शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

काटेपूर्णा धरणात उरला १९ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 01:32 IST

अकोला: पावसाळा सुरू होऊन एक महिना २१ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पावसाळा सुरू होऊन एक महिना २१ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. अकोला शहराची तहान भागविणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणात शुक्रवारपर्यंत १९.०९ टक्के जलसाठा उरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ होण्यासाठी सार्वत्रिक दमदार पाऊस बरसण्याची प्रतीक्षा केली जात आहे. यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन एक महिना २१ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नसल्याने, जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात अद्याप वाढ झाली नाही. गत २० दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाने गत १९ जुलै रोजी जिल्ह्यात दमदार हजेरी लावली; मात्र या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली नाही. त्यामुळे वान धरण वगळता जिल्ह्यातील इतर धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याची स्थिती आहे. त्यामध्ये अकोला शहरासह ६४ खेडी खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा आणि मूर्तिजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणात २१ जुलै रोजी १९.०९ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याचे चित्र आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ होण्यासाठी धरणांच्या जलग्रहण क्षेत्रात दमदार पाऊस बरसण्याची प्रतीक्षा केली जात आहे.