शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

वऱ्हाडात  आतापर्यंत साडे अकरा लाख बीट कापसाचे पॅकेट विकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 13:57 IST

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात सोयाबीनच्या ३ लाख ५२ हजार ४८२ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा बाजारात करण्यात आला होता. आतापर्यंत त्यातील केवळ ९७ हजार ५६६ क्विंटलच बियाण्यांची शेतकऱ्यांनी खरेदी केली असून, ११ लाख ८३ हजार ६७५ क्विंटल  बीटी कापसाचे पॅकेट खरेदी करण्यात आले.

ठळक मुद्देकापसाच्या ३७ लाख ६७,४७० बियाणे पॅकेटपैकी शेतकऱ्यांनी आतापर्यंत ११ लाख ८३ हजार ६७५ पॅकेट बीटी बियाण्यांची खरेदी केली. मुगाची तर ४,३३० क्विंटल पैकी केवळ ७३८ क्विंटल च बियाण्यांंची विक्री झाली. यावर्षी १५ ते २० दिवस पाऊस लांबल्याने या दोन्ही पिकांच्या बियाणे खरेदीकडे आतातरी शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसते.

- राजरत्न सिरसाट

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात सोयाबीनच्या ३ लाख ५२ हजार ४८२ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा बाजारात करण्यात आला होता. आतापर्यंत त्यातील केवळ ९७ हजार ५६६ क्विंटलच बियाण्यांची शेतकऱ्यांनी खरेदी केली असून, ११ लाख ८३ हजार ६७५ क्विंटल  बीटी कापसाचे पॅकेट खरेदी करण्यात आले. पावसाच्या अनिश्चिततेचा हा परिणाम असून, यावर्षी प्रथमच बियाणे खरेदीला उशीर झाल्याचे चित्र आहे.वऱ्हाडात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, मूग, उडीद व ज्वारीची पिके घेतली जातात. कापूस पारंपरिक नगदी पीक असल्याने कापूस पेरणीला शेतकरी प्राधान्य देतात. अलीकडे पावसाची अनिश्चितता बघता शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी सुरू केली; पण कापसाच्या पेरणीवर तेवढा परिणाम झाला नाही. यावर्षी मात्र पावसाने दांडी मारल्याने पुन्हा एकदा कापसाऐवजी सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावपर्षी बाजारात उपलब्ध असलेल्या कापसाच्या ३७ लाख ६७,४७० बियाणे पॅकेटपैकी शेतकऱ्यांनी आतापर्यंत ११ लाख ८३ हजार ६७५ पॅकेट बीटी बियाण्यांची खरेदी केली.२६ हजार ४६७ क्ंिवटल तूर बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला होता. त्यापैकी केवळ ४,९५० क्विंटल  तूर बियाणे विक्री झाली. मुगाची तर ४,३३० क्विंटल पैकी केवळ ७३८ क्विंटल च बियाण्यांंची विक्री झाली. उडीद बियाणेही ३० हजार ९६२ क्विंटल पैकी केवळ ८ ४६ क्विंटल  विक्री झाली. मूग, उडीद पेरणी शक्यतो जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात केली जाते. तथापि, यावर्षी १५ ते २० दिवस पाऊस लांबल्याने या दोन्ही पिकांच्या बियाणे खरेदीकडे आतातरी शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसते.दरम्यान, २० व २१ जून रोजी अकोला जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरुवात केली आहे. रविवारी २५ ते ३० टक्के विक्री होती ती गुरुवारपर्यंत ४० टक्केवर पोहोचली आहे. आणखी एखादा जोरदार पाऊस आल्यास बियाणे खरेदीला वेग येईल, असे कृषी निविष्ठा विक्रेत्यांना वाटते; पण बियाणे खरेदीला यावर्षी प्रथमच उशीर झाल्याने विक्रेतेही शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

 शेतकºयांनी बियाणे खरेदी करावे; पण जोपर्यंत ७५ ते १०० मि.मी. पाऊस होऊन जमिनीत ओलावा निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणीसाठीची घाई करू नये, शेतकºयांना वेळोवेळी यासंदर्भात मार्गदर्शन व आवाहन करण्यात येत आहे.डॉ. विलास भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस