८७७ २०५३.२३

बाळापूर २५१७४ २१३९८.४८

पातूर ३२०२८ २०९०७.०१

बार्शीटाकळी ३९५७८ २३०५१.०२

मूर्तिजापूर १६९६ ६२९.७५

‘या’ पिकांचे झाले नुकसान!

अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मूग, उडीद इत्यादी जिरायती खरीप पिकांसह भाजीपाला, कांदा व इतर बागायती पिके आणि पपई, केळी, लिंबू, पेरू, आंबा, संत्रा, डाळिंब आदी फळपिकांचे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पिकांसह शेतजमिनीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, नुकसानीचा अंतिम अहवाल मंगळवारी शासनाकडे सादर करण्यात आला.

डाॅ. कांतप्पा खोत

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी