शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

सीबीएसईचे १३०० विद्यार्थी परीक्षा न देता पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:17 IST

११वी, आयटीआय प्रवेश कसे होणार? सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पास करण्यात येणार आहे. परंतु, ...

११वी, आयटीआय प्रवेश कसे होणार?

सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पास करण्यात येणार आहे. परंतु, विद्यार्थ्यांना गुण कोणत्या आधारावर देण्यात येतील. गुण कमी मिळाले तर इयत्ता अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निकला प्रवेश कसा घ्यायचा. याठिकाणी प्रवेश घेण्यासाठी गुणांचा, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विचार केला जातो. गुण चांगले मिळाले तर प्रवेशाचा मार्ग मोकळा होता. या गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान व्हायला नको. असे पालकांचे म्हणणे आहे.

गुणदान समपातळीवर कशी आणणार?

सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पास करण्यात येणार आहे. त्यासाठी गुणदान पद्धत कशी राबविणार. गुणदान समपातळीवर कसे आणणार. याबाबत पालक, शिक्षकांच्या मनात प्रश्न आहेत. परंतु, याबाबत केंद्रीय माध्यमिक बोर्डाकडून शाळांना अद्याप कोणत्याही सूचना नाहीत. त्यामुळे संभ्रम वाढत आहे.

कोरोनामुळे परीक्षा रद्द झाली. आता विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन व शाळेत झालेल्या परीक्षांच्या आधारे मिळालेले गुण सीबीएसई बोर्डाला पाठविण्यात येणार आहेत. त्या आधारे बोर्डाकडून निकाल घोषित होईल. परंतु, यात गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान व्हायला नको.

-शशीकांत कुळकर्णी, प्राचार्य, ज्युबिली सीबीएसई स्कूल

सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व शाळांतर्गंत परीक्षेच्या आधारे गुण देऊन निकाल घोषित करण्याची शक्यता आहे. परंतु, याबाबत बोर्डाकडून सूचना आल्या नाहीत. बोर्डाने ऑनलाईन एकच प्रवेश परीक्षा घेऊन त्याआधारे विद्यार्थ्यांना पुढील संधी उपलब्ध कराव्यात.

-अनोष मनवर, प्राचार्य, नोएल सीबीएसई स्कूल

पालक काय म्हणतात...

परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. परीक्षा घ्यायलाच हवी. परीक्षा न घेता, पास करणे योग्य नाही. यात गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. जे पास होणारे विद्यार्थी नाहीत. तेही आता पास होतील. पहिल्या क्रमांकात पास होणारा आणि द्वितीय श्रेणीत पास होणारा विद्यार्थी एकाच रांगेत आले आहेत.

-सचिन अग्रवाल, पालक

परीक्षा होईल. म्हणून मुलांनी वर्षभर केला. परंतु, परीक्षा होणार नसल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे टेन्शनच गेले आहे. यात गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. बोर्डाकडून गुण कोणत्या पद्धतीने देण्यात येतील. गुण चांगले मिळतील का? असे प्रश्न सतावत आहेत.

-संजीव अघडते, पालक