शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

कर्जमाफीचे १४ महिन्यात १४ निर्णय; वर्षभराच्या गोंधळानंतरही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 13:21 IST

१४ महिन्याच्या कालावधीत तब्बल १४ शासन निर्णय प्रसिद्ध केले. महिन्याला एक याप्रमाणे काढलेल्या या निर्णयाने योजना राबवताना शासनाचा किती गोंधळ सुरू आहे, हे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देपहिला शासन निर्णय २८ जून २०१७ रोजी दिला. त्या निर्णयातून प्रशासकीय यंत्रणा, बँकांचा प्रचंड संभ्रम झाला. सुरुवातीला अर्ज दाखल करण्यासाठीचा नमुना, त्यामध्ये हवी असलेली माहिती यावरूनच सातत्याने शुद्धीपत्रक काढण्याची वेळ शासनावर आली.एकूणच कर्जमाफी योजना राबवण्याचा १४ महिन्याच्या कालावधी १४ शासन निर्णय प्रसिद्ध करण्याची वेळ शासनावर आली.

अकोला : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना शासनाने गेल्या वर्षभरात कमालीचा गोंधळ घातला. कर्जमाफीच्या २८ जून २०१७ रोजीच्या पहिल्या आदेशापासून १० आॅगस्ट २०१८ या १४ महिन्याच्या कालावधीत तब्बल १४ शासन निर्णय प्रसिद्ध केले. महिन्याला एक याप्रमाणे काढलेल्या या निर्णयाने योजना राबवताना शासनाचा किती गोंधळ सुरू आहे, हे स्पष्ट होत आहे.गेल्या काही वर्षांपासून दुष्काळात पिचलेल्या शेतकºयांना पीक कर्जातून मुक्ती देण्याच्या मागणीचा रेटा वाढला. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. त्यानंतर शासनाने तत्त्वता आणि निकषाआड कर्ज माफी देण्याची घोषणा केली. त्याबाबतचा पहिला शासन निर्णय २८ जून २०१७ रोजी दिला. त्या निर्णयातून प्रशासकीय यंत्रणा, बँकांचा प्रचंड संभ्रम झाला. सोबतच शेतकऱ्यांचीही मोठी अडचण झाली. सुरुवातीला अर्ज दाखल करण्यासाठीचा नमुना, त्यामध्ये हवी असलेली माहिती यावरूनच सातत्याने शुद्धीपत्रक काढण्याची वेळ शासनावर आली. त्यातच अनेक मुद्यांवर बँकांनी बोट ठेवल्याने त्यामध्येही बदल करावे लागले.राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून या शासन निर्णयात कमालीच्या दुरुस्त्या करण्यात आल्या. शासकीय यंत्रणेकडून एखाद्या शासन निर्णयात एवढ्या दुरुस्त्या येण्याची ही बहुधा पहिली वेळ असल्याची माहिती आहे. जून २०१७ मधील पहिल्या शासन निर्णयानंतर लगेच त्यामध्ये दुरुस्तीसाठी ५ जुलै, २० जुलै, १२ डिसेंबर २०१७ रोजी शुद्धीपत्रक काढण्यात आले. तर ८ सप्टेंबर, ७ डिसेंबर रोजी नव्याने बदल करण्यात आले. २८ फेब्रुवारी २०१८, ३१ मार्च, १६ एप्रिल, २ मे, ९ मे, ५ जून या दिवशी हाच शासन निर्णय नव्याने प्रसिद्ध केला. त्याशिवाय २१ मे रोजी त्याबाबत परिपत्रक काढण्यात आले. तर आता १० आॅगस्ट २०१८ रोजी निकषात बदल करत कुटुंबाऐवजी व्यक्तीला कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला. एकूणच कर्जमाफी योजना राबवण्याचा १४ महिन्याच्या कालावधी १४ शासन निर्णय प्रसिद्ध करण्याची वेळ शासनावर आली. त्यातून राज्यातील शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंतही पाहण्यात येत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती