शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

वऱ्हाडात  आतापर्यंत साडे अकरा लाख बीट कापसाचे पॅकेट विकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 13:57 IST

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात सोयाबीनच्या ३ लाख ५२ हजार ४८२ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा बाजारात करण्यात आला होता. आतापर्यंत त्यातील केवळ ९७ हजार ५६६ क्विंटलच बियाण्यांची शेतकऱ्यांनी खरेदी केली असून, ११ लाख ८३ हजार ६७५ क्विंटल  बीटी कापसाचे पॅकेट खरेदी करण्यात आले.

ठळक मुद्देकापसाच्या ३७ लाख ६७,४७० बियाणे पॅकेटपैकी शेतकऱ्यांनी आतापर्यंत ११ लाख ८३ हजार ६७५ पॅकेट बीटी बियाण्यांची खरेदी केली. मुगाची तर ४,३३० क्विंटल पैकी केवळ ७३८ क्विंटल च बियाण्यांंची विक्री झाली. यावर्षी १५ ते २० दिवस पाऊस लांबल्याने या दोन्ही पिकांच्या बियाणे खरेदीकडे आतातरी शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसते.

- राजरत्न सिरसाट

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात सोयाबीनच्या ३ लाख ५२ हजार ४८२ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा बाजारात करण्यात आला होता. आतापर्यंत त्यातील केवळ ९७ हजार ५६६ क्विंटलच बियाण्यांची शेतकऱ्यांनी खरेदी केली असून, ११ लाख ८३ हजार ६७५ क्विंटल  बीटी कापसाचे पॅकेट खरेदी करण्यात आले. पावसाच्या अनिश्चिततेचा हा परिणाम असून, यावर्षी प्रथमच बियाणे खरेदीला उशीर झाल्याचे चित्र आहे.वऱ्हाडात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, मूग, उडीद व ज्वारीची पिके घेतली जातात. कापूस पारंपरिक नगदी पीक असल्याने कापूस पेरणीला शेतकरी प्राधान्य देतात. अलीकडे पावसाची अनिश्चितता बघता शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी सुरू केली; पण कापसाच्या पेरणीवर तेवढा परिणाम झाला नाही. यावर्षी मात्र पावसाने दांडी मारल्याने पुन्हा एकदा कापसाऐवजी सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावपर्षी बाजारात उपलब्ध असलेल्या कापसाच्या ३७ लाख ६७,४७० बियाणे पॅकेटपैकी शेतकऱ्यांनी आतापर्यंत ११ लाख ८३ हजार ६७५ पॅकेट बीटी बियाण्यांची खरेदी केली.२६ हजार ४६७ क्ंिवटल तूर बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला होता. त्यापैकी केवळ ४,९५० क्विंटल  तूर बियाणे विक्री झाली. मुगाची तर ४,३३० क्विंटल पैकी केवळ ७३८ क्विंटल च बियाण्यांंची विक्री झाली. उडीद बियाणेही ३० हजार ९६२ क्विंटल पैकी केवळ ८ ४६ क्विंटल  विक्री झाली. मूग, उडीद पेरणी शक्यतो जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात केली जाते. तथापि, यावर्षी १५ ते २० दिवस पाऊस लांबल्याने या दोन्ही पिकांच्या बियाणे खरेदीकडे आतातरी शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसते.दरम्यान, २० व २१ जून रोजी अकोला जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरुवात केली आहे. रविवारी २५ ते ३० टक्के विक्री होती ती गुरुवारपर्यंत ४० टक्केवर पोहोचली आहे. आणखी एखादा जोरदार पाऊस आल्यास बियाणे खरेदीला वेग येईल, असे कृषी निविष्ठा विक्रेत्यांना वाटते; पण बियाणे खरेदीला यावर्षी प्रथमच उशीर झाल्याने विक्रेतेही शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

 शेतकºयांनी बियाणे खरेदी करावे; पण जोपर्यंत ७५ ते १०० मि.मी. पाऊस होऊन जमिनीत ओलावा निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणीसाठीची घाई करू नये, शेतकºयांना वेळोवेळी यासंदर्भात मार्गदर्शन व आवाहन करण्यात येत आहे.डॉ. विलास भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस