शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

काटेपूर्णा धरणात उरला १९ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 01:32 IST

अकोला: पावसाळा सुरू होऊन एक महिना २१ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पावसाळा सुरू होऊन एक महिना २१ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. अकोला शहराची तहान भागविणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणात शुक्रवारपर्यंत १९.०९ टक्के जलसाठा उरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ होण्यासाठी सार्वत्रिक दमदार पाऊस बरसण्याची प्रतीक्षा केली जात आहे. यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन एक महिना २१ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नसल्याने, जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात अद्याप वाढ झाली नाही. गत २० दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाने गत १९ जुलै रोजी जिल्ह्यात दमदार हजेरी लावली; मात्र या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली नाही. त्यामुळे वान धरण वगळता जिल्ह्यातील इतर धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याची स्थिती आहे. त्यामध्ये अकोला शहरासह ६४ खेडी खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा आणि मूर्तिजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणात २१ जुलै रोजी १९.०९ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याचे चित्र आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ होण्यासाठी धरणांच्या जलग्रहण क्षेत्रात दमदार पाऊस बरसण्याची प्रतीक्षा केली जात आहे.