शहरं
Join us  
Trending Stories
1
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
2
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
3
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
4
कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
5
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
6
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
7
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
8
Nitish Reddy Flying Catch: नितीश रेड्डी बनला सुपरमॅन, सिराजच्या गोलंदाजीवर घेतला जबरदस्त कॅच!
9
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
10
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
11
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
12
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
13
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
14
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
15
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
16
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
17
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
18
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
20
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे

जिल्ह्यात १.९६ लाख शेतकऱ्यांचे १.३१ लाख हेक्टरवरील पीक, जमिनीचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:23 IST

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार ६४२ शेतकऱ्यांचे १ लाख ३१ हजार ४९४ हेक्टरवरील ...

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार ६४२ शेतकऱ्यांचे १ लाख ३१ हजार ४९४ हेक्टरवरील पिकांसह शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत मंगळवारी शासनाकडे सादर करण्यात आला असून, नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ११५ कोटी ३५ लाख ३४ हजार २१६ रुपये मदतनिधी मागणीचा प्रस्तावदेखील शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

जिल्ह्यात २१ जुलै रोजी रात्रभर बरसलेल्या मुसळधार पावसाने नदी व नाल्यांना पूर आला होता. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिके पाण्यात बुडाली तसेच शेतजमीन खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पीक आणि जमिनीचे नुकसान झाल्याने आधीच अडचणीत असलेला शेतकरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या पथकांमार्फत जिल्ह्यातील पीक नुकसानासह खरडून गेलेल्या शेतजमिनीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील शेती आणि पिकांच्या नुकसानीचा अंतिम अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात १ लाख ९६ हजार ६८२ शेतकऱ्यांचे १ लाख ३१ हजार ४९४ हेक्टर ९४ क्षेत्रावरील पिकासह शेतजमिनीचे नुकसान झाले असून, नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ११५ कोटी ३५ लाख ३४ हजार २१६ रुपये मदतनिधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला.

पीक, शेती नुकसानीचा असा आहे अंतिम अहवाल!

क्षेत्राचा प्रकार शेतकरी क्षेत्र (हेक्टर) अपेक्षित निधी (रुपये)

जिरायती पिके १७८०८३ १२१२९५.३६ ८२४८०८४४८

बागायत पिके १०४१ ५७९.१८ ७८१८९३०

फळ पिके ९०९ ५८२.३३ १०४८१९४०

खरडून गेलेली जमीन १६६४९ ९०३८.०७ ३१०४२४८९८

..................................................................................................................................

एकूण १९६६८२ १३१४९४ ११५३५३४२१६

तालुकानिहाय शेतकरी आणि पिकांचे नुकसान !

तालुका शेतकरी क्षेत्र (हेक्टर)

अकोला ६६८३५ ४७७३९.००

अकोट ९८९५ ५५१६.०६

तेल्हारा २८७७ २०५३.२३

बाळापूर २५१७४ २१३९८.४८

पातूर ३२०२८ २०९०७.०१

बार्शीटाकळी ३९५७८ २३०५१.०२

मूर्तिजापूर १६९६ ६२९.७५

‘या’ पिकांचे झाले नुकसान!

अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मूग, उडीद इत्यादी जिरायती खरीप पिकांसह भाजीपाला, कांदा व इतर बागायती पिके आणि पपई, केळी, लिंबू, पेरू, आंबा, संत्रा, डाळिंब आदी फळपिकांचे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पिकांसह शेतजमिनीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, नुकसानीचा अंतिम अहवाल मंगळवारी शासनाकडे सादर करण्यात आला.

डाॅ. कांतप्पा खोत

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी