शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली
2
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
3
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
4
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
5
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
6
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
7
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
8
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
9
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
10
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
11
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
12
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
13
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
14
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
15
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
16
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
17
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
18
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
19
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
20
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
Daily Top 2Weekly Top 5

बारावी परीक्षा रद्द; पदवी, अन्य प्रवेश कसे होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST

परीक्षांबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा घेण्याबाबत राज्य शासन पर्यायांचा विचार करत होते. ...

परीक्षांबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा घेण्याबाबत राज्य शासन पर्यायांचा विचार करत होते. मे महिना संपत आला, तरी परीक्षा घेण्याबाबत शासनाकडून पर्याय निश्चित होत नसल्याने बारावीचे विद्यार्थी संभ्रमात होते. परीक्षेबाबत लवकर निर्णय घेऊन आमच्यावरील मानसिक तणाव कमी करण्याची मागणी या विद्यार्थ्यांकडून झाली होती. कोरोनामुळे सीबीएसई बारावीची परीक्षा रद्दचा निर्णय बुधवारी झाला. त्यापाठोपाठ राज्य सरकारनेदेखील बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी दुपारी जाहीर केला. त्यामुळे पुढील पदवीची प्रवेश प्रक्रिया कशी होणार, अशी चिंता लागली आहे.

प्राचार्य म्हणतात?

परीक्षा रद्द होणे हे हुशार विद्यार्थ्यांना नुकसानकारक आहे. शासनाने ऑनलाईन व उर्वरित पर्याय निवडायला पाहिजे होते. यावर आता ॲडमिशन कसे द्यायचे, हा मुद्दा उपस्थित होणार आहे. दर्जेदार विद्यार्थी मिळणार आहेत.

- डॉ. रामेश्वर भिसे, प्राचार्य

कोरोनाची परिस्थिती असल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय योग्य आहे. पुढील प्रवेशासाठी सीईटी मार्ग असल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे धोरण शासनाने लवकर जाहीर करावे.

- दीपक बिरकड, प्राचार्य

विद्यार्थी म्हणतात?

परीक्षा घेतली असती, तर चांगले झाले असते, पण वाढत्या कोरोनामुळे सरकारने परीक्षा रद्दचा घेतलेला निर्णय योग्य वाटतो. आमच्या मूल्यमापनाचे सूत्र लवकर जाहीर करून प्रक्रिया पूर्ण व्हावी.

- धम्मानंद जामनिक, विद्यार्थी

आम्ही वर्षभर अभ्यास केला होता. पण कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर पडली. जून महिना आला तरी परीक्षा होत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. ती आता दूर झाली.

- विठ्ठल घोगरे, विद्यार्थी

पालक म्हणतात...

कोरोनाची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पाठविणे अशक्य होते. त्यामुळे शासनाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. आता पुढील प्रवेशासाठी मूल्यमापन कसे होईल? ही वाट बघत आहे.

- किशोर पाटील

वर्षभरापासून शाळा बंद आहे. त्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने विद्यार्थ्यांना धोका होता. त्यामुळे परीक्षा न घेणे हा निर्णय चांगला आहे. निकाल कसा लागणार यावर लक्ष आहे.

- विश्वास गवई

बारावीनंतरच्या संधी

बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातला एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणूनच, विद्यार्थ्यांना करिअरच्या महत्त्वपूर्ण पर्यायांची माहिती असणे आवश्यक आहे. बारावीनंतर कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतले करिअरचे अनेक पर्याय आहेत.

अभियांत्रिकी क्षेत्र निवडून इंजिनिअर पदवी मिळविता येते. यामध्ये एरोनॉटिकल, ऑटोमोबाईल, सिव्हील, इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन, औद्योगिक, माहिती तंत्रज्ञान, केमिकल, खाण, काॅम्प्युटर शाखांचे पर्याय आहेत.

डॉक्टर बनण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी बहुपर्याय उपलब्ध आहे. यामध्ये एमबीबीएस, बीएचएमएस, दंतचिकित्सा, बीएएमएस, बीयुएमएस, पशुवैद्यकीय सेवा व पशुसंवर्धन या क्षेत्रात संधी आहे.

कला, वाणिज्य, विज्ञान या विषयांमध्ये बीए, बी. कॉम., बी. एस्सी. या पदव्यांचे पर्याय आहेत. त्यानुसार कॉम्प्युटर, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित या विषयांची निवड करता येऊ शकते. हॉटेल मॅनेजमेंटचाही पर्याय आहे.

जिल्ह्यात बारावीतील एकूण विद्यार्थी

२४,८०९