शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कर्जमाफीचे १४ महिन्यात १४ निर्णय; वर्षभराच्या गोंधळानंतरही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 13:21 IST

१४ महिन्याच्या कालावधीत तब्बल १४ शासन निर्णय प्रसिद्ध केले. महिन्याला एक याप्रमाणे काढलेल्या या निर्णयाने योजना राबवताना शासनाचा किती गोंधळ सुरू आहे, हे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देपहिला शासन निर्णय २८ जून २०१७ रोजी दिला. त्या निर्णयातून प्रशासकीय यंत्रणा, बँकांचा प्रचंड संभ्रम झाला. सुरुवातीला अर्ज दाखल करण्यासाठीचा नमुना, त्यामध्ये हवी असलेली माहिती यावरूनच सातत्याने शुद्धीपत्रक काढण्याची वेळ शासनावर आली.एकूणच कर्जमाफी योजना राबवण्याचा १४ महिन्याच्या कालावधी १४ शासन निर्णय प्रसिद्ध करण्याची वेळ शासनावर आली.

अकोला : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना शासनाने गेल्या वर्षभरात कमालीचा गोंधळ घातला. कर्जमाफीच्या २८ जून २०१७ रोजीच्या पहिल्या आदेशापासून १० आॅगस्ट २०१८ या १४ महिन्याच्या कालावधीत तब्बल १४ शासन निर्णय प्रसिद्ध केले. महिन्याला एक याप्रमाणे काढलेल्या या निर्णयाने योजना राबवताना शासनाचा किती गोंधळ सुरू आहे, हे स्पष्ट होत आहे.गेल्या काही वर्षांपासून दुष्काळात पिचलेल्या शेतकºयांना पीक कर्जातून मुक्ती देण्याच्या मागणीचा रेटा वाढला. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. त्यानंतर शासनाने तत्त्वता आणि निकषाआड कर्ज माफी देण्याची घोषणा केली. त्याबाबतचा पहिला शासन निर्णय २८ जून २०१७ रोजी दिला. त्या निर्णयातून प्रशासकीय यंत्रणा, बँकांचा प्रचंड संभ्रम झाला. सोबतच शेतकऱ्यांचीही मोठी अडचण झाली. सुरुवातीला अर्ज दाखल करण्यासाठीचा नमुना, त्यामध्ये हवी असलेली माहिती यावरूनच सातत्याने शुद्धीपत्रक काढण्याची वेळ शासनावर आली. त्यातच अनेक मुद्यांवर बँकांनी बोट ठेवल्याने त्यामध्येही बदल करावे लागले.राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून या शासन निर्णयात कमालीच्या दुरुस्त्या करण्यात आल्या. शासकीय यंत्रणेकडून एखाद्या शासन निर्णयात एवढ्या दुरुस्त्या येण्याची ही बहुधा पहिली वेळ असल्याची माहिती आहे. जून २०१७ मधील पहिल्या शासन निर्णयानंतर लगेच त्यामध्ये दुरुस्तीसाठी ५ जुलै, २० जुलै, १२ डिसेंबर २०१७ रोजी शुद्धीपत्रक काढण्यात आले. तर ८ सप्टेंबर, ७ डिसेंबर रोजी नव्याने बदल करण्यात आले. २८ फेब्रुवारी २०१८, ३१ मार्च, १६ एप्रिल, २ मे, ९ मे, ५ जून या दिवशी हाच शासन निर्णय नव्याने प्रसिद्ध केला. त्याशिवाय २१ मे रोजी त्याबाबत परिपत्रक काढण्यात आले. तर आता १० आॅगस्ट २०१८ रोजी निकषात बदल करत कुटुंबाऐवजी व्यक्तीला कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला. एकूणच कर्जमाफी योजना राबवण्याचा १४ महिन्याच्या कालावधी १४ शासन निर्णय प्रसिद्ध करण्याची वेळ शासनावर आली. त्यातून राज्यातील शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंतही पाहण्यात येत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती