शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

१८७९ सिंचन विहिरींचा होणार पंचनामा!

By admin | Updated: June 4, 2016 02:20 IST

अकोला जिल्हाधिका-यांचा चारही एसडीओंना आदेश.

संतोष येलकर / अकोलामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात गत वर्षभराच्या कालावधीत करण्यात आलेल्या सिंचन विहिरींच्या कामांची तपासणी करून पंचनाम्यासह वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी १ जून रोजी जिल्ह्यातील चारही उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांना दिला. त्यानुसार जिल्ह्यातील १ हजार ८७९ सिंचन विहिरींच्या कामांचा पंचनामा महसूल विभागाच्या पथकांकडून करण्यात येणार आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची कामे केली जातात. मंजूर करण्यात आलेल्या विहिरींच्या कामांसाठी लाभार्थी शेतकर्‍यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्य आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार, अकोला जिल्ह्यात मेअखेर करण्यात आलेल्या सिंचन विहिरींच्या कामांपैकी किती बोगस आहेत, सिंचन विहिरी गायब करण्यात आल्या काय, विहिरींचे काम न करता त्या कागदोपत्री दाखवून अनुदानाची रक्कम काढण्यात आली काय,अनुदान आणि मजुरी रकमेचे वाटप करण्यात आले की नाही, याबाबत तपासणी होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मे २0१६ अखेर वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात करण्यात आलेल्या १ हजार ८७९ सिंचन विहिरींच्या कामांची तपासणी महसूल अधिकारी-कर्मचार्‍यांच्या पथकांकडून करण्यात येणार आहे. या तपासणीत सिंचन विहिरींच्या कामांचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या चार उपविभागीय अधिकार्‍यांना १ जून रोजी दिला. विहिरींच्या कामांचे पंचनामे ७ जूनपर्यंत पूर्ण करून, पंचनाम्यासह अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी अकोला, आकोट, बाळापूर व मूर्तिजापूर उपविभागीय अधिकार्‍यांना दिला.