शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

पाणीटंचाईग्रस्त १४८ गावांसाठी १७८ विहीर-बोअरचे अधिग्रहण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 10:20 IST

पाणीटंचाईग्रस्त १४८ गावांसाठी १५ जुलैपर्यंत १७८ खासगी विहीर व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले असून, अधिग्रहित करण्यात आलेल्या विहीर व बोअरद्वारे पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

- संतोष येलकर

अकोला: पावसाळा सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यात अद्यापही सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची समस्या कायम असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त १४८ गावांसाठी १५ जुलैपर्यंत १७८ खासगी विहीर व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले असून, अधिग्रहित करण्यात आलेल्या विहीर व बोअरद्वारे पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला; परंतु जिल्ह्यात सार्वत्रिक जोरदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले अद्यापही कोरडी पडली असून, धरणांमधील जलसाठ्यांतही वाढ झाली नाही. पावसाने दांडी मारल्याच्या स्थितीत जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची समस्या कायम असून, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी पावसाळ्यातही ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यानुषंगाने, जिल्ह्यातील सातही तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त १४८ गावांसाठी १५ जुलैपर्यंत जिल्हा प्रशासनामार्फत १७८ खासगी विहीर व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये ६० विहिरी व ११८ बोअरचा समावेश आहे. अधिग्रहित करण्यात आलेल्या खासगी विहीर व बोअरद्वारे पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाळ्यातही अधिग्रहित करण्यात आलेल्या खासगी विहीर व बोअरच्या पाण्यावर पाणीटंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे.दीड महिन्यात सरासरी केवळ १६६.३ मि.मी. पाऊस!जिल्ह्यात १ जून ते १५ जुलैपर्यंत सरासरी २४७.१ मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. त्या तुलनेत यावर्षीच्या पावसाळ्यात १५ जुलैपर्यंत दीड महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात सरासरी केवळ १६६.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील धरणे, तलाव, नदी-नाल्यांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध होण्यासाठी सार्वत्रिक दमदार पाऊस केव्हा बरसणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई