शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

सीबीएसईचे १३०० विद्यार्थी परीक्षा न देता पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:17 IST

११वी, आयटीआय प्रवेश कसे होणार? सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पास करण्यात येणार आहे. परंतु, ...

११वी, आयटीआय प्रवेश कसे होणार?

सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पास करण्यात येणार आहे. परंतु, विद्यार्थ्यांना गुण कोणत्या आधारावर देण्यात येतील. गुण कमी मिळाले तर इयत्ता अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निकला प्रवेश कसा घ्यायचा. याठिकाणी प्रवेश घेण्यासाठी गुणांचा, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विचार केला जातो. गुण चांगले मिळाले तर प्रवेशाचा मार्ग मोकळा होता. या गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान व्हायला नको. असे पालकांचे म्हणणे आहे.

गुणदान समपातळीवर कशी आणणार?

सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पास करण्यात येणार आहे. त्यासाठी गुणदान पद्धत कशी राबविणार. गुणदान समपातळीवर कसे आणणार. याबाबत पालक, शिक्षकांच्या मनात प्रश्न आहेत. परंतु, याबाबत केंद्रीय माध्यमिक बोर्डाकडून शाळांना अद्याप कोणत्याही सूचना नाहीत. त्यामुळे संभ्रम वाढत आहे.

कोरोनामुळे परीक्षा रद्द झाली. आता विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन व शाळेत झालेल्या परीक्षांच्या आधारे मिळालेले गुण सीबीएसई बोर्डाला पाठविण्यात येणार आहेत. त्या आधारे बोर्डाकडून निकाल घोषित होईल. परंतु, यात गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान व्हायला नको.

-शशीकांत कुळकर्णी, प्राचार्य, ज्युबिली सीबीएसई स्कूल

सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व शाळांतर्गंत परीक्षेच्या आधारे गुण देऊन निकाल घोषित करण्याची शक्यता आहे. परंतु, याबाबत बोर्डाकडून सूचना आल्या नाहीत. बोर्डाने ऑनलाईन एकच प्रवेश परीक्षा घेऊन त्याआधारे विद्यार्थ्यांना पुढील संधी उपलब्ध कराव्यात.

-अनोष मनवर, प्राचार्य, नोएल सीबीएसई स्कूल

पालक काय म्हणतात...

परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. परीक्षा घ्यायलाच हवी. परीक्षा न घेता, पास करणे योग्य नाही. यात गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. जे पास होणारे विद्यार्थी नाहीत. तेही आता पास होतील. पहिल्या क्रमांकात पास होणारा आणि द्वितीय श्रेणीत पास होणारा विद्यार्थी एकाच रांगेत आले आहेत.

-सचिन अग्रवाल, पालक

परीक्षा होईल. म्हणून मुलांनी वर्षभर केला. परंतु, परीक्षा होणार नसल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे टेन्शनच गेले आहे. यात गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. बोर्डाकडून गुण कोणत्या पद्धतीने देण्यात येतील. गुण चांगले मिळतील का? असे प्रश्न सतावत आहेत.

-संजीव अघडते, पालक