शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

महापोर्टलकडे बेरोजगारांचे १३० कोटी अडकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 14:26 IST

परीक्षा शुल्कापोटी १३० कोटी रुपये सरकारी तिजोरीत अडकले.

अकोला : फडणवीस सरकारने ७२ हजार पदांच्या मेगाभरती प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या महापोर्टलकडे राज्यातील ३४ लाख ८२ हजार बेरोजगारांचे १३० कोटी रुपये अडकले आहेत, तरीही आता महाआघाडी सरकारने २ लाख पदांची भरती खासगी एजन्सीमार्फत घेण्याची तयारी चालविली आहे. या प्रकाराला वंचित बहुजन आघाडीचा विरोध असून, राज्य लोकसेवा आयोगामार्फतच भरती प्रक्रिया करण्याची मागणी ‘वंचित’चे राज्य प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.राज्यातील विविध शासकीय विभागामध्ये रिक्त पदांची संख्या २ लाखांवर आहे. त्यामध्ये गृह, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, जलसंपदा, कृषी व पशुसंवर्धन, महसूल व वने, महिला व बालविकास या विभागांमध्ये सर्वाधिक पदे रिक्त आहेत. त्यानुसार शासकीय मेगाभरतीची तारीख निश्चित केली असून, १५ एप्रिलपर्यंत खासगी एजन्सी नियुक्त केली जाईल. २० एप्रिलपासून मेगाभरतीला सुरुवात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यासाठी १ लाख १ हजार पदांची आरक्षण पडताळणीही पूर्ण केल्याचे सांगण्यात येत आहे. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी ही भरती प्रक्रिया खासगी एजन्सीमार्फत राबविण्याला वंचित बहुजन आघाडीचा विरोध आहे. खासगी एजन्सीकडून भरती पारदर्शक पद्धतीने होऊ शकत नाही, तसा अनुभव महापोर्टलकडून गत सरकारच्या काळात आला आहे. त्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळ्याचे आरोप झाले आहेत. त्या घोटाळ्याच्या चौकशीलाही शासनाकडून बगल दिली जात आहे. 

 बेरोजगारांच्या कोट्यवधी रुपयांचे काय करणार..मेगाभरतीसाठी महापोर्टलकडे राज्यातील ३४ लाख ८२ हजार बेरोजगारांनी अर्ज केले होते. परीक्षा शुल्कापोटी १३० कोटी रुपये सरकारी तिजोरीत अडकले. त्यावरही कोणताच निर्णय शासनाने घेतला नाही. त्याच पद्धतीची अनिमियमितता व भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्याचे काम महाआघाडी सरकारने भरतीसाठी खासगी एजन्सी नियुक्तीने केले आहे. या प्रकारातून सुशिक्षित बेरोजगारांची प्रतारणा होत आहे. शासनाच्या निर्देशानुसार मेगाभरतीसाठी एक एजन्सी नियुक्ती केली जात आहे. त्यापूर्वी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून महाभरतीची प्रक्रिया, नियंत्रण कोणाचे असणार, याबद्दल स्पष्टीकरण दिले जाणार आहे.

 महापोर्टलद्वारे भरती परीक्षांची चौकशी करा!सोबतच महापरीक्षा पोर्टलच्यावतीने गत सरकारच्या काळातील भरतीसाठी घेतलेल्या परीक्षांची संपूर्ण चौकशी निवृत्त न्यायाधीशामार्फत करण्याची मागणीही ‘वंचित’ने केली आहे, असे राज्य प्रसिद्धिप्रमुख सुरेश नंदिरे यांनी पत्रकात म्हटले आहे.