शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

कर्जमाफीचे १४ महिन्यात १४ निर्णय; वर्षभराच्या गोंधळानंतरही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 13:21 IST

१४ महिन्याच्या कालावधीत तब्बल १४ शासन निर्णय प्रसिद्ध केले. महिन्याला एक याप्रमाणे काढलेल्या या निर्णयाने योजना राबवताना शासनाचा किती गोंधळ सुरू आहे, हे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देपहिला शासन निर्णय २८ जून २०१७ रोजी दिला. त्या निर्णयातून प्रशासकीय यंत्रणा, बँकांचा प्रचंड संभ्रम झाला. सुरुवातीला अर्ज दाखल करण्यासाठीचा नमुना, त्यामध्ये हवी असलेली माहिती यावरूनच सातत्याने शुद्धीपत्रक काढण्याची वेळ शासनावर आली.एकूणच कर्जमाफी योजना राबवण्याचा १४ महिन्याच्या कालावधी १४ शासन निर्णय प्रसिद्ध करण्याची वेळ शासनावर आली.

अकोला : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना शासनाने गेल्या वर्षभरात कमालीचा गोंधळ घातला. कर्जमाफीच्या २८ जून २०१७ रोजीच्या पहिल्या आदेशापासून १० आॅगस्ट २०१८ या १४ महिन्याच्या कालावधीत तब्बल १४ शासन निर्णय प्रसिद्ध केले. महिन्याला एक याप्रमाणे काढलेल्या या निर्णयाने योजना राबवताना शासनाचा किती गोंधळ सुरू आहे, हे स्पष्ट होत आहे.गेल्या काही वर्षांपासून दुष्काळात पिचलेल्या शेतकºयांना पीक कर्जातून मुक्ती देण्याच्या मागणीचा रेटा वाढला. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. त्यानंतर शासनाने तत्त्वता आणि निकषाआड कर्ज माफी देण्याची घोषणा केली. त्याबाबतचा पहिला शासन निर्णय २८ जून २०१७ रोजी दिला. त्या निर्णयातून प्रशासकीय यंत्रणा, बँकांचा प्रचंड संभ्रम झाला. सोबतच शेतकऱ्यांचीही मोठी अडचण झाली. सुरुवातीला अर्ज दाखल करण्यासाठीचा नमुना, त्यामध्ये हवी असलेली माहिती यावरूनच सातत्याने शुद्धीपत्रक काढण्याची वेळ शासनावर आली. त्यातच अनेक मुद्यांवर बँकांनी बोट ठेवल्याने त्यामध्येही बदल करावे लागले.राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून या शासन निर्णयात कमालीच्या दुरुस्त्या करण्यात आल्या. शासकीय यंत्रणेकडून एखाद्या शासन निर्णयात एवढ्या दुरुस्त्या येण्याची ही बहुधा पहिली वेळ असल्याची माहिती आहे. जून २०१७ मधील पहिल्या शासन निर्णयानंतर लगेच त्यामध्ये दुरुस्तीसाठी ५ जुलै, २० जुलै, १२ डिसेंबर २०१७ रोजी शुद्धीपत्रक काढण्यात आले. तर ८ सप्टेंबर, ७ डिसेंबर रोजी नव्याने बदल करण्यात आले. २८ फेब्रुवारी २०१८, ३१ मार्च, १६ एप्रिल, २ मे, ९ मे, ५ जून या दिवशी हाच शासन निर्णय नव्याने प्रसिद्ध केला. त्याशिवाय २१ मे रोजी त्याबाबत परिपत्रक काढण्यात आले. तर आता १० आॅगस्ट २०१८ रोजी निकषात बदल करत कुटुंबाऐवजी व्यक्तीला कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला. एकूणच कर्जमाफी योजना राबवण्याचा १४ महिन्याच्या कालावधी १४ शासन निर्णय प्रसिद्ध करण्याची वेळ शासनावर आली. त्यातून राज्यातील शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंतही पाहण्यात येत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती