शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

१६ हजार हेक्टर शेतीचा घसा कोरडाच!

By admin | Updated: January 11, 2016 01:57 IST

मूर्तिजापूर तालुक्यातील तीनही प्रकल्प मागील सात वर्षांपासून पांढरा हत्ती ठरले.

गणेश मापारी /मूर्तिजापूर:मूर्तिजापूर तालुक्यातील जमिनीसह खारपाणपट्टय़ातील जमीन सिंचनाखाली यावी, याकरिता उभारण्यात आलेले तीनही प्रकल्प मागील सात वर्षांपासून पांढरा हत्ती ठरले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही शेतकर्‍यांच्या शेतात पाणी न पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव जनमंच शोधयात्रेच्या मोहिमेदरम्यान उजेडात आले आहे.विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यात उमा बॅरेज प्रकल्प, घुंगशी बॅरेज मध्यम प्रकल्प आणि काटेपूर्णा बॅरेज प्रकल्प असे तीन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या तीनही प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर खारपाणपट्टय़ातील काही गावांसह मूर्तिजापूर तालुक्यातील एकूण १६ हजार ४0३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा हजारो शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. परंतु, तीनही प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण झालेले नाहीत. सदर प्रकल्प रखडल्याने जनमंच सिंचन शोध यात्रेच्या वतीने रविवारी संबंधित तीनही प्रकल्पावर शोध यात्रा काढण्यात आली. या प्रकल्पांच्या कामावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असून, अद्याप एकाही प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे काम पूर्ण होण्याचा कालावधी तीनही प्रकल्पांनी ओलांडला आहे. जनमंच सिंचन शोध यात्रेच्या चमूने तिन्ही प्रकल्पांची पाहणी करून शेतकरी व अधिकारी यांचा संवाद घडवून आणला. या संवादामध्ये अनेक धक्कादायक बाबी उजेडात आल्या. शेतकर्‍यांना सिंचनाची सोय त्वरित व्हावी, यासाठी जनमंच प्रयत्न करणार असल्याचे जनमंचचे अध्यक्ष अँड. अनिल किलोर, प्रा. शरद पाटील यांनी सांगितले. अशी आहे तीन मुख्य प्रकल्पांच्या कामाची स्थितीउमा बॅरेज प्रकल्प हा प्रकल्प तापी खोर्‍यात पूर्णा नदीची उपनदी असलेल्या उमा नदीवर प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचे काम २00९ पासून सुरू झाले असून, २३७.२३ कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पासाठी मंजूर आहे. मे. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अँन्ड टीबीपीआर इन्फ्रा प्रोजेक्ट लि.(जेव्ही) या कंपनीस प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे. सदर कंपनीने काम बंद केल्यामुळे या कंत्राटदारास ७ नोव्हेंबर २0१४ पासून ३१ ऑगस्ट २0१५ पर्यंत प्रतिदिन ५0 हजार रुपये आणि १ सप्टेंबरपासून एक लाख रुपये प्रतिदिन या प्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे दंडाची वसुली करण्यात आली नसून, अद्यापही प्रकल्पाचे काम बंद आहे.काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पकाटेपूर्णा बॅरेज प्रकल्प मंगरूळ कांबे या गावाजवळ प्रस्तावित असून, ३९८.८९ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव या प्रकल्पासाठी सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे संकल्प चित्र मंजूर करण्यासाठी तीन वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लागला आहे. त्यामुळे तीन वर्ष या प्रकल्पाचे काम बंद राहिले. या प्रकल्पाच्या कालव्यासाठी लागणारी जमीन अद्याप घेण्यात आली नाही. सदर प्रकल्प २0१९ पर्यंत पूर्णत्वास येणार असल्याचे संबंधित कार्यकारी अभियंता सांगतात.घुंगशी बॅरेज प्रकल्प खारपाणपट्टय़ातील जमिनीकरिता हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. ३८९.९१ कोटी रुपयांचा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकल्पासाठी २७७ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. पाइपलाइनचा प्रस्ताव महामंडळाकडे सादर करण्यात आला असून, भूसंपादनाची प्रक्रियाही थांबलेली आहे. २0१९ पर्यंत शेतकर्‍यांना या प्रकल्पाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.