शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

काटेपूर्णा धरणात उरला १९ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 01:32 IST

अकोला: पावसाळा सुरू होऊन एक महिना २१ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पावसाळा सुरू होऊन एक महिना २१ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. अकोला शहराची तहान भागविणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणात शुक्रवारपर्यंत १९.०९ टक्के जलसाठा उरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ होण्यासाठी सार्वत्रिक दमदार पाऊस बरसण्याची प्रतीक्षा केली जात आहे. यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन एक महिना २१ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नसल्याने, जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात अद्याप वाढ झाली नाही. गत २० दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाने गत १९ जुलै रोजी जिल्ह्यात दमदार हजेरी लावली; मात्र या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली नाही. त्यामुळे वान धरण वगळता जिल्ह्यातील इतर धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याची स्थिती आहे. त्यामध्ये अकोला शहरासह ६४ खेडी खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा आणि मूर्तिजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणात २१ जुलै रोजी १९.०९ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याचे चित्र आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ होण्यासाठी धरणांच्या जलग्रहण क्षेत्रात दमदार पाऊस बरसण्याची प्रतीक्षा केली जात आहे.