शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

जिल्ह्यात १४९ गावांत पाणीटंचाई निवारणाची १६० कामे पूर्ण !

By संतोष येलकर | Updated: May 13, 2024 20:05 IST

विहिरींचे अधिग्रहण, विंधन विहिरी, कूपनलिकांची कामे.

अकोला : जिल्ह्यातील १४९ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांची १६० कामे ११ मे पर्यंत पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामध्ये खासगी विहिरींच्या अधिग्रहणासह नवीन विंधन विहिरी, कूपनलिकांच्या कामांचा समावेश आहे. तापत्या उन्हाच्या चटक्यासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची समस्या तीव्र होत असून, पिण्याच्या पाण्यासाठी टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा तीन महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये २३८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या विविध ५५० उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. आराखड्यात समाविष्ट उपाययोजनांच्या कामांसाठी संबंधित यंत्रणांकडून प्राप्त होत असलेल्या प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता दिली जात आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या उपाययोजनांच्या कामांपैकी जिल्ह्यातील १४९ गावांमध्ये १६० उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण, विंधन विहिरी, कूपनलिकांच्या कामांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली. पूर्ण केलेल्या उपाययोजनांचीअशी आहेत कामेकूपनलिका : ८५विंधन विहिरी : ६८खासगी विहिरींचे अधिग्रहण : ०७ २० उपाययोजनांची कामेलवकरच होणार सुरूजिल्ह्यातील बाळापूर व पातूर या दोन तालुक्यांतील १९ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी विंधन विहिरी व कूपनलिकांच्या २० उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी ८ मे रोजी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे संबंधित उपाययोजनांची कामे लवकरच जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात येणार असून, येत्या ३० मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Akolaअकोला